शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

केडीएमसी आयुक्तांच्या हस्ते रस्ते प्रकल्प बाधितांच्या घरांची सोडत 

By मुरलीधर भवार | Updated: February 8, 2024 16:52 IST

रिंगरोड प्रकल्प आणि विकास योजनेतील रस्त्यांच्या कामात बाधित झालेल्या लाभार्थ्यांपैकी एकुण ४९१ लाभार्थी पुनर्वसन समितीने पात्र ठरविले.

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्ते विकास प्रकल्पात बाधित झालेल्या पात्र ४६१ पात्र ठरलेल्या बाधितांना घरे देण्याची सोडत आज आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते पार पडली.

अत्रे रंगमंदिरात आयोजित सोडत प्रसंगी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, शहर अभियंता अर्जुन अहिरे, उपायुक्त वंदना गुळवे, अवधुत तावडे, स्वाती देशपांडे, प्रसाद बोरकर, माहिती -जनसंपर्क विभागप्रमुख संजय जाधव, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, सहाय्यक आयुक्त प्रिती गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

रिंगरोड प्रकल्प आणि विकास योजनेतील रस्त्यांच्या कामात बाधित झालेल्या लाभार्थ्यांपैकी एकुण ४९१ लाभार्थी पुनर्वसन समितीने पात्र ठरविले. त्यापैकी ३० लाभार्थी काही आक्षेप असल्यामुळे तसेच न्यायालयीन दावा असल्यामुळे वगळण्यात आले. ४६१ लाभार्थ्यांना सोडत पध्दतीने घरे आज जाहीर करण्यात आल्या. बीएसयूपी प्रकल्पातील उंबर्डे येथील बीएसयुपी प्रकल्पातील ६० घरे, इंदिरानगर येथील १०१ सदनिका आणि कचोरे येथील १०० घरे सोडत पध्दतीने जाहीर करण्यात आली. डोंबिवलीतील गजबंधन पाथर्ली इंदिरानगर येथील १७१ घरे आणि आंबेडकर नगरातील ६१ घरे अशा एकूण ४६१ लाभार्थ्यांना दिली जाणार आहेत. नगररचना विभागाने केलेल्या बायोमेट्रीक सर्व्हेक्षणामुळे हे काम अचूक झाल्याचे मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी सांगितले. आयुक्त जाखड़ यांनी सांगितेल की, मागील दोन महिन्याच्या कालावधीत कर्तव्यदक्षपणे नियोजन करुन आज ही सोडत प्रक्रीया पार पाडली जात आहे आणि बाधित नागरीक/लाभार्थी यांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे.

सोडतीस विरोध

इंदिरानगर विकास संघाचे दीपक थोरात यांनी सांगितले की, कल्याण पश्चिमेतील इंदिरानगरात २०१० साली झोपडपट्टीतील घरे पाडण्यात आली. त्यांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात आले. त्यांना बीएसयूपी प्रकल्पात घरे देण्यात येणार होती. २०२३ साली उजाडले तरी लाभार्थींना घरे मिळाली नाही. १४७ लाभार्थी घरांपासून वंचित आहे. या लाभार्थींना संक्रमण शिबीरापोटी १८ महिन्याचे घरभाडेही दिले गेले होते. बिल्डर आणि लाभार्थी यांच्यात करार करण्यात आला होता. त्यानंतर आजपर्यंत घरे मिळाली नाही. ज्यांच्याकरीता ही योजना होती. त्याना घरे न देता रस्ते प्रकल्पातील बाधितांना घरे दिली जात आहे. त्याला थोरात यांनी जोरदार विरोध केला आहे. घरे मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात थोरात यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी हा प्रश्न उपायुक्त वंदना गुळवे यांना सांगून येत्या आठवड्याभरात निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण