शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

केडीएमसी आयुक्तांच्या हस्ते रस्ते प्रकल्प बाधितांच्या घरांची सोडत 

By मुरलीधर भवार | Updated: February 8, 2024 16:52 IST

रिंगरोड प्रकल्प आणि विकास योजनेतील रस्त्यांच्या कामात बाधित झालेल्या लाभार्थ्यांपैकी एकुण ४९१ लाभार्थी पुनर्वसन समितीने पात्र ठरविले.

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्ते विकास प्रकल्पात बाधित झालेल्या पात्र ४६१ पात्र ठरलेल्या बाधितांना घरे देण्याची सोडत आज आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते पार पडली.

अत्रे रंगमंदिरात आयोजित सोडत प्रसंगी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, शहर अभियंता अर्जुन अहिरे, उपायुक्त वंदना गुळवे, अवधुत तावडे, स्वाती देशपांडे, प्रसाद बोरकर, माहिती -जनसंपर्क विभागप्रमुख संजय जाधव, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, सहाय्यक आयुक्त प्रिती गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

रिंगरोड प्रकल्प आणि विकास योजनेतील रस्त्यांच्या कामात बाधित झालेल्या लाभार्थ्यांपैकी एकुण ४९१ लाभार्थी पुनर्वसन समितीने पात्र ठरविले. त्यापैकी ३० लाभार्थी काही आक्षेप असल्यामुळे तसेच न्यायालयीन दावा असल्यामुळे वगळण्यात आले. ४६१ लाभार्थ्यांना सोडत पध्दतीने घरे आज जाहीर करण्यात आल्या. बीएसयूपी प्रकल्पातील उंबर्डे येथील बीएसयुपी प्रकल्पातील ६० घरे, इंदिरानगर येथील १०१ सदनिका आणि कचोरे येथील १०० घरे सोडत पध्दतीने जाहीर करण्यात आली. डोंबिवलीतील गजबंधन पाथर्ली इंदिरानगर येथील १७१ घरे आणि आंबेडकर नगरातील ६१ घरे अशा एकूण ४६१ लाभार्थ्यांना दिली जाणार आहेत. नगररचना विभागाने केलेल्या बायोमेट्रीक सर्व्हेक्षणामुळे हे काम अचूक झाल्याचे मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी सांगितले. आयुक्त जाखड़ यांनी सांगितेल की, मागील दोन महिन्याच्या कालावधीत कर्तव्यदक्षपणे नियोजन करुन आज ही सोडत प्रक्रीया पार पाडली जात आहे आणि बाधित नागरीक/लाभार्थी यांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे.

सोडतीस विरोध

इंदिरानगर विकास संघाचे दीपक थोरात यांनी सांगितले की, कल्याण पश्चिमेतील इंदिरानगरात २०१० साली झोपडपट्टीतील घरे पाडण्यात आली. त्यांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात आले. त्यांना बीएसयूपी प्रकल्पात घरे देण्यात येणार होती. २०२३ साली उजाडले तरी लाभार्थींना घरे मिळाली नाही. १४७ लाभार्थी घरांपासून वंचित आहे. या लाभार्थींना संक्रमण शिबीरापोटी १८ महिन्याचे घरभाडेही दिले गेले होते. बिल्डर आणि लाभार्थी यांच्यात करार करण्यात आला होता. त्यानंतर आजपर्यंत घरे मिळाली नाही. ज्यांच्याकरीता ही योजना होती. त्याना घरे न देता रस्ते प्रकल्पातील बाधितांना घरे दिली जात आहे. त्याला थोरात यांनी जोरदार विरोध केला आहे. घरे मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात थोरात यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी हा प्रश्न उपायुक्त वंदना गुळवे यांना सांगून येत्या आठवड्याभरात निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण