शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सिम कार्ड्स, हत्यारांची सोय करा, स्फोटातल्या आरोपीची योगींकडे मागणी

By admin | Updated: March 25, 2017 13:09 IST

2007 अजमेर शरीफ दर्गा स्फोट प्रकरणी दोषी करार देण्यात आलेल्या सुनील जोशीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला होता

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - 2007 अजमेर शरीफ दर्गा स्फोट प्रकरणी दोषी करार देण्यात आलेल्या सुनील जोशीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी योगी आदित्यनाथ यांनी यामध्ये कोणताही रस नसल्याचं दाखवत त्याची हाकलपट्टी केली होती. सुनील जोशीने 2006 रोजी गोरखपूरमध्ये योगी आदित्यनाथांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. या भेटीत योगी आदित्यनाथ यांच्याकडे सिम कार्ड्स आणि हत्यारांची सोय करण्याची मागणी करण्यात येणार होती. या सर्व गोष्टींची नोंद स्वामी असीमानंद यांच्या जबाबात आहे. कलम 164 अंतर्गत हा जबाब नोंदवण्यात आला होता, जो नंतर मागे घेण्यात आला. 
 
(अजमेर स्फोट प्रकरणी दोषींना जन्मठेप)
 
अजमेर स्फोट प्रकरणी आरोपी असलेल्या स्वामी असीमानंद आणि भारत मोहन रतेश्वर उर्फ भारत भाई यांना नुकतंच जयपूरच्या विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष म्हणून मुक्त केलं आहे. दोघांनीही दंडाधिका-यांसमोर आपला जबाब नोंदवला होता. यामधून मिळालेल्या माहितीनुसार सुनील जोशी आणि भारत भाईने एप्रिल 2006 रोजी स्वामी असीमानंद यांच्या आदेशानुसार गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. स्वामी असीमानंद यांनी सुनील आणि भारतला आग्रा जाऊन स्थानिक आरएसएश नेता राजेश्वर सिंह यांनी भेट घेऊन योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचा मार्ग मोकळा करण्यास सांगितलं होतं. 
 
सुनील आणि भारत सर्वात आधी आग्र्याला गेले. तिथे त्यांची भेट राजेश्वर यांच्यासोबत झाली. योगी आदित्यनाथ यांची भेट घडवून आणण्यासाठी राजेश्वर दोघांनाही घेऊन गोरखपूरला रवाना झाले. स्वामी असीमानंद यांनी दंडाधिका-यांसमोर नोंदवलेल्या जबाबात या गोष्टींची नोंद आहे. भारत भाई आणि स्वामी असीमानंद यांच्या म्हणण्यानुसार, योगी आदित्यनाथ यांनी चर्चेत कोणताच रस न दाखवत पुन्हा कधीतरी येण्यास सांगितलं. योगी आदित्यनाथ बोलले होते की, 'मी सध्या खूप व्यस्त असून वेळ घेऊन पुन्हा कधीतरी भेटा'.
 
यानंतर सुनील आणि भारतने गोरखपूर सोडलं आणि पुन्हा कधी योगी आदित्यनाथ यांना भेटण्याचा प्रयत्न केला नाही. असीमानंद यांच्या जबाबानुसार सुनील जोशीने आपल्याला राजेश्वर किंवा योगी आदित्यनाथ यांच्याकडून कोणतीच मदत मिळालं नसल्याचं 2006 मध्ये सांगितलं होतं. विशेष म्हणजे स्वामी असीमानंद यांनी युटर्न मारत आपण दबावात हे सर्व बोललो होतो असा दावा केला आहे.
 
अजमेर दर्गा बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दोन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जयपूरच्या विशेष एनआयए न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या देवेंद्र गुप्ता आणि भावेश पटेल यांना ही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने तिघांना दोषी ठरवलं होतं. सुनील जोशी ज्यांचं आधीच निधन झालं आहे त्यांच्यासोबत भावेश आणि देवेंद्र गुप्ता यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
 
8 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायलायने स्वामी असीमानंद यांच्यासोबत अन्य पाच जणांची निर्दोष मुक्तता केली होती. याच सुनावणीत भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता यांना न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. विशेष म्हणजे 2011 रोजी असीमानंद यांना बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड म्हणणा-या एनआयएने कोणताही पुरावा सापडला नसल्याचं सांगितलं होतं. 
 
काय आहे अजमेर बॉम्बस्फोट प्रकरण
11 ऑक्टोबर 2007 रोजी अजमेर येथील प्रसिद्ध सुफी संत  मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर 15 जण जखमी झाली आहे. दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी दोन रिमोट बॉम्ब ठेवण्यात आले होते. मात्र त्यापैकी केवळ एकाच बॉम्बचा स्फोट झाला. 
 
या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास  राजस्थान एटीएसने केला होता. या तपासादरम्यान एटीएसने 2010 साली  तीन आरोपी देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा आणि चंद्रशेखर लेवे यांना अटक केली होती. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2010 साली या प्रकरणी पहिले आरोपपत्र दाखल झाले. मात्र  एप्रिल 2011 मध्ये गृहमंत्रालयाने या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एटीएसकडून काढून घेत एनआयएकडे सोपवला. 
 
एनआयएने तपासाला सुरुवात केल्यानंतर स्वामी असीमानंद, हर्षद सोळंकी, मुकेश बसानी, भरतमोहनलाल रतेश्वर, भावेश अरविंदभाई पटेल, आणि मफत ऊर्फ मेहूल यांना अटक केली होती.  या प्रकरणी एनआयएचे विशेष न्यायालय शनिवारी आपला निर्णय सुनावणार होते, पण प्रकरणाचे गांभीर्य पाहता साक्षीपुराव्यांच्या अभ्यासासाठी अजून काही वेळ लागेल, असे सांगत विशेष न्यायालयाने निकाल पुढे ढकलला होता.