शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सर्व पक्षीय युवा मोर्चा आंदोलकांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By मुरलीधर भवार | Updated: July 8, 2024 16:08 IST

कल्याण : २७ गावातील सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने सोनारपाडा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या ...

कल्याण : २७ गावातील सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने सोनारपाडा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी धरणे आंदोलन करणाऱ्या २२ जणांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवा मोर्चाचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्यासह संतोष केणे, हुनमान पाटील, महेश संते, कर्सन पाटील, मधूकर माळी, संदीप पालकरी, शिवाजी माळी, मधूकर पाटील, सुनिल पाटील, रामचंद्र पाटील, अजित म्हात्रे, शिरीषकुमार म्हात्रे, उत्कर्ष म्हात्रे, महादू म्हात्रे, संजय म्हात्रे, अनिल म्हात्रे, विनय म्हात्रे, कुणाल पाटील, दीपक म्हत्रे आणि रतन पाटील या २२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ गावे कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्यात यावी. तसेच कल्याण शीळ रस्ते बाधितांना मंजूर केलेला मोबदला त्वरीत देण्यात यावा. कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या कामामुळे नागरीकांना होत असलेला त्रास दूर करण्यात यावा. या विविध मागण्याकरीता पावसाळी अधिवेशनानिमित्त राज्य सरकारचे लक्ष वेधण्याकरीता धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.

आंदोलकांनी पोलिस ठाण्याकडे परवानगी मागितली होती. पोलिसांनी परवानगी दिलेली नसताना धरणेआंदोलन सुुरु करण्यात आले. आंदोलकांनी उपोषणाचा मंडप उभारण्याकरीता रस्ता खोदून खड्डे केले. मंडप उभारण्याची परवानगी महापालिकेकडून घेतली नाही. या कारणास्तव पोलिसांनी आंदोलकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी सांगितले की, पोलिसांनी परवानी दिली नाही. हे खरे असले तरी ज्या जागेत उपोषणाचा मंडप उभारला ती जागा महापालिकेची नसून एमआयडीसीची आहे. धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. २७ गावांच्या मागण्यासंदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारने आमच्या मागण्याची दखल घेतली नाही तर स्थगित केलेल आंदोलन सर्व परवानग्या घेऊन पुन्हा केले जाईल असा इशारा पाटील यांनी दिला आहे .

टॅग्स :kalyanकल्याण