शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांची नगरपालिका करा अन्यथा प्रश्न तरी सोडवा; सर्व पक्षीय संघर्ष समितीने घेतली श्रीकांत शिंदेंची भेट

By मुरलीधर भवार | Updated: October 28, 2022 14:31 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वेगळी करून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करा अन्यथा 27 गावातील प्रश्न तरी सोडवा, असे साकडे सर्व पक्षीय संघर्ष समितीने राज्य सरकारकडे घातले आहे.

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेतून २७ गावे वेगळी करून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करा अन्यथा 27 गावातील प्रश्न तरी सोडवा असे साकडे सर्व पक्षीय संघर्ष समितीने राज्य सरकारकडे घातले आहे.

काही दिवसापूर्वी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना २७ गावांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करण्याकरीता एक निवेदन सादर केले होते. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकर बैठक लावू असे समितीच्या पदाधिका:यांना आश्वासीत केले होते. काल पुन्हा समितीचे पदाधिकारी गुलाब वझे, रंगनाथ ठाकूर, शरद पाटील, गुरुनाथ म्हात्रे, चेतन म्हात्रे, रामकृष्ण पाटील, विश्वनाथ रसाळ, विजय पाटील यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. २७ गाव प्रश्नी लवकर बैठक लावण्याचा आग्रह धरला आहे.

२७ गावे २००२ साली महापालिकेतून वगळण्यात आलेली असताना ती पुन्हा २०१५ साली समाविष्ट केली गेली. ती पुन्हा वगळून त्याची स्वतंत्र नगरपालिका तयार करण्याची मागणी लावून धरण्यात आली. महाविकास आघाडीने २७ पैकी १८ गावे वगळून त्याची स्वतंत्र नगरपालिका तयार करण्याचे जाहिर केले. सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. ही गावे वगळण्याचा निर्णय आत्ता सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. संघर्ष समितीच्या मते २७ पैकी १८ गावे न वगळता सगळीच गावे वगळण्यात यावी अशी मागणी केली. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय हा अर्धवट होता. या निर्णयातून समितीची मागणी पूर्णत: मंजूर झालेली नव्हती. त्यातून पुन्हा तांगडे निर्माण झाले. त्यामुळे हा वाद न्यायालयात गेला. 

या सगळ्य़ा प्रक्रियेत २७ गावे काही वेगळी झाली नाहीत. तसेच २७ गावातील नागरी समस्या सुटलेल्या नाहीत. २७ गावात पाणी टंचाईचा प्रश्न आहे. २७ गावातील अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्णत: मार्गी लागलेले नाही. बडय़ा बिल्डरांना विकास परवानग्या दिल्या जात आहे. गावातील नागरीकांना बांधकाम परवानगी मिळत नाही. कल्याण ग्रोथ सेंटर कागदावरच आहे. ते रद्द करण्यात यावे. २७ गावातील रस्ते विकासाचा प्रश्न आहे. गावातील कचरा महापालिकेकडून उचलला जात नाही. मालमत्ता कराची आकारणी अव्वाच्या सव्वा करण्यात आलेली आहे. या समस्या सोडविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने २७ गावाकरीता एक विकासाचे पॅकेज जाहिर करावे अशी मागणी समितीच्या वतीने केली जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका