शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी साखळी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 20:30 IST

कल्याण डोंबिवली ग्रामीण भागासह भूमीपूत्रंनी केले मानवी साखळी आंदोलन

ठळक मुद्देआगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वङो यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांनी भूमीपूत्रंसाठी रक्त सांडले आहे. विमानतळास त्यांचेच नाव द्यावे. भर पावसात भूमीपूत्र रस्त्यावर उतरला आहे.

कल्याण - नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज भूमीपूत्रंनी मानवी साखळी तयार करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला भूमीपूत्रंनी प्रतिसाद देत कल्याणडोंबिवलीसह ग्रामीण भागात भूमीपूत्रंनी मानवी साखळी तयार करुन राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन आत्ता शांततेच्या मार्गाने करीत आहोत. यापुढील आंदोलनात संयम ठेवला जाणार नाही, असा इशारा भूमीपुत्रांनी यावेळी सरकारला दिला आहे. भर पावसात ही मानवी साखळी तयार करण्यासाठी भूमीपूत्र रस्त्यावर उतरले होते.

कल्याण पूर्व भागातील तीसगाव नाका, चक्कीनाका, नेवाली नाका, आडीवली ढोकली, द्वारली भाल, काटई, मानपाडा, भोपर, शीळ फाटा या ठिकाणी भूमीपूत्र रस्त्यावर उतरले होते. त्यात महिला ही मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सगळेच भूमीपूत्र हे आग्रही होते. त्यामध्ये ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायाचे लोकही सहभागी झाले होते. यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड हे मानवी साखळीत सहभागी झाले होते.

आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वङो यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांनी भूमीपूत्रंसाठी रक्त सांडले आहे. विमानतळास त्यांचेच नाव द्यावे. भर पावसात भूमीपूत्र रस्त्यावर उतरला आहे. 24 तारखेला सिडकोत भव्य मोर्चा याच मागणीसाठी आहे. आत्ता समाजाचा संयम सुटण्या आधीच सरकारने समाजाच्या मागणीचा विचार करावा याकडे वङो यांनी लक्ष वेधले आहे.

आमदार गायकवाड म्हणाले की, विमानतळास दि. बा. पाटील याचे नावे देण्याची मागणी रास्त आहे. मात्र हे सरकार मनमानी करीत आहे. शिवसेनेच्या नेत्यांची नावे विविध प्रकल्पांना दिली जात आहे. भूमीपूत्रंचे नेते असलेल्या दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळास द्यावे. मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील मानवी साखळीत सहभागी झाले. 

ते म्हणाले की, विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणी संदर्भात सरकारची भेट घेतली होती. मात्र सरकार ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. आता मानवी साखळी शांततेत पार पडली असलीत समाज यापूढील आंदोलनात शांतता आणि संयम ठेवणार नाही असा इशारा सरकारला दिला आहे. आडीवली ढोकली या ठिकाणी पार पडलेल्या मानवी साखळीत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांनी भूमीपूत्रंच्या हितासाठी रक्त सांडले होते. त्यांचेच नाव विमानतळास द्यावे. सरकारने या प्रकरणी राजकारण करु नये याकडे लक्ष वेधले. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली