शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

अमृत योजना जलकुंभाच्या जागेचा प्रश्न सुटला; मनसे आमदारांच्या पाठपुराव्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 14:53 IST

Kalyan-Dombivali : पाणी योजनेच्या कामाला गती देण्यासाठी मनसे आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

कल्याण : २७ गावांकरिता केंद्र सरकारच्या अमृत पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. गावात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. जलकुंभ उभारण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हत्या. या जागा जिल्हा परिषदेने कल्याणडोंबिवली महापालिकेस हस्तांतरीत करण्यात आल्याने जलकुंभ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा केला होता. याविषयी त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेतली होती.

२७ गावातील उसरघर, माणोरे, द्वारली, भोपर, देसलेपाडा, कोळे , संदप, निळजे, हेदुटणो या गावांमधील गुरु चरण, प्रांतिक सरकार इतर हक्क-परिवहन आयुक्त मुंबई यांचा आगाऊ ताबा, सार्वजनिक रस्ता, ग्रुप ग्रामपंचायत व प्रांतिक सरकार आदी प्रकारच्या जमिनींवर जलकुंभांचे आरक्षण होते. त्यामुळे या जमिनी जलकुंभासाठी महापालिकेकडे वर्ग करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यामुळे जलवाहिन्या टाकल्या तरी जलकुंभांची कामे अद्याप रखडली होती. 

पाणी योजनेच्या कामाला गती देण्यासाठी मनसे आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच जलकुंभांसाठी आवश्यक असणार्या जागांची पाहणी देखील आमदार पाटील यांनी अधिकार्यांसोबत केली होती. जलकुंभाच्या जागेचा प्रश्न सुटल्याने जलकुंभ उभारण्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

२७ गावांना आजमितीस एमआयडीसीकडून ३० दश लक्ष लिटरपेक्षा जास्त पाणी पुरवठा केला जातो. या पाणी पुरवठ्याचे बिल महापालिका भरते. हा पाणी पुरवठा अपुरा आहे. तसेच कमी दाबाने होत असतो. त्यामुळे अनेकदा या गावात पाणी टंचाईच होते. त्यासाठी केंद्र सरकारने अमृत पाणी पुरवठा योजनेला मंजूरी दिली. ही योजना १९४ कोटी रुपये खर्चाची आहे. या योजने अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ उभारणे ही कामे केली जाणार आहे. ही कामे पूर्णत्वास झाल्यास २७ गावांचा पाणी प्रश्न निकाली निघणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीRaju Patilराजू पाटील