शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

कल्याणमध्ये ११ वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By मुरलीधर भवार | Updated: July 11, 2024 15:40 IST

आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव अनिश अनिल दळवी (१७) असे आहे.

कल्याण-कल्याण तालुक्यातील निंबवली गावात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव अनिश अनिल दळवी (१७) असे आहे. तो कल्याण मुरबाड राेडनजीक जूनियर कॉलेजमध्ये इयत्ता ११ वीच्या वर्गात शिकत होता.

अनिशने गैरवर्तन केल्याने कॉलेजने त्याच्यासह चार विद्यार्थ्यांना तुमचा दाखला घरी पाठवतो अशी ताकीद देत घरी पाठवून दिले होते. आपल्याला शाळेतून काढून टाकले जाईल या गोष्टीचा धसका अनिशने घेतला होता. तो काल बुधवारी घरी आला. त्याने घरी येऊन गळफास घेत आपले जीवन संपविले आहे. अनिशचा मृतदेह बुधवारी रात्री कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता. या ठिकाणी अनिशचे नातेवाईक उपस्थित होते.

त्यांनी सांगितले की, कॉलेजने अनिशला अपमानास्पद वागणूक दिली. एखादा मुलगा काही गैर प्रकार करतो तर त्याची माहिती कॉलेज व्यवस्थानाने पालकांना द्यायला हवी होती. अनिशसह अन्य तीन विद्यार्थ्यांनीही गैर प्रकार केला होता. त्या तीन विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून घेत घडला प्रकार सांगितला होता. अनिशच्या पालकांना काही एक सूचित करण्यात आले नाही. या प्रकरणात टिटवाळा पोलिस ठाण्यात अनिशच्या मृत्यूची नाेंदक आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. पालकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे टिटवाळा पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. या प्रकरणी कॉलेज प्रशासनाने अनिशच्या नातेवाईंकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. अनिशसह अन्य तीन विद्यार्थ्यांनी गैरकृत्य केले होते. त्यांच्याकडून पुन्हा गैरकृत्य होऊ नये यासाठी चौघांच्या कॉलेजमधून काढून टाकले जाईल अशी ताकीद दिली होती. त्यांना शिस्त लावण्यासाठी ही ताकीद दिली होती.

टॅग्स :kalyanकल्याण