शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

रिक्षा प्रवासही झालाय "कठीण"; चालकांकडून आकारलं जातंय मनमानी भाडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 15:00 IST

Kalyan Dombivli - रुग्णाचे नातेवाईक बेड, इंजेक्शन आणि इतर गोष्टींसाठी धावाधाव करतायेत मात्र इमर्जन्सीच्या वेळी काही रिक्षा चालकांकडून मनमानी पद्धतीने  भाडं आकारल जात असल्याने सामान्य नागरिकांचा रिक्षा प्रवासही कठीण झाला आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यामध्ये कायमच खटके उडतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियम अधिक कडक केल्यामुळे वाद होण्याच प्रमाण अधिक वाढलंय. एकीकडे रुग्णाचे नातेवाईक बेड, इंजेक्शन आणि इतर गोष्टींसाठी धावाधाव करतायेत मात्र इमर्जन्सीच्या वेळी काही रिक्षा चालकांकडून मनमानी पद्धतीने  भाडं आकारल जात असल्याने सामान्य नागरिकांचा रिक्षा प्रवासही कठीण झाला आहे. संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरात एकही रिक्षा मीटर पद्धतीने धावत नसल्याने मनाला येईल तो आकडा रिक्षाचालकांकडून सांगितला जात आहे.

कोरोनाच्या काळात अनेक रिक्षाचालकांनी माणुसकी व प्रामाणिकपणा राखला यात शंका नाही. याअगोदर रिक्षाचालकांच्या देखील समस्या लोकमतने मांडल्यात. मात्र काही रिक्षाचालक गणवेश न घालणे, प्रवास करताना मास्क न लावणे, अव्वाच्या सव्वा भाडं  आकारण अशा गोष्टी देखील केल्या जातायेत. ही लढाई आपल्या सर्वांची असल्याने सर्व घटकांनी एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे. वाहतूक विभाग, प्रवासी संघटना, आरटीओ, रिक्षा संघटना यांच्यात योग्य तो समन्वय असणं अत्यंत गरजेच आहे.

 

टॅग्स :kalyanकल्याणauto rickshawऑटो रिक्षा