शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

आगरी संस्कृती टिकविण्यासाठी धवल हा प्रकार नव्या पिढीपर्यंत पोचवावा; धवलारिनींचे आवाहन

By मुरलीधर भवार | Updated: December 14, 2024 18:49 IST

डोंबिवलीतील आगरी महोत्सवात धवला गीतांचे गायन करत धवलारिनींनी वातावरण केले प्रसन्न

मुरलीधर भवार, डोंबिवली: आगरी समाजातील लग्नात गायला जाणारा धवला हे ऐतिहासिक शास्त्र आहे. आपली भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी नवीन पिढीपर्यंत धवला पोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नव्या काळातही धवल्याची परंपरा जतन करणाऱ्या चौघा धवलारिनींनी व्यक्त केला. डोंबिवलीत सुरू असलेल्या आगरी महोत्सवात शुक्रवारी सायंकाळी 'धवला-आगरी पौरोहित्य' या विषयावर धवल्याच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला. आगरी समाजाच्या लग्नातील परंपरा असलेल्या धवलाची गीते गात धवलारिनींनी महोत्सवातील वातावरण प्रसन्न केले. या कार्यक्रमात धवलारिन वासंती भोईर, अवनी पाटील, संगीता पाटील, कु. मनस्वी माळी यांनी भाग घेतला. अनुराधा पाटील व ज्योती पाटील यांनी चौघींनाही बोलते केले.

धवला हा ऐतिहासिक आहे. रुक्मिणी स्वयंवराच्या वर्णनातही धवलाचा उल्लेख आहे. आगरी समाजातील लग्नात धवला ही धार्मिक परंपरा होती. धवलातील प्रत्येक शब्दात ताकद आहे. मात्र, बदलत्या काळात समाजाच्या लग्नात इतर प्रांतातील संगीत कार्यक्रम सुरू झाला. नव्या पिढीने संगीताचा आनंद जरुर घ्यावा. पण लग्न सोहळा हा शुद्ध व पवित्र करावयाचा असेल, तर ऐतिहासिक शास्त्र असलेला धवला हा आवश्यक आहे, असे मत या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले.

धवलारिन हिला आगरी समाजात पुरोहिताचा दर्जा देण्यात आला आहे. लग्नाच्या विधीत `चाऊल' दळून पहिली सुरुवात होते. त्यानंतरच्या विविध विधींनी लग्नसोहळा पार पडतो. पारंपरिक पद्धतीने झालेल्या आगरी विवाह सोहळ्याची आठवण मनात कायम कोरुन राहते, असे या धवलारिंनींनी मुलाखतीत सांगितले.

धवलारिन म्हणून नव्या पिढीतील मनस्वी माळी हिने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिने सादर केलेल्या विविध धवल्यांना रसिकांनी पसंती दिली. वासंती भोईर, अवनी पाटील, संगीता पाटील यांचे पारंपरिक धवले दाद मिळवून गेले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया नायकार यांनी केले.

दरम्यान, आगरी महोत्सवात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमांमध्ये स्त्री शक्तीला स्थान देण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनापासून पाहुण्यांचे व्यासपीठावरील स्वागत आणि नियोजनामध्ये महिलांनी सहभाग घेतला.

टॅग्स :dombivaliडोंबिवली