शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदी पात्रातच आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 13:23 IST

Ulhas river Kalyan : लाखो लोकांची तहान भागविणारी उल्हास नदी प्रदूषित झाली आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याण संस्थेच्या वतीने नदी पात्रात संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी आजपासून आंदोलन सुरु केले आहे.

कल्याण - लाखो लोकांची तहान भागविणारी उल्हास नदी प्रदूषित झाली आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याण संस्थेच्या वतीने नदी पात्रात संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी आजपासून आंदोलन सुरु केले आहे. जोर्पयत प्रदूषण रोखले जात नाही. तोर्पयत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा निकम यांनी दिला आहे.नदी पात्र मोहने येथे निकम यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यांना माजी नगरसेवक उमेश बोरगावकर आणि कैलास शिंदे यांचा पाठिंबा आहे. त्याचबरोबर उल्हास नदी बचाव कृती समितीचे रविंद्र लिंगायत, वालधूनी जलबिरादरीचे शशिकांत दायमा यांनीही पाठिंबा दिला आहे. निकम यांनी सांगितले की, राजमाचीच्या डोंगरातून उगम पावणारी उल्हास नदी ही बारमाही नदी आहे. ही नदी कजर्तपासून प्रदूषित होते. मात्र मोहने बंधारा येथे ती जास्त प्रदूषित झाली आहे. नदी पात्रात म्हारळ, गाळेगाव आणि म्हारळ येथील सांडपाण्याचे नाले येऊन मिळतात. या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. नदी पात्रात जलपर्णी उगविली आहे. दरवर्षी नदी पात्राच्या पाण्यात जलपर्णी उगविते. जलपर्णी मोठय़ा प्रमाणात पाणी शोषते. जलपर्णी काढण्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था, लघू पाटबंधारे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही एक ठोस पावले उचलली जात नाहीत. नदीमधील जैव विविधता प्रदूषणामुळे धोक्यात आली आहे. या नदीच्या पाण्यावर ४८ लाख लोकांची तहान भागते. २०१५ सालापासून निकम हे उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत आहेत. २०१६ मध्ये त्यांनी १२ दिवस नदी पात्रात बेमुदत उपोषण केले होते. त्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे उपोषण सोडविले होते. त्यानंतर पुन्हा ७ दिवस उपोषण केले होते. त्यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे उपोषण सोडविले होते. आत्ता जोर्पयत ठोस उपाययोजना केली जात नाही तोर्पयत आजपासून सुरु केलेले आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे निकम यांनी सांगितले. 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने आंदोलनाच्या ठिकाणी बॅनर लावला आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मोहने मोहने नाला येथे बंधारा आणि उदंचन केंद्र बांधून सांडपाणी आंबिवली मलशुद्धीकरण केंद्रात नेण्याचे काम सुरु आहे.

टॅग्स :kalyanकल्याणulhasnagarउल्हासनगर