शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आगरी संस्कृती टिकविण्यासाठी धवल हा प्रकार नव्या पिढीपर्यंत पोचवावा; धवलारिनींचे आवाहन

By मुरलीधर भवार | Updated: December 14, 2024 18:49 IST

डोंबिवलीतील आगरी महोत्सवात धवला गीतांचे गायन करत धवलारिनींनी वातावरण केले प्रसन्न

मुरलीधर भवार, डोंबिवली: आगरी समाजातील लग्नात गायला जाणारा धवला हे ऐतिहासिक शास्त्र आहे. आपली भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी नवीन पिढीपर्यंत धवला पोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नव्या काळातही धवल्याची परंपरा जतन करणाऱ्या चौघा धवलारिनींनी व्यक्त केला. डोंबिवलीत सुरू असलेल्या आगरी महोत्सवात शुक्रवारी सायंकाळी 'धवला-आगरी पौरोहित्य' या विषयावर धवल्याच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला. आगरी समाजाच्या लग्नातील परंपरा असलेल्या धवलाची गीते गात धवलारिनींनी महोत्सवातील वातावरण प्रसन्न केले. या कार्यक्रमात धवलारिन वासंती भोईर, अवनी पाटील, संगीता पाटील, कु. मनस्वी माळी यांनी भाग घेतला. अनुराधा पाटील व ज्योती पाटील यांनी चौघींनाही बोलते केले.

धवला हा ऐतिहासिक आहे. रुक्मिणी स्वयंवराच्या वर्णनातही धवलाचा उल्लेख आहे. आगरी समाजातील लग्नात धवला ही धार्मिक परंपरा होती. धवलातील प्रत्येक शब्दात ताकद आहे. मात्र, बदलत्या काळात समाजाच्या लग्नात इतर प्रांतातील संगीत कार्यक्रम सुरू झाला. नव्या पिढीने संगीताचा आनंद जरुर घ्यावा. पण लग्न सोहळा हा शुद्ध व पवित्र करावयाचा असेल, तर ऐतिहासिक शास्त्र असलेला धवला हा आवश्यक आहे, असे मत या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले.

धवलारिन हिला आगरी समाजात पुरोहिताचा दर्जा देण्यात आला आहे. लग्नाच्या विधीत `चाऊल' दळून पहिली सुरुवात होते. त्यानंतरच्या विविध विधींनी लग्नसोहळा पार पडतो. पारंपरिक पद्धतीने झालेल्या आगरी विवाह सोहळ्याची आठवण मनात कायम कोरुन राहते, असे या धवलारिंनींनी मुलाखतीत सांगितले.

धवलारिन म्हणून नव्या पिढीतील मनस्वी माळी हिने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिने सादर केलेल्या विविध धवल्यांना रसिकांनी पसंती दिली. वासंती भोईर, अवनी पाटील, संगीता पाटील यांचे पारंपरिक धवले दाद मिळवून गेले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया नायकार यांनी केले.

दरम्यान, आगरी महोत्सवात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमांमध्ये स्त्री शक्तीला स्थान देण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनापासून पाहुण्यांचे व्यासपीठावरील स्वागत आणि नियोजनामध्ये महिलांनी सहभाग घेतला.

टॅग्स :dombivaliडोंबिवली