शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

अभय योजनेतून आतापर्यंत 27 कोटी रुपयांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 01:08 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका : १०० काेटींच्या वसुलीचे लक्ष्य

कल्याण : मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने १५ ऑक्टोबरपासून अभय योजना लागू केली आहे. आतापर्यंत या योजनेतून मनपाच्या तिजोरीत २७ कोटी रुपये जमा झाले आहेत. मालमत्ताकर वसुली विभागाच्या हाती आता ३६ दिवस असून, वसुलीचा वेग वाढवल्यास १०० कोटींचे लक्ष्य गाठता येईल, असे सूत्रांनी सांगितले.

अभय योजनेंतर्गत मालमत्ताकर थकबाकीदारांनी एकूण थकबाकीच्या २५ टक्के रक्कम भरल्यास त्यावरील ७५ टक्के व्याज व दंडाची रक्कम माफ केली जाणार आहे. मालमत्ताकराच्या थकबाकीपोटी एक हजार ३८१ कोटी रुपये येणे बाकी आहेत. ही रक्कम मिळाल्यास मनपाची आर्थिक स्थिती सुधारू शकते. यापूर्वीही मनपाने मालमत्ताकराच्या वसुलीसाठी सरसकट अभय योजना लागू केली होती. त्यावेळी एक हजार कोटी रुपये वसूल होतील, असा दावा तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांनी केला होता. मात्र, तेव्हा केवळ ६७ कोटींची वसुली झाली. आता विद्यमान आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही १५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत अभय योजना लागू केली असून, १०० कोटींची वसुली अपेक्षित आहे. मात्र, १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत २७ कोटींची वसुली झाली आहे.

दरम्यान, अभय योजनेव्यतिरिक्त मनपाने यंदा मालमत्ताकराच्या वसुलीचे लक्ष्य ३५० कोटी रुपये ठेवले आहे. अभय योजनेतील २७ कोटींची रक्कम धरून मनपाने आतापर्यंत १६४ कोटींची मालमत्ताकर वसुली केली आहे. मात्र, वर्षभराच्या वसुलीचे ३५० कोटी व अभय योजनेतून १०० कोटी, असे एकूण ४५० कोटींचे लक्ष्य केडीएमसीला गाठायचे आहे.

१,२०० कोटींची येणी थकीतअनेक बिल्डरांची खुल्या जागेवरील कामे सुरू नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून मालमत्ताकराची वसुली रखडली आहे. दुसरीकडे एनआरसी कंपनीकडून ११४ कोटींची थकबाकी येणे बाकी आहे. मात्र, कंपनी २००९ पासून बंद असल्याने ही रक्कम वसूल होत नाही. थकबाकीची अनेक प्रकरणे ही वादग्रस्त व न्यायप्रविष्ट असल्याने महापालिकेची जवळपास १,२०० कोटी रुपयांची येणी थकली आहेत. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका