शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अयोध्या पौळ यांनी कल्याण लोकसभेच्या उमेदवार सांगत केले एप्रिल फूल... 

By मुरलीधर भवार | Updated: April 1, 2024 19:26 IST

कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

कल्याण: कल्याण लोकसभा मतदार संघातून महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. उमेदवारी ही डॉ. श्रीकांत शिंदे यांनाच मिळणार आहे हे गृहित असले तरी समोर महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेचा उमेदवार कोण असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. तोपर्यंत उद्वव सेनेच्या सोशल मिडिया समन्वयक असलेल्या अयोध्या पोळ या तरुणीने ट्वीट केले की, तिला उद्धव सेनेकडून कल्याण लोकसभा मतदार संघाची उमेदवारी दिली गेली आहे. मशाल चिन्हावर निवडणूक लढविणार आहे. हे ऐकून कल्याण लोकसभेविषयी पुन्हा चर्चेला उधाण आले. मात्र पोळ यांनी स्वत: सांगितले की, अरे ते एप्रिल फूल होते. त्यामुळे चर्चेचा सगळा धूराळा खाली बसला आहे.

कल्याण लोकसभेचे खासदार शिंदे यांच्या समाेर तगडा उमेदवार देण्यासाठी विविध नावे समोर येत आहेत. उद्धव सेनेकडून सुषमा अंधारे, वरुण सरदेसाई यांच्या नावासोबत केदार दिघे, सुभाष भोईर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या पैकी एकाही नावावर महाविकास आघाडीतील उद्धव सेनेकडून शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून नावांची केवळ चर्चा सुरु आहे. खरे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास २४ एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. तोपर्यंत उद्धव सेनेकडून नाव जाहिर केले जाणार नाही. तोपर्यंत युतीकडूनही वेट अ’ण्ड वा’चची भूमिका अंगिकारली जात आहे. कल्याणमधूनच उभे राहायचेकी अन्य कुठला सुरक्षित मतदार संघ शोधायचा या सगळ्या राजकीय शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. 

अशा परिस्थितीत अयोध्या पोळ यांच्या ट्वीटने चांगलाच घोळ उडवून दिला. सगळे हे विसरुन गेले की, आज एप्रिल महिन्याची पहिली तारीख आहे. या दिवशी एप्रिल फूल केले जाते. राजकीय नेत्यांकडून जनतेला आश्वासने देऊन पाच वर्षे एप्रिल फूल केले जात असताना आत्ता एका तरुणीने तिला उमेदवारी मिळाल्याचे ट्वीट करुन जरा मजा घेत एप्रिल फूल केल्यास त्यात कुठे काय बिघडले अशी प्रतिक्रिया सामान्यांतून उमटली तर नवल नको वाटायला.

हे ट्वीट करुन पाेळ मोकळ्या झाल्या. त्यांचे ट्वीट हे सगळयांनी गांभीर्याने घेतले. त्याचे हे ट्वीट पाहन त्यांना २०० पेक्षा जास्त जणांनी फोन केला. पोळ यांनी सांगितले की, उमेदवारी मला दिलेला नाही. या मतदार संघातून ठाकरेंकडून उमेदवार दिला जाणार आहे असे मला म्हणायचे होते. शिवसेनेने पानटपरीवाल्याला मंत्री केले आहे. ठाकरे या नावात ती ताकद आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आज १ एप्रिल आहे. ते एप्रिल फूल होते असे सांगून त्या मोकळ्या झाल्या आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदे