शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

'रिक्षा बंद'वरुन कल्याण डोंबिवलीत वातावरण तापलं; रिक्षा संघटनांमध्ये मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2022 20:10 IST

सीएनजीच्या दरात मागील वर्षभरात २८ रुपयांची वाढ झाली असतानाही रिक्षा भाडे वाढविण्यात आलं नाही.

कल्याण- कल्याण-डोंबिवलीत रिक्षा बंदवरुन सध्या चांगलचं वातावरण पेटलं आहे. कोकण रिक्षा टॅक्सी चालक संघटनांकडून १ ऑगस्टपासून अनिश्चित कालावधीसाठी रिक्षा बंदची हाक देण्यात आलीय. मात्र या बंदमध्ये आम्ही सहभागी होणार नाही, असं कल्याण डोंबिवलीतील काही रिक्षा संघटनांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर आमच्या जीवाला धोका आहे त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण द्या, अशी धक्कादायक मागणीही करण्यात आली. 

सीएनजीच्या दरात मागील वर्षभरात २८ रुपयांची वाढ झाली असतानाही रिक्षा भाडे वाढविण्यात आलं नाही. वारंवार मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने  लाखो रिक्षाचालक आपलं स्टेयरिंग अनिश्चित कालावधीसाठी बंद ठेवणार आहेत. १ ऑगस्ट पर्यत रिक्षा भाडे वाढविण्याबाबतचा निर्णय न घेतल्यास कोंकण विभागातील ४ जिल्ह्यातील सुमारे २ लाख ५० हजार रिक्षा चालक ३० जुलैच्या रात्रीपासून प्रवासी भाडे न आकरता संप पुकारणार असल्याचं जाहीर करण्यात आलय. मात्र या संपाला अन्य संघटनांनी विरोध दर्शवला आहे.   

डोंबिवलीतील पाच तर कल्याण मधील ६ रिक्षा संघटना- युनियन सहभागी होणार नसल्याचं सांगण्यात आलय. इतकंच नाही तर ज्यांनी संप पुकारला आहे त्यांच्यपासून आमच्या जीवाला धोका आहे असे सांगत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण परिमंडळ -३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची  भेट घेऊन निवेदन दिले. याबाबत संजय देसले, नंदू परब, दत्ता माळेकर, प्रमोद गुरव यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ९० टक्के रिक्षाचालकांनी रोज रिक्षा चालवली तरच त्यांचं घर चालतं. आधीच कोरोना काळात रिक्षाचालकांचे हाल झालेत. त्यात हा बेमुदत संप परवडणार नाही, असं या पदाधिका-यांचं म्हणणं आहे.  

विशेष बाब म्हणजे या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपसह आरपीआय व इतर पक्षांच्या प्रभावाखाली असलेल्या संघटना एकत्रित आल्यात. प्रणित रिक्षा संघटनाही एकत्रित आल्यात. मात्र दुसरीकडे संप पुकारणा-एससी संघटनेवर सुद्धा सेनेचं वर्चस्व असल्याने हा वाद आता कुठे जातो? ते पाहव लागणार आहे. पण, प्रवाशांच्या तक्रारीसाठी इतक्या आक्रमकपणे कधीही एकत्र न येणाऱ्या या संघटना केवळ एका संघटनेला विरोध करण्यासाठी आणि थेट पोलिसांना निवेदन देण्यासाठी एकत्र आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाkalyanकल्याणdombivaliडोंबिवली