शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
5
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
6
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
7
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
8
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
9
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
10
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
11
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
12
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
13
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
14
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
15
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
16
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

By अनिकेत घमंडी | Updated: June 10, 2025 05:54 IST

बारा वर्षांत लोकल फेऱ्या वाढल्या नाहीत. मात्र रेल्वेने त्यांचे म्हणणे खरे करून दाखवत वंदे भारत, एसी लोकल आणल्यामुळे उपनगरी लोकल आणखी विलंबाने धावत आहेत. अनेक दिवसांत एकही दिवस लोकल वेळेवर धावलेल्या नाहीत.

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील २१ लाख प्रवासी २०१२ पासून वाढीव लोकल फेऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. इच्छा नसतानाही त्यांच्या माथ्यावर एसी लोकल आणून रेल्वेने सामान्य प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, दिवा, मुंब्रा, कळवा येथील प्रवाशांना दरवाजात लटकत, लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांची वाढलेली संख्या व त्या तुलनेत न वाढलेल्या लोकल या व्यस्त प्रमाणाचा फटका ठाणे व त्यापुढील प्रवाशांना बसत आहे.

बारा वर्षांत लोकल फेऱ्या वाढल्या नाहीत. मात्र रेल्वेने त्यांचे म्हणणे खरे करून दाखवत वंदे भारत, एसी लोकल आणल्यामुळे उपनगरी लोकल आणखी विलंबाने धावत आहेत. अनेक दिवसांत एकही दिवस लोकल वेळेवर धावलेल्या नाहीत.

दिवा, मुंब्रा, कळव्यातील प्रवासी बेहाल

विशेषतः डोंबिवली, दिवा, मुंब्रा आणि कळवा येथील प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. कर्जत, कसारा, खोपोलीच्या लोकल तुडुंब भरून येतात. आता बदलापूर, आसनगाव, टिटवाळा लोकलदेखील खचाखच भरलेल्या असतात. त्यामुळे समस्या वाढली असून, या प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नाही. अनेकांना पाच-सहा लोकल सोडून मग मोठ्या हिमतीने लोकलमध्ये कसेबसे चढावे लागते.

एसी लोकल विलंबाने वेळापत्रक कोलमडले

एसी लोकलच्या ८० फेऱ्या मध्य रेल्वेवर होतात. १६ एप्रिलपासून त्यात वाढ करण्यात आली. एसी लोकल कधीही वेळेवर येत नाहीत. उलट त्या लोकलमुळे अन्य सामान्य लोकल उशिरा धावतात. एसी लोकलला प्रवाशांचा विरोध नाही; परंतु त्या वेळेत धावत नसल्याची खंत आहे. त्यामुळे वेळापत्रकाचा बोजवारा उडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील लाखो प्रवाशांना त्यामुळे कामाच्या ठिकाणी दररोज लेटमार्कला सामोरे जावे लागते.

लोकलपेक्षा लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य ठरते घातक

लांब पल्ल्याच्या गाड्या लोकलपुढे काढल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडत आहे. त्यामुळे जी लोकल येईल त्यात कसेही चढायचे आणि प्रवेश मिळवायचा अशी जीवघेणी स्पर्धा प्रवाशांमध्ये सुरू असते, त्यात अनेकांचा जीव जातो किंवा जखमी होतात. कामावर वेळेवर जायचे असल्याने प्रवासी निमूटपणे सहन करत प्रवास करतात.