शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सर्व पक्षीय युवा मोर्चा आंदोलकांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By मुरलीधर भवार | Updated: July 8, 2024 16:08 IST

कल्याण : २७ गावातील सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने सोनारपाडा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या ...

कल्याण : २७ गावातील सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने सोनारपाडा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी धरणे आंदोलन करणाऱ्या २२ जणांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवा मोर्चाचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्यासह संतोष केणे, हुनमान पाटील, महेश संते, कर्सन पाटील, मधूकर माळी, संदीप पालकरी, शिवाजी माळी, मधूकर पाटील, सुनिल पाटील, रामचंद्र पाटील, अजित म्हात्रे, शिरीषकुमार म्हात्रे, उत्कर्ष म्हात्रे, महादू म्हात्रे, संजय म्हात्रे, अनिल म्हात्रे, विनय म्हात्रे, कुणाल पाटील, दीपक म्हत्रे आणि रतन पाटील या २२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ गावे कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्यात यावी. तसेच कल्याण शीळ रस्ते बाधितांना मंजूर केलेला मोबदला त्वरीत देण्यात यावा. कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या कामामुळे नागरीकांना होत असलेला त्रास दूर करण्यात यावा. या विविध मागण्याकरीता पावसाळी अधिवेशनानिमित्त राज्य सरकारचे लक्ष वेधण्याकरीता धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.

आंदोलकांनी पोलिस ठाण्याकडे परवानगी मागितली होती. पोलिसांनी परवानगी दिलेली नसताना धरणेआंदोलन सुुरु करण्यात आले. आंदोलकांनी उपोषणाचा मंडप उभारण्याकरीता रस्ता खोदून खड्डे केले. मंडप उभारण्याची परवानगी महापालिकेकडून घेतली नाही. या कारणास्तव पोलिसांनी आंदोलकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी सांगितले की, पोलिसांनी परवानी दिली नाही. हे खरे असले तरी ज्या जागेत उपोषणाचा मंडप उभारला ती जागा महापालिकेची नसून एमआयडीसीची आहे. धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. २७ गावांच्या मागण्यासंदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारने आमच्या मागण्याची दखल घेतली नाही तर स्थगित केलेल आंदोलन सर्व परवानग्या घेऊन पुन्हा केले जाईल असा इशारा पाटील यांनी दिला आहे .

टॅग्स :kalyanकल्याण