शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी अमृत महोत्सव; तुषार गांधी यांची सरकारच्या धोरणावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 07:38 IST

शहरातील बिर्ला महाविद्यालयातील गांधी अध्ययन केंद्रातर्फे ५ ते १२ मार्चदरम्यान युवा शिबिर घेण्यात आले. या शिबिरात देशभरातील विविध राज्यांतून युवा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. खरंच देश स्वतंत्र झाला आहे का? ७५ वर्षांनंतरही देशात आजही त्याच समस्या कायम आहेत. या समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा अमृतमहोत्सव साजरा केला जात असल्याचे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. 

शहरातील बिर्ला महाविद्यालयातील गांधी अध्ययन केंद्रातर्फे ५ ते १२ मार्चदरम्यान युवा शिबिर घेण्यात आले. या शिबिरात देशभरातील विविध राज्यांतून युवा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गांधी यांना आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, अविनाश पाटील आणि सुरेश हतीपूर्ण आदी मान्यवर उपस्थित होते. 

तुषार गांधी म्हणाले की, ‘गांधीजींच्या स्वप्नातील भारत निर्माण झाला का, तर त्याचे उत्तर नाही असे आहे. आजही देशात त्याच समस्या आहेत. आपण कालही गुलाम होतो. आजही गुलाम आहोत. उद्याही गुलामच राहणार. आपल्या देशात शैक्षणिक क्रांती घडविणे आवश्यक आहे. देशात जिथे रोजगार आहे, तिथे वास्तव्याची सोय नाही. जिथे वास्तव्याची सोय आणि सुरक्षा आहे, तिथे रोजगार नाही. ही स्थिती कोरोना काळात आपण आपल्या डोळ्यांदेखत पाहिली. कोरोनाकाळात लॉकडाऊनच्या काळात मजूर आपल्या गावी पलायन करीत होते, हे भयावह चित्र भारतात दिसले.’, असेही त्यांनी सांगितले. 

नोकरीचीही हमी नाहीगांधी म्हणाले की , महात्मा गांधी यांना जाणून घ्यायचे असेल तर महात्मा म्हणून नव्हे, तर मोहनदास म्हणून ते काय जगले हे आधी जाणून घ्यावे लागेल. तरच तुम्ही महात्मा गांधीजींना जाणून घेऊ शकता. उच्चशिक्षण घेऊनही आपल्या देशातील तरुणांच्या हाताला रोजगार नाही. नोकरीची हमी नाही. इंजिनिअर, डॉक्टर  यांना रोजगाराची शाश्वती नाही, तर तिथे अन्य तरुणांचे काय होत असेल. मात्र, देशाचे पंतप्रधान म्हणतात की, इंजिनिअर झाला; पण नोकरी नाही तर भजी तळा आणि ती विका. त्यांना भजीच तळायची होती, तर त्यांनी शिक्षणावर १७ वर्षे वाया का घालवायची, असा प्रश्न गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.