शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अदानी समूहाला एनआरसी कंपनीच्या जागेचा अद्याप संपूर्ण ताबा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 15:28 IST

जमीन अधिग्रहीत करण्यावर 200 कोटीचा खर्च; अदानी समूह सूत्रांची माहिती

कल्याण-आंबिवली नजीक असलेल्या एनआरसी कंपनीची 440 एकर जागा अदानी समूहाने लिलावात घेतली आहे. या जागेवर लॉजिस्टीक पार्क उभारला जाणार आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहीत केली जात आहे. मात्र अदानी समूहाला कंपनीच्या जागेचा संपूर्ण ताबा अद्याप मिळविता आलेला नाही. कंपनीची जागा अधिग्रहीत करण्यासाठी अदानी समूहाने आत्तार्पयत 200 कोटी रुपये खर्च केले असल्याची माहिती अदानी समूहाच्या सूत्रांनी दिली आहे.  एनआरसी कंपनी सुरु होती तेव्हा कामगारांना राहण्यासाठी क्वार्टर्स दिले होते. क्वार्टर्स हे कामगारांच्या ताब्यात आहेत. अदानी समूहाने जमिनीची कायदेशीर खरेदी केली आहे.एनसीएलटीच्या आदेशानुसार कामगारांना 68 कोटी  देण्याची तयारी दर्शविली होती. त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याची तयारी अदानी समूहाने दाखविली होती. मात्र ही मागणी कामगारांना मान्य नाही. एनआरसी कंपनीच्या 45 कामगारांनी औद्योगिक न्यायालयाकडे दाद मागितली होती. क्वार्टर्सचा ताबा कामगारांना देण्यात यावा. मे 2021 मध्ये न्यायालयाने अंतरिम आदेश देत क्वार्टर्सचा ताबा कामगारांकडेच ठेवण्यास परवानगी दिली होती. हा आदेश चुकीचा असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर न्यायालयाने 17 ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या आदेशानुसार क्वार्टर्सचा ताबा कामगारांकडे ठेवण्यास दिलेली परवानगी रद्दबातल ठरविली. तसेच हा खटला त्यांच्या अखत्यारीत येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा खटला आयबीसीच्या 2016 नुसारच्या कायद्यांतर्गत येतो. त्यामुळे अदानी समूहाने क्वार्टर्समध्ये राहणा:या कामगारांना घरे खाली करण्याच्या नोटिसा देणो हे बेकायदेशीर ठरत नसल्याचे स्पष्ट होत आहे. न्यायालयाने कामगार वास्तव्याची परवानगी देण्याचा निर्णय रद्दबातल ठरविला नसून खटलाच फेटाळून लावला असल्याची माहिती अदानी समूहाच्या सूत्रंनी दिली आहे. दरम्यान एनसीएलटी दिल्ली येथे कामगार अपिलात गेले आहेत. त्यांचे अपिल न्यायप्रविष्ट आहे. औद्योगिक न्यायालयाच्या निर्णयामुळे दिल्ली येथील एनसीएलटीकडे पुढील सुनावणी दरम्यान काय निर्णय घेतला जाऊ शकतो याकडे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर एनआरसी कंपनीच्या आवारातील क्वार्टर्स जीर्ण झालेले आहेत. धोकादायक आहे. ते तोडण्यासाठी नोटिसा दिलेल्या आहेत. ही घरे तोडण्यास कामगारांचा विरोध आहे. या धोकादायक इमारतीत वास्तव्य करणा:यांच्या जिवितास धोका होऊ शकतो असे एनआरसी कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Adaniअदानी