शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

त्याला साप चावला, त्याचा बदला घेण्यासाठी तो सापाला चावला; मग साप मरण पावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 11:47 IST

साप चावल्यानं संतापलेल्या व्यक्तीनं घेतला सापाचा चावा; व्यक्ती सुरक्षित, साप मृत्यूमुखी

जाजपूर: ओदिशातल्या जाजपूर जिल्ह्यात एक अजब प्रकार घडला आहे. एका व्यक्तीला सापानं दंश केला. त्याचा बदला घेण्यासाठी संबंधित व्यक्ती सापाला चावला. यानंतर सापाचा मृत्यू झाला. सध्या या घटनेची परिसरात सर्वत्र चर्चा आहे. विशेष म्हणजे सर्पदंशानंतरही माणूस जिवंत राहिला. पण त्याच माणसानं चावा घेतल्यानं सापाचा मृत्यू झाला.

जाजपूरमधल्या दानागढी परिसरात किशोर बद्रा नावाच्या एका व्यक्तीला सापानं दंश केला. बुधवारी रात्री शेतातून परतत असताना हा प्रकार घडला. साप किशोर यांच्या पायाला चावला. किशोर बद्रा यांना सापाचा राग आला. त्यांचा पारा चढला. त्यांनी दंश करणाऱ्या सापाला पकडलं आणि त्याचा चावा घेतला.

'रात्री घराकडे परतत असताना माझ्या पायाला काहीतरी चावल्यासारखं जाणवलं. मी हातातला टॉर्च घेऊन पाहिलं तर साप माझ्या पायाजवळ होता. मी सापाला हातानं पकडलं आणि त्याला चावत राहिलो. तो साप तिथेच मृत पावला,' असं किशोर यांनी सांगितलं. किशोर मेलेला साप घरी घेऊन आले आणि घडलेला प्रकार तिला सांगितला. त्यानंतर ही घटना वाऱ्यासारखी पसरली.

सर्पदंश झाल्यानं अनेकांनी किशोर यांना रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला. मात्र किशोर यांनी नकार दिला. त्यांनी पारंपारिक पद्धतीनं उपचार करणाऱ्या एका व्यक्तीचा सल्ला घेतला. त्याच व्यक्तीनं किशोर यांच्यावर उपचार केले. सापानं दंश करूनही किशोर यांना काहीच झालं नाही. त्यांची प्रकृती अतिशय उत्तम आहे.