शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

"आपले पाप लपविण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर आरोप"; शिंदे गटाकडून भाजपाच्या टीकेला प्रत्युत्तर

By मुरलीधर भवार | Updated: September 19, 2022 18:01 IST

कल्याण डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटात रस्त्यावरील खड्ड्यांवरून वादाची ठिणगी

कल्याण: रस्ते विकासाच्या निधीवरुन काल डोंबिवलीतील एका कार्यक्रमात मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नगरविकासला लक्ष केले. त्यांचा प्रत्यक्ष टोला हा सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच होता. त्यांच्या या टिकेची शिवसेनेच्या शिंदे गटाने गंभीर दखल घेत शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आपले पाप लविण्यासाठी मुख्यमंत्र्यावर मंत्री चव्हाण हे आरोप करीत असल्याचे प्रतिउत्तर दिले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांवरुन कल्याण डोंबिवलीतील भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे.

"यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार होते. महाविकास आघाडीच्या सरकार पूर्वी आमदार चव्हाण हे राज्यमंत्री होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते विरोधी बाकावर बसून विरोधकाची भूमिका बजावित होते. त्यांनी गेल्या अडीच वर्षात तत्कालीन पालक आणि नगरसविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना टिकेचे लक्ष्य केले. मात्र सत्ता बदलाच्या राजकारणात मंत्री चव्हाण हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून चव्हाण यांनी गुहाटीपासून मुंबईपर्यंतचा प्रवास केला. त्याच वेळी त्यांनी शिंदे यांच्या कानात सांगायला हवे होते. कोणती कामे रखडली आणि कोणती झाली आहेत. आत्ता सत्ता शिंदे-फडणवीस यांची आली आहे. या सत्तेत ते मंत्री आहेत, हेच चव्हाण विसरले आहेत. १३ वर्षात चव्हाण यांच्यामुळेच कामे रखडली", असा दावा दीपेश म्हात्रे यांनी चव्हाण यांच्या टिकेला उत्तर देताना केला.

"मंत्री चव्हाण हे वारंवार ४७२ कोटीची रस्ते विकासाची कामे मंजूर झाली होती. ती नामंजूर केल्याचा उल्लेख वारंवार करतात. त्यांनी ठामपणे सांगितले की, खरेच ही कामे मंजूर झाली होती. तर मी राजकारण सोडण्यास तयार आहे असे म्हात्रे यांनी सांगितले. खासदार आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वीच डोंबिवलीतील रस्ते विकासकरीता ३७० कोटी रुपयांची विकास कामे मंजूर केली आहे. याचा विसर चव्हाण यांना पडला आहे. त्यांच्या मतदार संघात दोन रस्ते येतात. या रस्त्याची कामे अद्याप सुरु झालेली नाहीत. ठाकूर्लीला रेल्वे उड्डाणपूलाचे एका बाजूचे काम रखडलेले आहे. याला जबाबदार कोण असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. ७२ तासात रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले पाहिजेत असा मुद्दा चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. ही बाब त्यांची चांगली असली तरी ७२ तासात खड्डे बुजविण्याकरीता त्यांनी का पुढाकार घेतला नाही", असाही प्रश्न म्हात्रे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :kalyanकल्याणShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा