शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

अजबच की! मोबाईलवर मैत्री, पहिल्याच भेटीत लग्न अन् १७ दिवसांत घडला भलताच प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 16:09 IST

पहिल्यांदा भेटले अन् लग्न केलं; त्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं

जोधपूर: राजस्थानाच्या जालौर जिल्ह्यात एक अजबर प्रकार घडला आहे. एका तरुण-तरुणीची मोबाईलवरून मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर अवघ्या काही दिवसांत प्रेमात झालं. त्यानंतर त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. विशेष म्हणजे पहिल्याच भेटीत प्रेमी युगुलानं विवाह केला. लग्नानंतर काही दिवसांतच तरुणी माहेरी गेली. तरुणानं न्यायालयात याचिका दाखल केली. 

तरुणीला तिच्या कुटुंबापासून सोडवण्यात यावं अशी मागणी तरुणानं न्यायालयानं केली. त्यानंतर न्यायालयात तरुणाच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. त्यात तरुणीनं कुटुंबासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. न्यायालयानं तिला आई वडिलांसोबत राहण्यास परवानगी दिली. विशेष म्हणजे हा सगळा घटनाक्रम अवघ्या १७ दिवसांत घडला.

जालोरच्या सायला परिसरात वास्तव्यास असलेल्या जीतराम मालीनं उच्च न्यायालयात त्याच्या पत्नीला माहेरच्यांनी सोडावं यासाठी याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयानं तरुणाच्या पत्नीला न्यायालयात हजर  राहण्यास सांगितलं. न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती मनोज कुमार यांच्या खंडपीठासमोर पोलिसांनी तरुणीला हजर केलं. त्यावेळी कुटुंबासोबत राहण्याची इच्छा तरुणीनं व्यक्त केली.

'आमची ओळख मोबाईलवर झाली. त्यानंतर मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. पहिल्याच भेटीत आम्ही लग्न केलं. मात्र आमचं पटणार नाही याची कल्पना मला काही दिवसांतच आली. त्यामुळे मी आई वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला,' असं तरुणीनं न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं तरुणीला आई वडिलांसोबत राहण्याची परवानगी दिली.