शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

धावत्या रेल्वेच्या चाकांवर वाळू का टाकली जाते? कारण जाणून तुम्हीही शॉक व्हाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 10:02 IST

Indian Railway Sand on Track: रस्त्यावर वाळू पडलेली असेल कार, दुचाकी घसरते हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे. भारतीय रेल्वे असे का बरे करत असेल... का त्यांना प्रवाशांच्या जिवाची पर्वा नाहीय का?

रस्त्यावर वाळू पडलेली असेल कार, दुचाकी घसरते हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे. पण आधीच काहीच ग्रिप नसलेल्या रेल्वेच्या चाक आणि रुळावर वाळू टाकली जाते हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. पण हे खरे आहे. असे का केले जाते याची अनेकांना माहिती नसते. यामागे एक महत्वाचे कारण आहे. 

भारतीय रेल्वे असे का बरे करत असेल... का त्यांना प्रवाशांच्या जिवाची पर्वा नाहीय का? अहो प्रवाशांच्या जिवाची पर्वा आहे म्हणूनच तर धावत्या रेल्वेच्या चाकांवर वाळू टाकली जाते. रस्त्यावर घसरण्यास कारणीभूत ठरलेल्या या रेतीचा वापर ट्रेन थांबविण्यासाठी केला जातो.  

रेल्वे ठराविक अंतराने किंवा ब्रेक लावताना चाकांवर वाळू टाकली जाते. रुळही लोखंडाचे आणि चाकही लोखंडाचेच असते. ते घासून घासून एवढे तुळतुळीत असते की ते पुढे जाण्यासाठी किंवा थांबण्यासाठी ग्रिप पकडू शकत नाही. यामुळे रेल्वे रुळ आणि चाकामध्ये वाळूचे कण टाकले जातात. जेणेकरून त्यांच्यातील घर्षण वाढते. 

हे केव्हा केले जाते...जेव्हा ट्रेन चढणीला असते किंवा उताराला असते. जेव्हा ट्रेन अचानक किंवा वेग कमी करण्यासाठी ब्रेक लावले जातात, अशा वेळी रेल्वेचे चाक आणि रुळावरील घर्षण वाढविण्यासाठी चाकाजवळच्या सँड बॉक्समधून ही वाळू हळूहळू टाकली जाते. यामुळे या ट्रेन न घसरता सुरक्षित रित्या थांबतात किंवा पुढे जातात.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे