शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
2
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
3
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
4
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
5
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
6
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
7
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
9
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
10
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
11
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
12
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
13
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
14
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
15
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
16
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
17
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
18
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
19
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

धोका वाढला! गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर घातक जेलीफिशचा कहर; २ दिवसात ९० लोक झाले शिकार

By manali.bagul | Updated: November 22, 2020 17:18 IST

गेल्या काही दिवसात ९० लोकांना जेलीफिशने दंश केला आहे. या विषारी माश्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

(Image Credit- Aajtak)

गोव्याचा समुद्र किनारा आपल्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे. नेहमीच मोठ्या संख्येने लोक गोव्याच्या किनाऱ्यावर फिरायला जातात. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर आता अनेकजण गोव्याला जाण्याच्या विचारात असतील. पण समुद्र किनाऱ्यावर फिरणं आता धोकादायक ठरू शकते. कारण गोव्याच्या बीचवर घातक, विषारी जेलीफिशने कहर केला आहे. गेल्या काही दिवसात ९० लोकांना जेलीफिशने दंश केला आहे. या विषारी माश्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मागच्या दोन दिवसात बागा कॅलंग्यूट बीचवर ५५ पेक्षा जास्त लोकांना जेलीफिशने दंश केला आहे. कँडोलिम बीचवर या विषारी माश्याने १० लोकांना दंश केला आहे. दक्षिण गोव्यात २५ पेक्षा जास्तवेळा अशा घटना घडल्या आहेत. विषारी जेलीफिशने दंश केल्यानंतर  लोकांना प्राथमिक उपचारांची आवश्यकता असते. जेलीफिशच्या संपर्कात आल्यानंतर शरीराला  वेदना होतात तसंच शरीराच्या ज्या भागावर जेली फिशने दंश केला आहे तो भाग सुन्न  होतो. याव्यतिरिक्त या माश्याच्या संपर्कात आल्याने काहीवेळासाठी त्वचेवर संवेदना जाणवत नाहीत. 

इंग्रजी माध्यमांच्या रिपोर्टनुसार बागा बीचवर ही दुर्घटना घडल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती. ऑक्सिजन लावल्यानंतर पिडीत व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवण्यात आले. जेलीफीशने डंक मारल्यानंतर एका व्यक्तीच्या छातीत वेदना झाल्या नंतर श्वास घ्यायला त्रास झाला. बाबो! 'या' राजकुमारीचे बॉडीगार्डशी प्रेमसंबंध; अन् तोंड बंद ठेवायला दिले तब्बल १२ कोटी

जेलिफिश दोन प्रकारचे असतात.  एक सामान्य आणि दुसरा प्रकार विषारी असतो. जेलीफिशच्या दंशामुळे लोकांच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे नुकसान पोहोचू शकतं. संपर्कात आल्यानंतर जळजळ होण्याची समस्या उद्भवते. जेलीफिशच्या संपर्कात आल्यानंतर खूप कमीवेळा अशी स्थिती उद्भवते. सध्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. दिसायला चांगली नव्हती म्हणून पार्टनरनं केलं ब्रेकअप; मग हिनं सर्जरी केली अन् आता... पाहा फोटो

टॅग्स :goaगोवाTravel Tipsट्रॅव्हल टिप्सHealthआरोग्य