शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

उल्हास नदीत भराव टाकणाऱ्यास १० कोटींचा दंड, अंबरनाथच्या नायब तहसीलदारांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 09:35 IST

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘मी कल्याणकर’ संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी पदाधिकारी उमेश बोरगावकर यांच्यासह शिनगारे यांची भेट घेऊन नदीपात्रात भराव टाकल्याची तक्रार करीत कारवाईची मागणी केली होती.

कल्याण : उल्हास नदीपात्रात बदलापूर हेंद्रेपाडा येथे भराव टाकून नदीचे पात्र बुजवणाऱ्या सत्संग विहारला अंबरनाथच्या नायब तहसीलदारांनी १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ रुपयांचा दंड ठोठावला. त्यामुळे नदीपात्रात मातीचा भराव टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. 

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘मी कल्याणकर’ संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी पदाधिकारी उमेश बोरगावकर यांच्यासह शिनगारे यांची भेट घेऊन नदीपात्रात भराव टाकल्याची तक्रार करीत कारवाईची मागणी केली होती. यासंदर्भातील वृत्त ‘लाेकमत’ने २ मे रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत अंबरनाथचे नायब तहसीलदार अमित पुरी यांनी नदीपात्रात मातीचा भराव टाकणाऱ्या सत्संग विहारला दंड ठोठावला. 

संस्थेचे भजनलाल रॉय यांना भराव टाकण्याचा आदेश दिले होते. त्यांनी ८ हजार ९१२ ब्रास माती, ११६ ब्राड दगड, ८३ ब्रास दगड पावडर टाकून प्रवाह बुजविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी यंत्र सामग्री वापरली. त्यांना १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश १६ मे रोजी दिले. ही दंडाची रक्कम आदेश निघाल्यापासून सात दिवसांच्या आत महसूल खात्याकडे जमा करावी अन्यथा रक्कम सक्तीने वसूल करण्याची कारवाई केली जाणार आहे, असे आदेशात म्हटले आहे. 

या कारवाईमुळे ‘मी कल्याणकर’ संस्थेचे प्रमुख निकम यानी लोकमत, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे आभार व्यक्त केले. वालधुनी नदीतही मातीचा भराव टाकला जात आहे. याचीही शिनगारे यांनी दखल घेऊन कारवाईचे आदेश द्यावे, अशी अपेक्षा निकम यांनी व्यक्त केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरriverनदी