शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

२७ गावांची नगरपालिका करा अन्यथा प्रश्न तरी सोडवा; सर्व पक्षीय संघर्ष समितीने घेतली श्रीकांत शिंदेंची भेट

By मुरलीधर भवार | Updated: October 28, 2022 14:31 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वेगळी करून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करा अन्यथा 27 गावातील प्रश्न तरी सोडवा, असे साकडे सर्व पक्षीय संघर्ष समितीने राज्य सरकारकडे घातले आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वेगळी करून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करा अन्यथा 27 गावातील प्रश्न तरी सोडवा असे साकडे सर्व पक्षीय संघर्ष समितीने राज्य सरकारकडे घातले आहे.

काही दिवसापूर्वी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना २७ गावांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करण्याकरीता एक निवेदन सादर केले होते. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकर बैठक लावू असे समितीच्या पदाधिका:यांना आश्वासीत केले होते. काल पुन्हा समितीचे पदाधिकारी गुलाब वझे, रंगनाथ ठाकूर, शरद पाटील, गुरुनाथ म्हात्रे, चेतन म्हात्रे, रामकृष्ण पाटील, विश्वनाथ रसाळ, विजय पाटील यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. २७ गाव प्रश्नी लवकर बैठक लावण्याचा आग्रह धरला आहे.

२७ गावे २००२ साली महापालिकेतून वगळण्यात आलेली असताना ती पुन्हा २०१५ साली समाविष्ट केली गेली. ती पुन्हा वगळून त्याची स्वतंत्र नगरपालिका तयार करण्याची मागणी लावून धरण्यात आली. महाविकास आघाडीने २७ पैकी १८ गावे वगळून त्याची स्वतंत्र नगरपालिका तयार करण्याचे जाहिर केले. सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. ही गावे वगळण्याचा निर्णय आत्ता सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. संघर्ष समितीच्या मते २७ पैकी १८ गावे न वगळता सगळीच गावे वगळण्यात यावी अशी मागणी केली. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय हा अर्धवट होता. या निर्णयातून समितीची मागणी पूर्णत: मंजूर झालेली नव्हती. त्यातून पुन्हा तांगडे निर्माण झाले. त्यामुळे हा वाद न्यायालयात गेला. 

या सगळ्य़ा प्रक्रियेत २७ गावे काही वेगळी झाली नाहीत. तसेच २७ गावातील नागरी समस्या सुटलेल्या नाहीत. २७ गावात पाणी टंचाईचा प्रश्न आहे. २७ गावातील अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्णत: मार्गी लागलेले नाही. बडय़ा बिल्डरांना विकास परवानग्या दिल्या जात आहे. गावातील नागरीकांना बांधकाम परवानगी मिळत नाही. कल्याण ग्रोथ सेंटर कागदावरच आहे. ते रद्द करण्यात यावे. २७ गावातील रस्ते विकासाचा प्रश्न आहे. गावातील कचरा महापालिकेकडून उचलला जात नाही. मालमत्ता कराची आकारणी अव्वाच्या सव्वा करण्यात आलेली आहे. या समस्या सोडविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने २७ गावाकरीता एक विकासाचे पॅकेज जाहिर करावे अशी मागणी समितीच्या वतीने केली जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका