शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

"रस्ते प्रकल्पातील बाधितांना पात्र होण्याकरीता २०१६ सालपर्यतची डेडलाईन ठेवावी"

By मुरलीधर भवार | Updated: January 25, 2023 17:24 IST

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मागणी, आयुक्तांची घेतली भेट

कल्याण-कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीतील अनेक जणांची घरे रस्ते विकास प्रकल्पात बाधित झाली आहे. बाधितांची घरे २०१६ पर्यंत असतील. त्यांनाच बीएसयूपी घरकूल प्रकल्पात घर देण्यात यावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांडगे यांच्याकडे केली आहे.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कल्याण पश्चिमेचे शहर प्रमुख रवी पाटील यांच्या शिष्टमंडळाने आज आयुक्त दांगडे यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी पक्षाचे पदाधिकारी मोहन उगले, गणोश जाधव, श्रेयस समेळ, सुनिल वायले, विद्याधर भोईर, संजय पाटील, नेत्र उगले आदी उपस्थित होते. महापालिकेच्या रस्ते प्रकल्पात बाधित झालेल्यांना बीएसयूपी योजनेत घर दिले जाणार आहे. मात्र त्यासाठी बाधितांची घरे ही २०१६ च्या आधीची असावी अशी डेडलाईन निश्चीत करावी अशी मागणी करण्यात आली. या वेळी आयुक्तांनी नवे पुनर्वसन धोरण निश्चित केले जात आहे. त्यात या मागणीचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे.

केडीएमटीच्या ताफ्यात टप्प्या टप्प्याने २०७ ई बसेस दाखल होणार आहे. त्यासाठी चार्जिग स्टेशन उभारले जावेत. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला, पदपथावर असलेल्या खाद्य पदार्थ विक्रीच्या गाड्या, बॅनर्स टपऱ्या हटविण्यात याव्यात. ही कारवाई केली जात असली तरी ती मंद गतीने सुरु आहे. ही कारवाई तीव्र करण्यात यावी अशी मागणी केली गेली. त्यावर आयुक्तांनी सध्या मनुष्यबळ कमी आहे. आऊटसोर्सिंगद्वारे २०० माणसे घेऊन कारवाई गतीमान केली जाईल असे आश्वासन दिले आहे. शहरात सुशोभिकरणाची मोहिम राबविली जात असली तरी शहर सुशोभिकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटीचा निधी द्यावा अशी मागणी केली आहे. काळा तलावाचे सुशोभिकरण स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून केले जात आहे. तसेच बीएसयूपीतील ४ हजार घरांचे वाटप येत्या महिन्यात मुख्यमंत्र्याच्या हस्ते केले जाणार असल्याची बाब आयुक्तांसमोर शहर प्रमुख शहर प्रमुख पाटील यांनी मांडली.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली