शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी साखळी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 20:30 IST

कल्याण डोंबिवली ग्रामीण भागासह भूमीपूत्रंनी केले मानवी साखळी आंदोलन

ठळक मुद्देआगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वङो यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांनी भूमीपूत्रंसाठी रक्त सांडले आहे. विमानतळास त्यांचेच नाव द्यावे. भर पावसात भूमीपूत्र रस्त्यावर उतरला आहे.

कल्याण - नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज भूमीपूत्रंनी मानवी साखळी तयार करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला भूमीपूत्रंनी प्रतिसाद देत कल्याणडोंबिवलीसह ग्रामीण भागात भूमीपूत्रंनी मानवी साखळी तयार करुन राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन आत्ता शांततेच्या मार्गाने करीत आहोत. यापुढील आंदोलनात संयम ठेवला जाणार नाही, असा इशारा भूमीपुत्रांनी यावेळी सरकारला दिला आहे. भर पावसात ही मानवी साखळी तयार करण्यासाठी भूमीपूत्र रस्त्यावर उतरले होते.

कल्याण पूर्व भागातील तीसगाव नाका, चक्कीनाका, नेवाली नाका, आडीवली ढोकली, द्वारली भाल, काटई, मानपाडा, भोपर, शीळ फाटा या ठिकाणी भूमीपूत्र रस्त्यावर उतरले होते. त्यात महिला ही मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सगळेच भूमीपूत्र हे आग्रही होते. त्यामध्ये ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायाचे लोकही सहभागी झाले होते. यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड हे मानवी साखळीत सहभागी झाले होते.

आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वङो यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांनी भूमीपूत्रंसाठी रक्त सांडले आहे. विमानतळास त्यांचेच नाव द्यावे. भर पावसात भूमीपूत्र रस्त्यावर उतरला आहे. 24 तारखेला सिडकोत भव्य मोर्चा याच मागणीसाठी आहे. आत्ता समाजाचा संयम सुटण्या आधीच सरकारने समाजाच्या मागणीचा विचार करावा याकडे वङो यांनी लक्ष वेधले आहे.

आमदार गायकवाड म्हणाले की, विमानतळास दि. बा. पाटील याचे नावे देण्याची मागणी रास्त आहे. मात्र हे सरकार मनमानी करीत आहे. शिवसेनेच्या नेत्यांची नावे विविध प्रकल्पांना दिली जात आहे. भूमीपूत्रंचे नेते असलेल्या दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळास द्यावे. मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील मानवी साखळीत सहभागी झाले. 

ते म्हणाले की, विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणी संदर्भात सरकारची भेट घेतली होती. मात्र सरकार ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. आता मानवी साखळी शांततेत पार पडली असलीत समाज यापूढील आंदोलनात शांतता आणि संयम ठेवणार नाही असा इशारा सरकारला दिला आहे. आडीवली ढोकली या ठिकाणी पार पडलेल्या मानवी साखळीत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांनी भूमीपूत्रंच्या हितासाठी रक्त सांडले होते. त्यांचेच नाव विमानतळास द्यावे. सरकारने या प्रकरणी राजकारण करु नये याकडे लक्ष वेधले. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली