शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कल्याणच्या पत्री पुलाचा ७०० मेट्रिक टन गर्डर ३९ मीटर पुढे सरकवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 17:40 IST

उद्या उर्वरीत भाग 4 तासाचा मेगा ब्लॉक घेऊन गर्डर पुढे सरकवला जाणार

कल्याण-कलाणच्या पत्री पूलाचा ७०० मेट्रिक टन वजनाचा भला मोठा गर्डर आज चार तासाचा रेल्वे मेगा ब्लॉक घेऊन ३९ मीटर पुढे सरकविला गेला आहे. उद्या उर्वरीत भाग 4 तासाचा मेगा ब्लॉक घेऊन पुढे सरकवला जाणार आहे. या कामाच्या पाहणीसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कल्याणमध्ये आले होते. त्यांनी कामाच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले आहे.कल्याणच्या ब्रिटिशकालीन पत्री पूल वाहतूकीच्या दृष्टीने धोकादायक झाल्याने तो पाडण्यात आला होता. गेल्या दोन वर्षापासून या पत्री पूलाचे काम सुरु आहे. त्यात काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यासाठी खासदास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. ७०० मेट्रीक टन वजनाचा गर्डरचे पार्ट हैद्राबाद येथील कंपनीत तयार करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे फिटींग कल्याण येथे करण्यात आले. आज चार तासाचा मेगाब्लॉक घेऊन हायड्रोलिक पद्धतीने पूलाचा ३९ मीटर भाग आज पुढे सरकविला गेला. या कामाची सुरुवात करण्यापूर्वी खासदास शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांसह कल्याण पूव्रेतील जरीमरी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर खासदार शिंदे हे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी आले. याठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रमुख राधेश्याम मोपलवार, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर विनीता राणे, आमदार विश्वनाथ भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.पत्री पूलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी करुन पर्यावरण  मंत्री ठाकरे यांनी सांगितले की, पत्री पूलाचा प्रश्न मोठा होता. तो आत्ता मार्गी लागत आहे. त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत  शिंदे यांनी विशेष पाठपुरावा केला आहे. विकासाची कामे संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. राज्यभरातील जी काही रखडलेली पूलाची आणि रस्तायीची कामे आहेत. ती मार्गी लावली जातील. येत्या वर्षभरात समृद्धी महामार्गाचेही काम मार्गी लावण्याचा सरकारकारचा प्रयत्न आहे.या पूलाच्या गर्डर टाकण्याच्या वेळीच विरोधकांकडून टिका केली जात असल्याविषयी पर्यावरण मंत्री ठाकरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, निवडणूकीपूरती राजकारण करणो मी समजू शकतो. आमची शिवसेना निवडणूक संपली की, कामे पूर्ण करण्याकडे लक्ष्य देते. अन्य पक्ष निवडणूकीनंतरही बारा महिने राजकारण करतात. त्यांना त्यांचे राजकारण करु द्या आम्ही जनतेची कामे करु असा टोला विरोधकांना ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे.आज गर्डर टाकण्याच्या कामाच्या वेळी रेल्वेचे अभियांत्रिकी विभागाचे विविध अधिकारी, रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि पोलिस यांचा भला मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या पूलाच्या कामाचा पाठपुरावा करणारे खासदार शिदे यांनी सांगितले की, ही एक ऐतिहासिक घटना आहे. पुढील ३०० वर्षे हा पूल टिकेल असे या पूलाचे निर्माण करण्यात आले आहे.