शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
3
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
4
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
5
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
6
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
7
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
8
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
9
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
10
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
11
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
12
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
13
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
14
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
15
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
16
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
17
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
18
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
19
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
20
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीत भराव टाकणाऱ्यास १० कोटींचा दंड, अंबरनाथच्या नायब तहसीलदारांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 09:35 IST

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘मी कल्याणकर’ संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी पदाधिकारी उमेश बोरगावकर यांच्यासह शिनगारे यांची भेट घेऊन नदीपात्रात भराव टाकल्याची तक्रार करीत कारवाईची मागणी केली होती.

कल्याण : उल्हास नदीपात्रात बदलापूर हेंद्रेपाडा येथे भराव टाकून नदीचे पात्र बुजवणाऱ्या सत्संग विहारला अंबरनाथच्या नायब तहसीलदारांनी १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ रुपयांचा दंड ठोठावला. त्यामुळे नदीपात्रात मातीचा भराव टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. 

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘मी कल्याणकर’ संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी पदाधिकारी उमेश बोरगावकर यांच्यासह शिनगारे यांची भेट घेऊन नदीपात्रात भराव टाकल्याची तक्रार करीत कारवाईची मागणी केली होती. यासंदर्भातील वृत्त ‘लाेकमत’ने २ मे रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत अंबरनाथचे नायब तहसीलदार अमित पुरी यांनी नदीपात्रात मातीचा भराव टाकणाऱ्या सत्संग विहारला दंड ठोठावला. 

संस्थेचे भजनलाल रॉय यांना भराव टाकण्याचा आदेश दिले होते. त्यांनी ८ हजार ९१२ ब्रास माती, ११६ ब्राड दगड, ८३ ब्रास दगड पावडर टाकून प्रवाह बुजविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी यंत्र सामग्री वापरली. त्यांना १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश १६ मे रोजी दिले. ही दंडाची रक्कम आदेश निघाल्यापासून सात दिवसांच्या आत महसूल खात्याकडे जमा करावी अन्यथा रक्कम सक्तीने वसूल करण्याची कारवाई केली जाणार आहे, असे आदेशात म्हटले आहे. 

या कारवाईमुळे ‘मी कल्याणकर’ संस्थेचे प्रमुख निकम यानी लोकमत, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे आभार व्यक्त केले. वालधुनी नदीतही मातीचा भराव टाकला जात आहे. याचीही शिनगारे यांनी दखल घेऊन कारवाईचे आदेश द्यावे, अशी अपेक्षा निकम यांनी व्यक्त केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरriverनदी