शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने प्रवास करताना केवळ ४५ रूपयात मिळतो विमा, जाणून घ्या काय आहेत याचे नियम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 13:10 IST

Indian Railway Insurance :तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, रेल्वेच्या या विम्यासाठी तुम्हाला केवळ ४५ पैसे द्यावे लागतात.

Indian Railway: भारतात नेहमीच रेल्वे अपघात होत असतात. अनेकदा या अपघातांमध्ये प्रवाशांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपला जीव गमवावा लागतो. पण अनेकांना रेल्वेच्या नियमांबाबत फार कमी असते. जसे की, रेल्वेकडून विमाही दिला जातो. मात्र, रेल्वेच्या या विम्याच्या फायदा अशाच लोकांना मिळतो जे तिकीट खरेदी करताना विमा म्हणजे इन्शुरन्स घेतात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, रेल्वेच्या या विम्यासाठी तुम्हाला केवळ ४५ पैसे द्यावे लागतात.

कधी मिळतो इन्शुरन्स?

रेल्वेचा इन्शुरन्स केवळ अशाच लोकांना मिळतो जे ऑनलाईन तिकीट बुक करतात. तिकीट काऊंटवरून तिकीट घेतल्यावर रेल्वेचा इन्शुरन्स मिळत नाही. सोबतच जनरल डब्यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही हा इन्शुरन्स मिळत नाही. हा विमा ऑप्शनल आहे. म्हणजे हा तुम्हाला हवा की नको हे तुमच्यावर अवलंबून आहे.

किती रूपयांचा असतो विमा?

तुम्ही प्रवास करत असताना जर रेल्वेचा अपघात झाला तर तुम्हाला या विम्यामुळे नुकसान भरपाई मिळते. रेल्वेच्या अपघातात जर प्रवाशाचा मृत्यू झाला तर १० लाख रूपये मिळतात. जर अपघातात कुणी दिव्यांग झालं तर त्यांनाही १० लाख रूपये मिळतात. तर कुणी जखमी झाले तर त्यांना २ लाख रूपये नुकसान भरपाई मिळते.

कसा काढाल विमा

रेल्वेचा विमा अशा लोकांना मिळतो जे लोक ऑनलाईन तिकीट काढतात. जेव्हा तुम्ही ऑनलाईन तिकीट बूक करता तेव्हा वेबसाईट किंवा अॅपवर तुम्हाला विम्याचा पर्याय मिळतो. विम्यासाठी तुम्हाला फक्त ४५ पैसे द्यायचे आहेत. विम्याचा पर्याय निवडल्यावर तुम्हाला ई-मेल आयडी किंवा मोबाइल नंबरवर एक लिंक मिळेल. ही लिंक विमा देणाऱ्या कंपनीची असते. या लिंकवर क्लिक करून तुम्ही नॉमिनीची माहिती भरू शकता. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स