शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अंबरनाथचा कचरा जाणार बदलापूरच्या डम्पिंग ग्राउंडवर

By पंकज पाटील | Updated: December 9, 2022 18:12 IST

डम्पिंग ग्राउंडबाबत पालिकेच्या विरोधात निर्णय

पंकज पाटील, अंबरनाथ: नगरपालिकेचा कचरा चिखलोली येथील डम्पिंग ग्राउंडवर न टाकण्याचे आदेश हरित लवादाने दिले आहेत. या आदेशामुळे आता अंबरनाथ पालिकेला त्यांचा कचरा बदलापूर पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर टाकण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही.

राष्ट्रीय हरित लवादाने अंबरनाथच्या चिखलोली येथील डम्पिंग ग्राउंडबाबत पालिकेच्या विरोधात निर्णय दिला आहे. हा डंपिंग ग्राउंड पालिकेने रहिवासी संकुलाच्या शेजारी सुरू केल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी याप्रकरणी हरित लवादकडे दाद मागितली होती. हरित लवादाने चिखलोली येथील डम्पिंग ग्राउंड तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच पर्यायी व्यवस्था म्हणून संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ज्या ठिकाणी राबविण्यात येणार आहे त्या ठिकाणी कचरा टाकावा असे आदेश देखील दिले आहेत. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर महापालिकेचा एकत्रित घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प बदलापूर पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर उभारला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प जोपर्यंत उभारला जात नाही तोपर्यंत अंबरनाथ पालिकेचा कचरा देखील त्याच प्रकल्पावर टाकण्याच्या पर्याय सुचवण्यात आला आहे.

चिखलोली येथील सर्वे क्रमांक 132 वरील डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश आल्यामुळे आता पालिका प्रशासनाने देखील हरित लवादाच्या आदेशाप्रमाणे आपला कचरा बदलापूर पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर टाकण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. हरित लवादाने या प्रकरणी निर्णय दिला असता तरी अद्याप बदलापूर शहरवासीयांनी याबाबत आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, तर दुसरीकडे बदलापुरातील राजकारणी या प्रकरणात कोणती भूमिका घेतात हे देखील पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चौकट: # बदलापूर पालिकेचे डम्पिंग ग्राउंड सर्वे क्रमांक 188 या ठिकाणी असून पूर्वी त्या ठिकाणी दगडखान होती. याच दगड खाणीजवळ पालिकेने डम्पिंग ग्राउंड सुरू केले असून त्याच्या उर्वरित जागेमध्ये संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवला जाणार आहे. # अंबरनाथ शहरातील सरासरी 90 ते 100 टन कचरा हा दिवसाला बाहेर पडत असून तो आता बदलापूर पालिकेच्या डम्पिंग ग्राउंड वर टाकण्याची वेळ येणार आहे. तर दुसरीकडे बदलापूर शहराचा 70 ते 80 टन कचरा देखील याच डम्पिंग ग्राउंड वर पडत आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ