शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी साखळी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 20:30 IST

कल्याण डोंबिवली ग्रामीण भागासह भूमीपूत्रंनी केले मानवी साखळी आंदोलन

ठळक मुद्देआगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वङो यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांनी भूमीपूत्रंसाठी रक्त सांडले आहे. विमानतळास त्यांचेच नाव द्यावे. भर पावसात भूमीपूत्र रस्त्यावर उतरला आहे.

कल्याण - नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज भूमीपूत्रंनी मानवी साखळी तयार करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला भूमीपूत्रंनी प्रतिसाद देत कल्याणडोंबिवलीसह ग्रामीण भागात भूमीपूत्रंनी मानवी साखळी तयार करुन राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन आत्ता शांततेच्या मार्गाने करीत आहोत. यापुढील आंदोलनात संयम ठेवला जाणार नाही, असा इशारा भूमीपुत्रांनी यावेळी सरकारला दिला आहे. भर पावसात ही मानवी साखळी तयार करण्यासाठी भूमीपूत्र रस्त्यावर उतरले होते.

कल्याण पूर्व भागातील तीसगाव नाका, चक्कीनाका, नेवाली नाका, आडीवली ढोकली, द्वारली भाल, काटई, मानपाडा, भोपर, शीळ फाटा या ठिकाणी भूमीपूत्र रस्त्यावर उतरले होते. त्यात महिला ही मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सगळेच भूमीपूत्र हे आग्रही होते. त्यामध्ये ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायाचे लोकही सहभागी झाले होते. यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड हे मानवी साखळीत सहभागी झाले होते.

आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वङो यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांनी भूमीपूत्रंसाठी रक्त सांडले आहे. विमानतळास त्यांचेच नाव द्यावे. भर पावसात भूमीपूत्र रस्त्यावर उतरला आहे. 24 तारखेला सिडकोत भव्य मोर्चा याच मागणीसाठी आहे. आत्ता समाजाचा संयम सुटण्या आधीच सरकारने समाजाच्या मागणीचा विचार करावा याकडे वङो यांनी लक्ष वेधले आहे.

आमदार गायकवाड म्हणाले की, विमानतळास दि. बा. पाटील याचे नावे देण्याची मागणी रास्त आहे. मात्र हे सरकार मनमानी करीत आहे. शिवसेनेच्या नेत्यांची नावे विविध प्रकल्पांना दिली जात आहे. भूमीपूत्रंचे नेते असलेल्या दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळास द्यावे. मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील मानवी साखळीत सहभागी झाले. 

ते म्हणाले की, विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणी संदर्भात सरकारची भेट घेतली होती. मात्र सरकार ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. आता मानवी साखळी शांततेत पार पडली असलीत समाज यापूढील आंदोलनात शांतता आणि संयम ठेवणार नाही असा इशारा सरकारला दिला आहे. आडीवली ढोकली या ठिकाणी पार पडलेल्या मानवी साखळीत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांनी भूमीपूत्रंच्या हितासाठी रक्त सांडले होते. त्यांचेच नाव विमानतळास द्यावे. सरकारने या प्रकरणी राजकारण करु नये याकडे लक्ष वेधले. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली