शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अजबच की! मोबाईलवर मैत्री, पहिल्याच भेटीत लग्न अन् १७ दिवसांत घडला भलताच प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 16:09 IST

पहिल्यांदा भेटले अन् लग्न केलं; त्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं

जोधपूर: राजस्थानाच्या जालौर जिल्ह्यात एक अजबर प्रकार घडला आहे. एका तरुण-तरुणीची मोबाईलवरून मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर अवघ्या काही दिवसांत प्रेमात झालं. त्यानंतर त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. विशेष म्हणजे पहिल्याच भेटीत प्रेमी युगुलानं विवाह केला. लग्नानंतर काही दिवसांतच तरुणी माहेरी गेली. तरुणानं न्यायालयात याचिका दाखल केली. 

तरुणीला तिच्या कुटुंबापासून सोडवण्यात यावं अशी मागणी तरुणानं न्यायालयानं केली. त्यानंतर न्यायालयात तरुणाच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. त्यात तरुणीनं कुटुंबासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. न्यायालयानं तिला आई वडिलांसोबत राहण्यास परवानगी दिली. विशेष म्हणजे हा सगळा घटनाक्रम अवघ्या १७ दिवसांत घडला.

जालोरच्या सायला परिसरात वास्तव्यास असलेल्या जीतराम मालीनं उच्च न्यायालयात त्याच्या पत्नीला माहेरच्यांनी सोडावं यासाठी याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयानं तरुणाच्या पत्नीला न्यायालयात हजर  राहण्यास सांगितलं. न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती मनोज कुमार यांच्या खंडपीठासमोर पोलिसांनी तरुणीला हजर केलं. त्यावेळी कुटुंबासोबत राहण्याची इच्छा तरुणीनं व्यक्त केली.

'आमची ओळख मोबाईलवर झाली. त्यानंतर मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. पहिल्याच भेटीत आम्ही लग्न केलं. मात्र आमचं पटणार नाही याची कल्पना मला काही दिवसांतच आली. त्यामुळे मी आई वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला,' असं तरुणीनं न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं तरुणीला आई वडिलांसोबत राहण्याची परवानगी दिली.