शहरं
Join us  
Trending Stories
1
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
2
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
3
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
4
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
5
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
6
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
7
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
8
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
9
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
10
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
11
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
12
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
13
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
14
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
15
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
16
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
17
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
18
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
19
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
20
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू

Accident : रस्त्याच्या अर्धवट कामामुळे भीषण अपघात, गाडीचा चुराडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 16:24 IST

चालक गंभीर जखमी : गाडीचा झाला चुराडा, अपघातानंतर कामाला सुरुवात

ठळक मुद्देगाडी चालक आकाश पाटील हा आज पहाटे शीळहून कल्याणच्या दिशेने जात असताना पांडुरंगवाडीनजीक रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्याठिकाणी कंत्राटदाराने एक लोखंडी डिव्हाडर पत्रा लावला आहे

कल्याण - कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्याच्या या अर्धवट कामामुळेच एका चारचाकी गाडीला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून गाडी दूरवर फेकली फेकली गेली आहे. सुदैवाने, गाडीचा चालक बचावला असला तरी गंभीर जखमी झाला आहे. त्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. या घटनेमुळे रस्त्याच्या अर्धवट कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

गाडी चालक आकाश पाटील हा आज पहाटे शीळहून कल्याणच्या दिशेने जात असताना पांडुरंगवाडीनजीक रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्याठिकाणी कंत्राटदाराने एक लोखंडी डिव्हाडर पत्रा लावला आहे. हा लोखंडी पत्रा लक्षात न आल्याने पाटील यांची गाडी त्याला जोरोने धडकून रस्त्याच्या गटारीत जाऊन उलटी पडली. या रस्त्यालगत असलेले एका दुकानात कामाला असलेल्या सूरज भारद्वाज यांनी झोपेत असताना अपघाताचा मोठा आवाज ऐकून रस्त्यावर धाव घेतली. गाडीत अपघाती अवस्थेत पडलेल्या आकाशला बाहेर काढून त्याला रुग्णालयात पाठविले. ही घटना पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद अद्याप पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नाही. 

या परिसरातील जागरुक नागरीक संतोष भारद्वार यांनी सांगितले की, या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट आहे. कंत्राटदाराकडून अर्धवट कामाच्या ठिकाणी कोणत्याही सूचना नाही. तसेच रेडीयम पट्टी लावलेली नाही. या ठिकाणी वारंवार अपघात होतात. त्याकडे राज्य रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष आहे. घटना घडल्यावर त्याठिकाणी कंत्राटदाराने त्याचे कामगार पाठविले. त्यानंतर दिवसभर कामगार अर्धवट कामाच्या ठिकाणी उघड्या असलेल्या लोखंडी गज वाकविण्याचे काम करीत होते. तसेच शेजारी असलेले कल्वर्टचा खड्डा जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून बुजविला गेला. 

दरम्यान, कल्याण शील रस्त्याच्या कामासंदर्भात उच्च न्यायालयात 2क्क्1क् साली याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी सांगितले की, कल्याण शीळ रस्त्याचे काम चार पदरी करीत असताना रस्त्याचे काम अर्धवट होते. याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आत्ता सहा पदरी काम केले जात असताना पुन्हा रस्ते कामाचा अर्धवटपणाचा पाढा सुरुच आहे. अपघात होत आहे, चार पदरी करताना सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय नव्हता. आत्ताही समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्याप्रकरणी पुन्हा न्यायालयात धाव घ्यावी लागेल. 

टॅग्स :Accidentअपघातkalyanकल्याणcarकारkdmcकल्याण डोंबिवली महापालिका