शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

लेख: उद्धव ठाकरेंना चकविण्यासाठी शिवसेना-भाजपामध्ये लुटुपुटूची लढाई?

By अजित मांडके | Updated: June 12, 2023 10:09 IST

शिवसेना-भाजप युती आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचा दावा वरिष्ठ पातळीवरून केला जात आहे. त्याचवेळी कल्याण-ठाण्यात युतीतील मित्रपक्षांतच संघर्ष पेटला आहे.

अजित मांडके, प्रतिनिधी

शिवसेना-भाजप युती आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचा दावा वरिष्ठ पातळीवरून केला जात आहे. त्याचवेळी कल्याण-ठाण्यात युतीतील मित्रपक्षांतच संघर्ष पेटला आहे. भाजपचे कोकण पट्ट्यातील नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हे शिवसेनेबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचवेळी त्यांच्या उपस्थितीत कल्याण लाेकसभा निवडणुकीत शिवसेनेला मदत करणार नाही, असा ठराव करण्याइतकी टाेकाची भूमिका भाजपने घेतली आहे. त्याला निमित्त जरी कल्याणमधील विकासकामांच्या फलकांवरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चव्हाण यांचे फोटो वगळण्याचे असले तरी अशा कारणावरून एवढे नाराज होणाऱ्या नेत्यांसारखे चव्हाण नाहीत. त्यातही भाजपचे नेते नंदू जोशी यांच्यावर दाखल गुन्ह्याचे कारण पुढे केले जात असले तरी गृहखाते भाजपकडेच आहे. निधी मिळण्याचा प्रश्न असेल तर समान वाटा मिळण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद भाजपच्या ताब्यात आहे. शिवाय शिंदे-चव्हाण यांच्यात थेट संघर्ष उभा ठाकल्याचे दिसलेले नाही. उलट राज्यात सत्तांतर झाले तेव्हा मुंबई ते सुरत, सुरत ते गुवाहाटी या प्रवासात चव्हाण हेच शिंदे यांना अखंड सोबत करत होते.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण मतदारसंघाच्या सतत केलेल्या दौऱ्यानंतरही शिंदे यांनी फारशी खळखळ केलेली नव्हती. पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात क्लस्टरचे भूमिपूजन झाले, तेव्हा रवींद्र चव्हाण यांनी तेथून अवघ्या दोन मिनिटांतच काढता पाय घेतला हाेता. त्यामुळे भाजपमधील नाराजी अचानक उफाळून येण्याचे कारण काय, असा प्रश्न उभा राहतो. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गाफील ठेवण्यासाठी ही रणनीती असू शकते, असा सूरही लावला जात आहे. महाविकास आघाडीतही तिन्ही पक्ष अनेकदा परस्परांशी जाहीर संघर्ष करताना दिसतात; पण रिझल्ट देताना ते एकत्र असतात. तसेच पाऊल उचलण्याच्या डावपेचांचा हा भाग असू शकतो किंवा कल्याणमध्ये दबाव वाढवला, तर किमान ठाणे लोकसभा तरी पदरात पडेल, यासाठी युती अंतर्गत ही राजकीय खेळीही असू शकते, असे काहींना वाटते.

ठाण्यात राजन विचारे यांना साथ देण्याची तयारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केली आहे. कल्याण लोकसभेसाठी आगरी कार्ड खेळण्याचा विचार ठाकरे गटाकडून सुरू असल्याचे मानले जाते. कदाचित त्यांच्यावरचा फाेकस हटवण्यासाठी शिवसेना, भाजपची ही खेळी नाही ना?

ठाणे, कल्याण लोकसभेसाठी भाजपने स्थानिक पातळीवर जोर लावताना फक्त कल्याणच नव्हे, ठाणेही आमचेच अशा घोषणा केल्या आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही बैठक बोलावल्याने हे खरोखरीच कुरघोडीचे राजकारण आहे, की इतर पक्षांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न अशी चर्चाही सुरू आहे.

...तर मिशन कल्याण अवघड हाेऊ शकते

कल्याण लोकसभेवरून तापलेले राजकारण ही वस्तुस्थिती असेल तर भविष्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. चव्हाण यांनी असहकार कायम ठेवला, तर भाजपचे प्राबल्य असलेल्या डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर या विधानसभा मतदारसंघांत मतांचे विभाजन होऊ शकते. कळवा-मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत शिंदे यांचे सुरुवातीला चांगले संबंध होते. मात्र सध्या त्यात वितुष्ट आले. कल्याण ग्रामीणमध्ये मात्र राजू पाटील यांच्याशी त्यांचे संबंध सुधारलेले दिसतात. पण भाजपच्या नाराजीचा परिणाम श्रीकांत शिंदे यांच्या मतांवर होऊ शकताे. त्यामुळे मिशन कल्याण अवघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे