शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

१०८ नंबरची रुग्णवाहिका आली साडेपाच तासानंतर; रूग्णाला करावी लागली उल्हासनगरात प्रतीक्षा

By सदानंद नाईक | Updated: July 16, 2025 08:04 IST

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात मुरबाड परिसरातील मोनिका भोईर या महिलेला उपचारासाठी रविवारी रात्री दाखल करण्यात आले होते.

- सदानंद नाईकलोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयातील मेंदूला गंभीर इजा झालेल्या एका महिला रुग्णाला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यासाठी बोलावलेली १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तब्बल साडेपाच तासांनंतर आल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर टीका होत आहे. यापूर्वी याच कारणामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांसह अनेकांच्या बदल्या होऊन निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतरही या अनास्थेबाबत परिस्थिती अजूनही जैसे थे असल्याचे समोर आले आहे.

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात मुरबाड परिसरातील मोनिका भोईर या महिलेला उपचारासाठी रविवारी रात्री दाखल करण्यात आले होते. घरात पडून त्यांच्या मेंदूला इजा झाल्याचे निदर्शनास आल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी केईएम रुग्णालयाला नेण्याच्या सूचना केल्या. मात्र, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, नातलगांनी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका दुपारी १२ वाजता फोन करून बोलाविली. मात्र ही रुग्णवाहिका साडेपाच तासांनी आली.

कारवाई का करत नाही?रुग्णाच्या जीविताशी खेळणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेच्या ठेकेदारावर राज्य सरकार कारवाई का करीत नाही. मुळात शासन, अधिकारी व ठेकेदार यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याने, अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांनी केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनीही १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिका सेवेबाबत नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर