शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

तणावात आहात? मग करून पाहा या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 13:08 IST

आपण मानसिक अनारोग्याच्या विळख्यात अधिक अडकत आहोत. कोणत्याही कारणाने आपल्यावर मानसिक स्थिंत्यतरं ओढावत असतात.

ठळक मुद्देमित्रांशी बिनधास्त भांडा. मनातला राग शांत होईपर्यंत भांडा. समोरून काहीच उत्तर येणार नसलं तरी आपलं मन हलकं होत असतंतणावात असाल तर जुने रोमँटिक चॅट पुन्हा शोधून वाचू शकता.

धावपळीच्या युगात आपलं आपल्यावरंचं नियंत्रण हरवत चाललं आहे. त्यामुळेच आपण मानसिक अनारोग्याच्या विळख्यात अधिक अडकत आहोत. कोणत्याही कारणाने आपल्यावर मानसिक स्थिंत्यतरं ओढावत असतात. या तणावातून बाहेर पडण्यासाठी अनेक गोष्टींचा अवलंब करता येतो. योगा, बागेत चालणे, गप्पा मारणे यांव्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही तणावातून बाहेर येऊ शकता. या गोष्टी म्हणजे अगदीच तुमच्या आमच्या आवडत्या छंदाबद्दलही असू शकतात.

विनोदी चित्रपट पहा

सध्या अनेक विनोदी चित्रपट येतात. त्यातले काही अगदीच टुक्कार असतात. पण जुने विनोदी चित्रपट पाहून तुम्ही तुमचा तणाव नक्कीच दूर करू शकता. अगदी दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे इथपासून बॉलिवूडमधील शक्ती कपूर, जॉनी लिव्हर यांचे जुने चित्रपट पाहून तुम्ही तुमचा तणाव हलका करू शकता.

कार्टुन्स पहा

लहान मुलं कार्टुन्स पाहतात आणि मनमुराद  आनंद लुटतात. आपणही आपल्या बालपणी भरपूर कार्टुन्स पाहिले असतील. पण तुम्हाला माहितेय का कार्टुन्स पाहूनही आपला स्ट्रेस कमी होऊ शकतो. टॉम अॅण्ड जेरीच्या अनेक सिरीज आजही युट्यूबवर पहायला मिळतात. त्यामुळे प्रवासादरम्यानही तुम्ही या सिरीज पाहू शकता. कार्टुन बघणं फक्त लहान मुलांचंच काम आहे हा गैरसमज सोडून द्या. अजूनही कित्येक तरुण कार्टुन्सचा आनंद घेत असतात.

मित्रांशी भांडा

आपल्या आयुष्यात एखादा मित्र किंवा मैत्रिण अशी असते, जिच्यावर आपण हक्काने रागवू शकतो, अगदी विनाकारण. तुम्ही तणावात असाल आणि भांडणाची इच्छा असेल तर तुम्ही बिनधास्त त्यांच्याशी भांडा. मनातला राग शांत होईपर्यंत भांडा. मग ते भांडण कोणत्याही विषयावर असू शकतं. तुमचा राग शांत झाल्यावर तुमच्या भांडण्यामागचं कारण तुमच्या मित्राला सांगा नाहीतर तुमची मैत्री तुटू शकते. 

प्राण्यांशी गप्पा मारा

कधी कधी आपल्या मनातील गोष्टी आपण कोणासमोरच बोलू शकत नाही. त्यामुळे आपला तणाव वाढू शकतो. अशावेळेस आपल्याकडील पाळीव प्राण्यांशी गप्पा मारा. अगदी मित्र-मैत्रिणींप्रमाणे गप्पा मारा. समोरून काहीच उत्तर येणार नसलं तरी आपलं मन हलकं होत असतं, त्यामुळे काही प्रमाणात आपला तणावही हलका होतो.

इंटरनेटवरील सर्च हिस्ट्री चेक करा

तणावातून दूर राहण्यासाठी तुम्ही काय करता असा प्रश्न काहींना विचारला असता एकाने सांगितलं की  मी इंटरनेटवरील सर्च हिस्ट्री चेक करतो. त्यामुळे मी गेल्या काही दिवसात काय काय केलं याचा पत्ता लागतो. मग एखादी लिंक किंवा एखादी वेबसाईट मी का बरं सर्च केली असेल याचा विचार करत बसतो. यामुळे मी तणावाखाली आहे हेच विसरून गेलो असं त्याने सांगितलं. आहे की नाही गंमतीदार?

आवडत्या व्यक्तीचे जुने एसएमएस वाचा

व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या जमान्यात आपण आपल्या प्रियजनांच्या सतत संपर्कात असतो. त्यामुळे दिवसभरात आपल्या बऱ्याच गप्पा होतात. कधी कधी छान मुड असेल तर रोमॅटिंक गप्पाही रंगतात. त्यामुळे तुम्ही तणावात असाल तर जुने रोमँटिक चॅट पुन्हा शोधून वाचू शकता. त्यामुळे तुमच्या मनावरील ताण हलका होत जाईल.

हॉरर चित्रपट पहा

थरकाप उडवणारे चित्रपट तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही त्राण विसरण्यासाठी हॉरर चित्रपट पाहू शकता. हॉलिवूडमध्ये शिवाय बॉलिवूड आणि मराठीतही अनेक हॉरर चित्रपट येऊन गेले आहेत. त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. 

चांगल्या आणि वाईट सवयी लिहा

आपल्यात अनेक चांगल्या वाईट सवयी असतात. त्यापैकी काही आपल्यालाही आवडत नाहीत. तरीही त्या काही आपली पाठ सोडत नाहीत. या चांगल्या वाईट सवयी कागदावर लिहा. यापैकी एखादी सवय आपल्या तणावाचं कारण तर नाही ना हे शोधून काढा. म्हणजे मग तणाव दूर करणं सोपं जाईल.

मोकळ्या जागेत जोरजोराने हसा

तणाव दूर करण्यासाठी काय करता येईल असं एका तरुणाला विचारल्यावर तो म्हणाला मोकळ्या जागेत जायचं आणि जेवढ्या मोठ्याने हसता येतंय तेवढ्या मोठ्याने हसायचं. खोटं खोटं हसून झाल्यावर आपल्याला आपल्या खोट्या आणि राक्षसी हसण्यावर हसायला येतं. त्यामुळे आपण खरं-खरं हसू लागतो. त्यामुळे आपण बराचश्या प्रमाणात ताणमुक्त राहू शकतो.

कपाट स्वच्छ करा

तणावातून बाहेर निघण्यासाठी आपली कपाटं स्वच्छ करा. त्यातून वापरात नसलेल्या वस्तू तात्काळ फेकून द्याव्या. उपयोगी वस्तू व्यवस्थित लावाव्यात. नव्या, चांगल्या आणि स्वच्छ वस्तू कपाटात भराव्यात. त्यामुळे आपल्याला जाणीव  होईल की आपण मनातही उगीचच नको त्या गोष्टी भरून ठेवलेल्या आहेत. या तणावामुळे आपण चांगल्या गोष्टी वाचणं आणि नव्या गोष्टी शिकणं विसरतो. त्यामुळे तणावापासून दूर राहयाचं असेल घरातील नको असलेल्या, वापरात नसलेल्या वस्तू बाहेर फेकायला शिका. त्याने ताजं-ताजं वाटतं. मनातील मळभ दूर होतं.