शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
4
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
5
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
6
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
7
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
8
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
9
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
10
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
11
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
12
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
13
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
14
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
16
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
17
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
18
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
19
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
20
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा

‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

By अनिकेत घमंडी | Updated: June 10, 2025 05:54 IST

बारा वर्षांत लोकल फेऱ्या वाढल्या नाहीत. मात्र रेल्वेने त्यांचे म्हणणे खरे करून दाखवत वंदे भारत, एसी लोकल आणल्यामुळे उपनगरी लोकल आणखी विलंबाने धावत आहेत. अनेक दिवसांत एकही दिवस लोकल वेळेवर धावलेल्या नाहीत.

अनिकेत घमंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील २१ लाख प्रवासी २०१२ पासून वाढीव लोकल फेऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. इच्छा नसतानाही त्यांच्या माथ्यावर एसी लोकल आणून रेल्वेने सामान्य प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, दिवा, मुंब्रा, कळवा येथील प्रवाशांना दरवाजात लटकत, लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांची वाढलेली संख्या व त्या तुलनेत न वाढलेल्या लोकल या व्यस्त प्रमाणाचा फटका ठाणे व त्यापुढील प्रवाशांना बसत आहे.

बारा वर्षांत लोकल फेऱ्या वाढल्या नाहीत. मात्र रेल्वेने त्यांचे म्हणणे खरे करून दाखवत वंदे भारत, एसी लोकल आणल्यामुळे उपनगरी लोकल आणखी विलंबाने धावत आहेत. अनेक दिवसांत एकही दिवस लोकल वेळेवर धावलेल्या नाहीत.

दिवा, मुंब्रा, कळव्यातील प्रवासी बेहाल

विशेषतः डोंबिवली, दिवा, मुंब्रा आणि कळवा येथील प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. कर्जत, कसारा, खोपोलीच्या लोकल तुडुंब भरून येतात. आता बदलापूर, आसनगाव, टिटवाळा लोकलदेखील खचाखच भरलेल्या असतात. त्यामुळे समस्या वाढली असून, या प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नाही. अनेकांना पाच-सहा लोकल सोडून मग मोठ्या हिमतीने लोकलमध्ये कसेबसे चढावे लागते.

एसी लोकल विलंबाने वेळापत्रक कोलमडले

एसी लोकलच्या ८० फेऱ्या मध्य रेल्वेवर होतात. १६ एप्रिलपासून त्यात वाढ करण्यात आली. एसी लोकल कधीही वेळेवर येत नाहीत. उलट त्या लोकलमुळे अन्य सामान्य लोकल उशिरा धावतात. एसी लोकलला प्रवाशांचा विरोध नाही; परंतु त्या वेळेत धावत नसल्याची खंत आहे. त्यामुळे वेळापत्रकाचा बोजवारा उडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील लाखो प्रवाशांना त्यामुळे कामाच्या ठिकाणी दररोज लेटमार्कला सामोरे जावे लागते.

लोकलपेक्षा लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य ठरते घातक

लांब पल्ल्याच्या गाड्या लोकलपुढे काढल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडत आहे. त्यामुळे जी लोकल येईल त्यात कसेही चढायचे आणि प्रवेश मिळवायचा अशी जीवघेणी स्पर्धा प्रवाशांमध्ये सुरू असते, त्यात अनेकांचा जीव जातो किंवा जखमी होतात. कामावर वेळेवर जायचे असल्याने प्रवासी निमूटपणे सहन करत प्रवास करतात.