शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी अमृत महोत्सव; तुषार गांधी यांची सरकारच्या धोरणावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 07:38 IST

शहरातील बिर्ला महाविद्यालयातील गांधी अध्ययन केंद्रातर्फे ५ ते १२ मार्चदरम्यान युवा शिबिर घेण्यात आले. या शिबिरात देशभरातील विविध राज्यांतून युवा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. खरंच देश स्वतंत्र झाला आहे का? ७५ वर्षांनंतरही देशात आजही त्याच समस्या कायम आहेत. या समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा अमृतमहोत्सव साजरा केला जात असल्याचे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. 

शहरातील बिर्ला महाविद्यालयातील गांधी अध्ययन केंद्रातर्फे ५ ते १२ मार्चदरम्यान युवा शिबिर घेण्यात आले. या शिबिरात देशभरातील विविध राज्यांतून युवा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गांधी यांना आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, अविनाश पाटील आणि सुरेश हतीपूर्ण आदी मान्यवर उपस्थित होते. 

तुषार गांधी म्हणाले की, ‘गांधीजींच्या स्वप्नातील भारत निर्माण झाला का, तर त्याचे उत्तर नाही असे आहे. आजही देशात त्याच समस्या आहेत. आपण कालही गुलाम होतो. आजही गुलाम आहोत. उद्याही गुलामच राहणार. आपल्या देशात शैक्षणिक क्रांती घडविणे आवश्यक आहे. देशात जिथे रोजगार आहे, तिथे वास्तव्याची सोय नाही. जिथे वास्तव्याची सोय आणि सुरक्षा आहे, तिथे रोजगार नाही. ही स्थिती कोरोना काळात आपण आपल्या डोळ्यांदेखत पाहिली. कोरोनाकाळात लॉकडाऊनच्या काळात मजूर आपल्या गावी पलायन करीत होते, हे भयावह चित्र भारतात दिसले.’, असेही त्यांनी सांगितले. 

नोकरीचीही हमी नाहीगांधी म्हणाले की , महात्मा गांधी यांना जाणून घ्यायचे असेल तर महात्मा म्हणून नव्हे, तर मोहनदास म्हणून ते काय जगले हे आधी जाणून घ्यावे लागेल. तरच तुम्ही महात्मा गांधीजींना जाणून घेऊ शकता. उच्चशिक्षण घेऊनही आपल्या देशातील तरुणांच्या हाताला रोजगार नाही. नोकरीची हमी नाही. इंजिनिअर, डॉक्टर  यांना रोजगाराची शाश्वती नाही, तर तिथे अन्य तरुणांचे काय होत असेल. मात्र, देशाचे पंतप्रधान म्हणतात की, इंजिनिअर झाला; पण नोकरी नाही तर भजी तळा आणि ती विका. त्यांना भजीच तळायची होती, तर त्यांनी शिक्षणावर १७ वर्षे वाया का घालवायची, असा प्रश्न गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.