शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

सिम कार्ड्स, हत्यारांची सोय करा, स्फोटातल्या आरोपीची योगींकडे मागणी

By admin | Updated: March 25, 2017 13:09 IST

2007 अजमेर शरीफ दर्गा स्फोट प्रकरणी दोषी करार देण्यात आलेल्या सुनील जोशीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला होता

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - 2007 अजमेर शरीफ दर्गा स्फोट प्रकरणी दोषी करार देण्यात आलेल्या सुनील जोशीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी यामध्ये कोणताही रस नसल्याचं दाखवत त्याची हाकलपट्टी केली होती. सुनील जोशीने 2006 रोजी गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. या भेटीत योगी आदित्यनाथ यांच्याकडे सिम कार्ड्स आणि हत्यारांची सोय करण्याची मागणी करण्यात येणार होती. या सर्व गोष्टींची नोंद स्वामी असीमानंद यांच्या जबाबात आहे. कलम 164 अंतर्गत हा जबाब नोंदवण्यात आला होता, जो नंतर मागे घेण्यात आला. 
 
(अजमेर स्फोट प्रकरणी दोषींना जन्मठेप)
 
अजमेर स्फोट प्रकरणी आरोपी असलेल्या स्वामी असीमानंद आणि भारत मोहन रतेश्वर उर्फ भारत भाई यांना नुकतंच जयपूरच्या विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष म्हणून मुक्त केलं आहे. दोघांनीही दंडाधिका-यांसमोर आपला जबाब नोंदवला होता. यामधून मिळालेल्या माहितीनुसार सुनील जोशी आणि भारत भाईने एप्रिल 2006 रोजी स्वामी असीमानंद यांच्या आदेशानुसार गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. स्वामी असीमानंद यांनी सुनील आणि भारतला आग्रा जाऊन स्थानिक आरएसएश नेता राजेश्वर सिंह यांनी भेट घेऊन योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचा मार्ग मोकळा करण्यास सांगितलं होतं. 
 
सुनील आणि भारत सर्वात आधी आग्र्याला गेले. तिथे त्यांची भेट राजेश्वर यांच्यासोबत झाली. योगी आदित्यनाथ यांची भेट घडवून आणण्यासाठी राजेश्वर दोघांनाही घेऊन गोरखपूरला रवाना झाले. स्वामी असीमानंद यांनी दंडाधिका-यांसमोर नोंदवलेल्या जबाबात या गोष्टींची नोंद आहे. भारत भाई आणि स्वामी असीमानंद यांच्या म्हणण्यानुसार, योगी आदित्यनाथ यांनी चर्चेत कोणताच रस न दाखवत पुन्हा कधीतरी येण्यास सांगितलं. योगी आदित्यनाथ बोलले होते की, 'मी सध्या खूप व्यस्त असून वेळ घेऊन पुन्हा कधीतरी भेटा'.
 
यानंतर सुनील आणि भारतने गोरखपूर सोडलं आणि पुन्हा कधी योगी आदित्यनाथ यांना भेटण्याचा प्रयत्न केला नाही. असीमानंद यांच्या जबाबानुसार सुनील जोशीने आपल्याला राजेश्वर किंवा योगी आदित्यनाथ यांच्याकडून कोणतीच मदत मिळालं नसल्याचं 2006 मध्ये सांगितलं होतं. विशेष म्हणजे स्वामी असीमानंद यांनी युटर्न मारत आपण दबावात हे सर्व बोललो होतो असा दावा केला आहे.
 
अजमेर दर्गा बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दोन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जयपूरच्या विशेष एनआयए न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या देवेंद्र गुप्ता आणि भावेश पटेल यांना ही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने तिघांना दोषी ठरवलं होतं. सुनील जोशी ज्यांचं आधीच निधन झालं आहे त्यांच्यासोबत भावेश आणि देवेंद्र गुप्ता यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
 
8 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायलायने स्वामी असीमानंद यांच्यासोबत अन्य पाच जणांची निर्दोष मुक्तता केली होती. याच सुनावणीत भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता यांना न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. विशेष म्हणजे 2011 रोजी असीमानंद यांना बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड म्हणणा-या एनआयएने कोणताही पुरावा सापडला नसल्याचं सांगितलं होतं. 
 
काय आहे अजमेर बॉम्बस्फोट प्रकरण
11 ऑक्टोबर 2007 रोजी अजमेर येथील प्रसिद्ध सुफी संत  मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर 15 जण जखमी झाली आहे. दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी दोन रिमोट बॉम्ब ठेवण्यात आले होते. मात्र त्यापैकी केवळ एकाच बॉम्बचा स्फोट झाला. 
 
या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास  राजस्थान एटीएसने केला होता. या तपासादरम्यान एटीएसने 2010 साली  तीन आरोपी देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा आणि चंद्रशेखर लेवे यांना अटक केली होती. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2010 साली या प्रकरणी पहिले आरोपपत्र दाखल झाले. मात्र  एप्रिल 2011 मध्ये गृहमंत्रालयाने या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एटीएसकडून काढून घेत एनआयएकडे सोपवला. 
 
एनआयएने तपासाला सुरुवात केल्यानंतर स्वामी असीमानंद, हर्षद सोळंकी, मुकेश बसानी, भरतमोहनलाल रतेश्वर, भावेश अरविंदभाई पटेल, आणि मफत ऊर्फ मेहूल यांना अटक केली होती.  या प्रकरणी एनआयएचे विशेष न्यायालय शनिवारी आपला निर्णय सुनावणार होते, पण प्रकरणाचे गांभीर्य पाहता साक्षीपुराव्यांच्या अभ्यासासाठी अजून काही वेळ लागेल, असे सांगत विशेष न्यायालयाने निकाल पुढे ढकलला होता.