शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

अमृत योजना जलकुंभाच्या जागेचा प्रश्न सुटला; मनसे आमदारांच्या पाठपुराव्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 14:53 IST

Kalyan-Dombivali : पाणी योजनेच्या कामाला गती देण्यासाठी मनसे आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

कल्याण : २७ गावांकरिता केंद्र सरकारच्या अमृत पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. गावात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. जलकुंभ उभारण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हत्या. या जागा जिल्हा परिषदेने कल्याणडोंबिवली महापालिकेस हस्तांतरीत करण्यात आल्याने जलकुंभ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा केला होता. याविषयी त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली होती.

२७ गावातील उसरघर, माणोरे, द्वारली, भोपर, देसलेपाडा, कोळे , संदप, निळजे, हेदुटणो या गावांमधील गुरु चरण, प्रांतिक सरकार इतर हक्क-परिवहन आयुक्त मुंबई यांचा आगाऊ ताबा, सार्वजनिक रस्ता, ग्रुप ग्रामपंचायत व प्रांतिक सरकार आदी प्रकारच्या जमिनींवर जलकुंभांचे आरक्षण होते. त्यामुळे या जमिनी जलकुंभासाठी महापालिकेकडे वर्ग करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यामुळे जलवाहिन्या टाकल्या तरी जलकुंभांची कामे अद्याप रखडली होती. 

पाणी योजनेच्या कामाला गती देण्यासाठी मनसे आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच जलकुंभांसाठी आवश्यक असणार्या जागांची पाहणी देखील आमदार पाटील यांनी अधिकार्यांसोबत केली होती. जलकुंभाच्या जागेचा प्रश्न सुटल्याने जलकुंभ उभारण्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

२७ गावांना आजमितीस एमआयडीसीकडून ३० दश लक्ष लिटरपेक्षा जास्त पाणी पुरवठा केला जातो. या पाणी पुरवठ्याचे बिल महापालिका भरते. हा पाणी पुरवठा अपुरा आहे. तसेच कमी दाबाने होत असतो. त्यामुळे अनेकदा या गावात पाणी टंचाईच होते. त्यासाठी केंद्र सरकारने अमृत पाणी पुरवठा योजनेला मंजूरी दिली. ही योजना १९४ कोटी रुपये खर्चाची आहे. या योजने अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ उभारणे ही कामे केली जाणार आहे. ही कामे पूर्णत्वास झाल्यास २७ गावांचा पाणी प्रश्न निकाली निघणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीRaju Patilराजू पाटील