शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

सर्व पक्षीय युवा मोर्चा आंदोलकांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By मुरलीधर भवार | Updated: July 8, 2024 16:08 IST

कल्याण : २७ गावातील सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने सोनारपाडा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या ...

कल्याण : २७ गावातील सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने सोनारपाडा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी धरणे आंदोलन करणाऱ्या २२ जणांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवा मोर्चाचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्यासह संतोष केणे, हुनमान पाटील, महेश संते, कर्सन पाटील, मधूकर माळी, संदीप पालकरी, शिवाजी माळी, मधूकर पाटील, सुनिल पाटील, रामचंद्र पाटील, अजित म्हात्रे, शिरीषकुमार म्हात्रे, उत्कर्ष म्हात्रे, महादू म्हात्रे, संजय म्हात्रे, अनिल म्हात्रे, विनय म्हात्रे, कुणाल पाटील, दीपक म्हत्रे आणि रतन पाटील या २२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ गावे कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्यात यावी. तसेच कल्याण शीळ रस्ते बाधितांना मंजूर केलेला मोबदला त्वरीत देण्यात यावा. कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या कामामुळे नागरीकांना होत असलेला त्रास दूर करण्यात यावा. या विविध मागण्याकरीता पावसाळी अधिवेशनानिमित्त राज्य सरकारचे लक्ष वेधण्याकरीता धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.

आंदोलकांनी पोलिस ठाण्याकडे परवानगी मागितली होती. पोलिसांनी परवानगी दिलेली नसताना धरणेआंदोलन सुुरु करण्यात आले. आंदोलकांनी उपोषणाचा मंडप उभारण्याकरीता रस्ता खोदून खड्डे केले. मंडप उभारण्याची परवानगी महापालिकेकडून घेतली नाही. या कारणास्तव पोलिसांनी आंदोलकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी सांगितले की, पोलिसांनी परवानी दिली नाही. हे खरे असले तरी ज्या जागेत उपोषणाचा मंडप उभारला ती जागा महापालिकेची नसून एमआयडीसीची आहे. धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. २७ गावांच्या मागण्यासंदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारने आमच्या मागण्याची दखल घेतली नाही तर स्थगित केलेल आंदोलन सर्व परवानग्या घेऊन पुन्हा केले जाईल असा इशारा पाटील यांनी दिला आहे .

टॅग्स :kalyanकल्याण