शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये ११ वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By मुरलीधर भवार | Updated: July 11, 2024 15:40 IST

आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव अनिश अनिल दळवी (१७) असे आहे.

कल्याण-कल्याण तालुक्यातील निंबवली गावात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव अनिश अनिल दळवी (१७) असे आहे. तो कल्याण मुरबाड राेडनजीक जूनियर कॉलेजमध्ये इयत्ता ११ वीच्या वर्गात शिकत होता.

अनिशने गैरवर्तन केल्याने कॉलेजने त्याच्यासह चार विद्यार्थ्यांना तुमचा दाखला घरी पाठवतो अशी ताकीद देत घरी पाठवून दिले होते. आपल्याला शाळेतून काढून टाकले जाईल या गोष्टीचा धसका अनिशने घेतला होता. तो काल बुधवारी घरी आला. त्याने घरी येऊन गळफास घेत आपले जीवन संपविले आहे. अनिशचा मृतदेह बुधवारी रात्री कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता. या ठिकाणी अनिशचे नातेवाईक उपस्थित होते.

त्यांनी सांगितले की, कॉलेजने अनिशला अपमानास्पद वागणूक दिली. एखादा मुलगा काही गैर प्रकार करतो तर त्याची माहिती कॉलेज व्यवस्थानाने पालकांना द्यायला हवी होती. अनिशसह अन्य तीन विद्यार्थ्यांनीही गैर प्रकार केला होता. त्या तीन विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून घेत घडला प्रकार सांगितला होता. अनिशच्या पालकांना काही एक सूचित करण्यात आले नाही. या प्रकरणात टिटवाळा पोलिस ठाण्यात अनिशच्या मृत्यूची नाेंदक आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. पालकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे टिटवाळा पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. या प्रकरणी कॉलेज प्रशासनाने अनिशच्या नातेवाईंकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. अनिशसह अन्य तीन विद्यार्थ्यांनी गैरकृत्य केले होते. त्यांच्याकडून पुन्हा गैरकृत्य होऊ नये यासाठी चौघांच्या कॉलेजमधून काढून टाकले जाईल अशी ताकीद दिली होती. त्यांना शिस्त लावण्यासाठी ही ताकीद दिली होती.

टॅग्स :kalyanकल्याण