शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Accident : रस्त्याच्या अर्धवट कामामुळे भीषण अपघात, गाडीचा चुराडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 16:24 IST

चालक गंभीर जखमी : गाडीचा झाला चुराडा, अपघातानंतर कामाला सुरुवात

ठळक मुद्देगाडी चालक आकाश पाटील हा आज पहाटे शीळहून कल्याणच्या दिशेने जात असताना पांडुरंगवाडीनजीक रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्याठिकाणी कंत्राटदाराने एक लोखंडी डिव्हाडर पत्रा लावला आहे

कल्याण - कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्याच्या या अर्धवट कामामुळेच एका चारचाकी गाडीला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून गाडी दूरवर फेकली फेकली गेली आहे. सुदैवाने, गाडीचा चालक बचावला असला तरी गंभीर जखमी झाला आहे. त्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. या घटनेमुळे रस्त्याच्या अर्धवट कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

गाडी चालक आकाश पाटील हा आज पहाटे शीळहून कल्याणच्या दिशेने जात असताना पांडुरंगवाडीनजीक रस्त्याचे काम अर्धवट आहे. त्याठिकाणी कंत्राटदाराने एक लोखंडी डिव्हाडर पत्रा लावला आहे. हा लोखंडी पत्रा लक्षात न आल्याने पाटील यांची गाडी त्याला जोरोने धडकून रस्त्याच्या गटारीत जाऊन उलटी पडली. या रस्त्यालगत असलेले एका दुकानात कामाला असलेल्या सूरज भारद्वाज यांनी झोपेत असताना अपघाताचा मोठा आवाज ऐकून रस्त्यावर धाव घेतली. गाडीत अपघाती अवस्थेत पडलेल्या आकाशला बाहेर काढून त्याला रुग्णालयात पाठविले. ही घटना पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद अद्याप पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नाही. 

या परिसरातील जागरुक नागरीक संतोष भारद्वार यांनी सांगितले की, या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट आहे. कंत्राटदाराकडून अर्धवट कामाच्या ठिकाणी कोणत्याही सूचना नाही. तसेच रेडीयम पट्टी लावलेली नाही. या ठिकाणी वारंवार अपघात होतात. त्याकडे राज्य रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष आहे. घटना घडल्यावर त्याठिकाणी कंत्राटदाराने त्याचे कामगार पाठविले. त्यानंतर दिवसभर कामगार अर्धवट कामाच्या ठिकाणी उघड्या असलेल्या लोखंडी गज वाकविण्याचे काम करीत होते. तसेच शेजारी असलेले कल्वर्टचा खड्डा जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून बुजविला गेला. 

दरम्यान, कल्याण शील रस्त्याच्या कामासंदर्भात उच्च न्यायालयात 2क्क्1क् साली याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी सांगितले की, कल्याण शीळ रस्त्याचे काम चार पदरी करीत असताना रस्त्याचे काम अर्धवट होते. याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आत्ता सहा पदरी काम केले जात असताना पुन्हा रस्ते कामाचा अर्धवटपणाचा पाढा सुरुच आहे. अपघात होत आहे, चार पदरी करताना सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय नव्हता. आत्ताही समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्याप्रकरणी पुन्हा न्यायालयात धाव घ्यावी लागेल. 

टॅग्स :Accidentअपघातkalyanकल्याणcarकारkdmcकल्याण डोंबिवली महापालिका