शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
4
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
5
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
6
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
7
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
8
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
9
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
10
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
11
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
12
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
13
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
14
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
15
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
16
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
17
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
18
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
19
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
20
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

उल्हास नदीत भराव टाकणाऱ्यास १० कोटींचा दंड, अंबरनाथच्या नायब तहसीलदारांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 09:35 IST

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘मी कल्याणकर’ संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी पदाधिकारी उमेश बोरगावकर यांच्यासह शिनगारे यांची भेट घेऊन नदीपात्रात भराव टाकल्याची तक्रार करीत कारवाईची मागणी केली होती.

कल्याण : उल्हास नदीपात्रात बदलापूर हेंद्रेपाडा येथे भराव टाकून नदीचे पात्र बुजवणाऱ्या सत्संग विहारला अंबरनाथच्या नायब तहसीलदारांनी १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ रुपयांचा दंड ठोठावला. त्यामुळे नदीपात्रात मातीचा भराव टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. 

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘मी कल्याणकर’ संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी पदाधिकारी उमेश बोरगावकर यांच्यासह शिनगारे यांची भेट घेऊन नदीपात्रात भराव टाकल्याची तक्रार करीत कारवाईची मागणी केली होती. यासंदर्भातील वृत्त ‘लाेकमत’ने २ मे रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत अंबरनाथचे नायब तहसीलदार अमित पुरी यांनी नदीपात्रात मातीचा भराव टाकणाऱ्या सत्संग विहारला दंड ठोठावला. 

संस्थेचे भजनलाल रॉय यांना भराव टाकण्याचा आदेश दिले होते. त्यांनी ८ हजार ९१२ ब्रास माती, ११६ ब्राड दगड, ८३ ब्रास दगड पावडर टाकून प्रवाह बुजविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी यंत्र सामग्री वापरली. त्यांना १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश १६ मे रोजी दिले. ही दंडाची रक्कम आदेश निघाल्यापासून सात दिवसांच्या आत महसूल खात्याकडे जमा करावी अन्यथा रक्कम सक्तीने वसूल करण्याची कारवाई केली जाणार आहे, असे आदेशात म्हटले आहे. 

या कारवाईमुळे ‘मी कल्याणकर’ संस्थेचे प्रमुख निकम यानी लोकमत, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे आभार व्यक्त केले. वालधुनी नदीतही मातीचा भराव टाकला जात आहे. याचीही शिनगारे यांनी दखल घेऊन कारवाईचे आदेश द्यावे, अशी अपेक्षा निकम यांनी व्यक्त केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरriverनदी