शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

अजबच की! मोबाईलवर मैत्री, पहिल्याच भेटीत लग्न अन् १७ दिवसांत घडला भलताच प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 16:09 IST

पहिल्यांदा भेटले अन् लग्न केलं; त्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं

जोधपूर: राजस्थानाच्या जालौर जिल्ह्यात एक अजबर प्रकार घडला आहे. एका तरुण-तरुणीची मोबाईलवरून मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर अवघ्या काही दिवसांत प्रेमात झालं. त्यानंतर त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. विशेष म्हणजे पहिल्याच भेटीत प्रेमी युगुलानं विवाह केला. लग्नानंतर काही दिवसांतच तरुणी माहेरी गेली. तरुणानं न्यायालयात याचिका दाखल केली. 

तरुणीला तिच्या कुटुंबापासून सोडवण्यात यावं अशी मागणी तरुणानं न्यायालयानं केली. त्यानंतर न्यायालयात तरुणाच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. त्यात तरुणीनं कुटुंबासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. न्यायालयानं तिला आई वडिलांसोबत राहण्यास परवानगी दिली. विशेष म्हणजे हा सगळा घटनाक्रम अवघ्या १७ दिवसांत घडला.

जालोरच्या सायला परिसरात वास्तव्यास असलेल्या जीतराम मालीनं उच्च न्यायालयात त्याच्या पत्नीला माहेरच्यांनी सोडावं यासाठी याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयानं तरुणाच्या पत्नीला न्यायालयात हजर  राहण्यास सांगितलं. न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती मनोज कुमार यांच्या खंडपीठासमोर पोलिसांनी तरुणीला हजर केलं. त्यावेळी कुटुंबासोबत राहण्याची इच्छा तरुणीनं व्यक्त केली.

'आमची ओळख मोबाईलवर झाली. त्यानंतर मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. पहिल्याच भेटीत आम्ही लग्न केलं. मात्र आमचं पटणार नाही याची कल्पना मला काही दिवसांतच आली. त्यामुळे मी आई वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला,' असं तरुणीनं न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं तरुणीला आई वडिलांसोबत राहण्याची परवानगी दिली.