शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी अमृत महोत्सव; तुषार गांधी यांची सरकारच्या धोरणावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 07:38 IST

शहरातील बिर्ला महाविद्यालयातील गांधी अध्ययन केंद्रातर्फे ५ ते १२ मार्चदरम्यान युवा शिबिर घेण्यात आले. या शिबिरात देशभरातील विविध राज्यांतून युवा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. खरंच देश स्वतंत्र झाला आहे का? ७५ वर्षांनंतरही देशात आजही त्याच समस्या कायम आहेत. या समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा अमृतमहोत्सव साजरा केला जात असल्याचे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. 

शहरातील बिर्ला महाविद्यालयातील गांधी अध्ययन केंद्रातर्फे ५ ते १२ मार्चदरम्यान युवा शिबिर घेण्यात आले. या शिबिरात देशभरातील विविध राज्यांतून युवा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गांधी यांना आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, अविनाश पाटील आणि सुरेश हतीपूर्ण आदी मान्यवर उपस्थित होते. 

तुषार गांधी म्हणाले की, ‘गांधीजींच्या स्वप्नातील भारत निर्माण झाला का, तर त्याचे उत्तर नाही असे आहे. आजही देशात त्याच समस्या आहेत. आपण कालही गुलाम होतो. आजही गुलाम आहोत. उद्याही गुलामच राहणार. आपल्या देशात शैक्षणिक क्रांती घडविणे आवश्यक आहे. देशात जिथे रोजगार आहे, तिथे वास्तव्याची सोय नाही. जिथे वास्तव्याची सोय आणि सुरक्षा आहे, तिथे रोजगार नाही. ही स्थिती कोरोना काळात आपण आपल्या डोळ्यांदेखत पाहिली. कोरोनाकाळात लॉकडाऊनच्या काळात मजूर आपल्या गावी पलायन करीत होते, हे भयावह चित्र भारतात दिसले.’, असेही त्यांनी सांगितले. 

नोकरीचीही हमी नाहीगांधी म्हणाले की , महात्मा गांधी यांना जाणून घ्यायचे असेल तर महात्मा म्हणून नव्हे, तर मोहनदास म्हणून ते काय जगले हे आधी जाणून घ्यावे लागेल. तरच तुम्ही महात्मा गांधीजींना जाणून घेऊ शकता. उच्चशिक्षण घेऊनही आपल्या देशातील तरुणांच्या हाताला रोजगार नाही. नोकरीची हमी नाही. इंजिनिअर, डॉक्टर  यांना रोजगाराची शाश्वती नाही, तर तिथे अन्य तरुणांचे काय होत असेल. मात्र, देशाचे पंतप्रधान म्हणतात की, इंजिनिअर झाला; पण नोकरी नाही तर भजी तळा आणि ती विका. त्यांना भजीच तळायची होती, तर त्यांनी शिक्षणावर १७ वर्षे वाया का घालवायची, असा प्रश्न गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.