शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

माझं निधन झालंय, हाफ डे द्या! विद्यार्थ्याचा अर्ज; मुख्याध्यापकांनी घेतला आश्चर्यजनक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 12:47 IST

सुट्टीसाठी काय पण! खोटं बोलण्याची हद्द झाली राव

सुट्टी हवी असताना शाळकरी विद्यार्थ्यांना शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना अर्ज द्यावा लागतो. काही विद्यार्थी कारणाशिवाय सुट्टी घेतात. सुट्टीसाठी काही विद्यार्थी अजब कारणं देतात, खोटंही बोलतात. काही आजारी असल्याचं सांगतात, तर काही जण नातेवाईकाचं निधन झाल्याचं सांगतात. मात्र एका विद्यार्थ्यानं सुट्टीसाठी सगळ्याच सीमा ओलांडल्या. 

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. एका विद्यार्थ्यानं हाफ डेसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना अर्ज लिहिला. त्यात त्यानं असं कारण लिहिलं, ज्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. 'माझं निधन झालंय, मसा अर्धा दिवस सुट्टी हवीय,' असं विद्यार्थ्यानं अर्जात नमूद केलं. विद्यार्थ्यानं अर्ज मुख्याध्यापकांना दिला. विशेष म्हणजे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याला सुट्टी दिली. घटना उत्तर प्रदेशच्या कानपुरमधील आहे.

आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं हाफ डेसाठी मुख्याध्यापकांकडे अर्ज केला. 'सकाळी १० वाजता माझं निधन झालं. तुम्ही मला अर्ध्या दिवसाची सुट्टी दिल्यास बरं होईल,' असं विद्यार्थ्यानं अर्जात म्हटलं. अर्जावर मुख्याध्यापकांनी लाल पेनानं 'मंजूर' असा शेरा दिला. काही दिवस विद्यार्थ्यानं अर्ज लपवून ठेवला. मात्र जेव्हा हा विद्यार्थ्याच्या मित्रांनी पाहिला, तेव्हा त्याची बरीच चर्चा झाली आणि अर्जाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.