शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लेख: उद्धव ठाकरेंना चकविण्यासाठी शिवसेना-भाजपामध्ये लुटुपुटूची लढाई?

By अजित मांडके | Updated: June 12, 2023 10:09 IST

शिवसेना-भाजप युती आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचा दावा वरिष्ठ पातळीवरून केला जात आहे. त्याचवेळी कल्याण-ठाण्यात युतीतील मित्रपक्षांतच संघर्ष पेटला आहे.

अजित मांडके, प्रतिनिधी

शिवसेना-भाजप युती आगामी निवडणुका एकत्रित लढणार असल्याचा दावा वरिष्ठ पातळीवरून केला जात आहे. त्याचवेळी कल्याण-ठाण्यात युतीतील मित्रपक्षांतच संघर्ष पेटला आहे. भाजपचे कोकण पट्ट्यातील नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हे शिवसेनेबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचवेळी त्यांच्या उपस्थितीत कल्याण लाेकसभा निवडणुकीत शिवसेनेला मदत करणार नाही, असा ठराव करण्याइतकी टाेकाची भूमिका भाजपने घेतली आहे. त्याला निमित्त जरी कल्याणमधील विकासकामांच्या फलकांवरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चव्हाण यांचे फोटो वगळण्याचे असले तरी अशा कारणावरून एवढे नाराज होणाऱ्या नेत्यांसारखे चव्हाण नाहीत. त्यातही भाजपचे नेते नंदू जोशी यांच्यावर दाखल गुन्ह्याचे कारण पुढे केले जात असले तरी गृहखाते भाजपकडेच आहे. निधी मिळण्याचा प्रश्न असेल तर समान वाटा मिळण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद भाजपच्या ताब्यात आहे. शिवाय शिंदे-चव्हाण यांच्यात थेट संघर्ष उभा ठाकल्याचे दिसलेले नाही. उलट राज्यात सत्तांतर झाले तेव्हा मुंबई ते सुरत, सुरत ते गुवाहाटी या प्रवासात चव्हाण हेच शिंदे यांना अखंड सोबत करत होते.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण मतदारसंघाच्या सतत केलेल्या दौऱ्यानंतरही शिंदे यांनी फारशी खळखळ केलेली नव्हती. पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात क्लस्टरचे भूमिपूजन झाले, तेव्हा रवींद्र चव्हाण यांनी तेथून अवघ्या दोन मिनिटांतच काढता पाय घेतला हाेता. त्यामुळे भाजपमधील नाराजी अचानक उफाळून येण्याचे कारण काय, असा प्रश्न उभा राहतो. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गाफील ठेवण्यासाठी ही रणनीती असू शकते, असा सूरही लावला जात आहे. महाविकास आघाडीतही तिन्ही पक्ष अनेकदा परस्परांशी जाहीर संघर्ष करताना दिसतात; पण रिझल्ट देताना ते एकत्र असतात. तसेच पाऊल उचलण्याच्या डावपेचांचा हा भाग असू शकतो किंवा कल्याणमध्ये दबाव वाढवला, तर किमान ठाणे लोकसभा तरी पदरात पडेल, यासाठी युती अंतर्गत ही राजकीय खेळीही असू शकते, असे काहींना वाटते.

ठाण्यात राजन विचारे यांना साथ देण्याची तयारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने केली आहे. कल्याण लोकसभेसाठी आगरी कार्ड खेळण्याचा विचार ठाकरे गटाकडून सुरू असल्याचे मानले जाते. कदाचित त्यांच्यावरचा फाेकस हटवण्यासाठी शिवसेना, भाजपची ही खेळी नाही ना?

ठाणे, कल्याण लोकसभेसाठी भाजपने स्थानिक पातळीवर जोर लावताना फक्त कल्याणच नव्हे, ठाणेही आमचेच अशा घोषणा केल्या आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेनेही बैठक बोलावल्याने हे खरोखरीच कुरघोडीचे राजकारण आहे, की इतर पक्षांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न अशी चर्चाही सुरू आहे.

...तर मिशन कल्याण अवघड हाेऊ शकते

कल्याण लोकसभेवरून तापलेले राजकारण ही वस्तुस्थिती असेल तर भविष्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. चव्हाण यांनी असहकार कायम ठेवला, तर भाजपचे प्राबल्य असलेल्या डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर या विधानसभा मतदारसंघांत मतांचे विभाजन होऊ शकते. कळवा-मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत शिंदे यांचे सुरुवातीला चांगले संबंध होते. मात्र सध्या त्यात वितुष्ट आले. कल्याण ग्रामीणमध्ये मात्र राजू पाटील यांच्याशी त्यांचे संबंध सुधारलेले दिसतात. पण भाजपच्या नाराजीचा परिणाम श्रीकांत शिंदे यांच्या मतांवर होऊ शकताे. त्यामुळे मिशन कल्याण अवघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे