शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
2
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
3
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
4
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
5
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
6
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
7
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
8
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
9
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
10
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
11
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
12
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
13
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
14
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
15
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
16
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
17
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
18
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
19
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
20
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन

मोदी-वाजपेयी पत्रव्यवहार प्रसिद्धीस ‘पीएमओ’चा नकार

By admin | Updated: March 11, 2015 03:17 IST

गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांडानंतर २००२ मध्ये झालेल्या दंगलींच्या काळात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तेव्हाचे पंतप्रधान

नवी दिल्ली : गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांडानंतर २००२ मध्ये झालेल्या दंगलींच्या काळात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यात झालेला पत्रव्यवहार माहिती अधिकार कायद्यान्वये उघड करण्यास पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) नकार दिला आहे.‘आरटीआय’ कार्यकर्ते सुभाषचंद्र अगरवाल यांनी या पत्रव्यवहाराचा तपशील मागणारा अर्ज १५ महिन्यांपूर्वी केला होता. ‘पीएमओ’मधील जनमाहिती अधिकाऱ्याने त्यावर ३ मार्च रोजी अगरवाल यांना नकाराचे पत्र पाठविले आहे. त्यामुळे अगरवाल यांनी ७ मार्च रोजी ‘पीएमओ’मधील अपिली अधिकाऱ्याकडे अपील दाखल केले आहे. पत्रव्यवहाराची माहिती उघड करण्यास नकार देताना ‘पीएमओ’ने संबंधित त्रयस्थ पक्षांनी (थर्ड पार्टी) घेतलेल्या आक्षेपांची सबब दिली असून हा आक्षेप रास्त असल्याने ‘आरटीआय’ कायद्याच्या कलम ८(१)(एच) अन्वये महिती देता येणार नाही, असे कळविले आहे; मात्र ‘संबंधित त्रयस्थ पक्ष’ म्हणजे नेमके कोण- गुजरात मुख्यमंत्री कार्यालय, वाजपेयी की खुद्द मोदी हे या उत्तरात स्पष्ट करण्यात आलेले नाही.अर्जदारांनी मागितलेली माहिती ‘गोपनीय स्वरूपाची’ आहे व ती उघड केल्याने दंगलींच्या संदर्भात सुरू असलेल्या तपासात व खटल्यांत बाधा येईल, असा आक्षेप त्रयस्थ पक्षांनी घेतल्याचे ‘पीएमओ’ने म्हटले आहे.‘पीएमओ’चे उत्तर पुढे म्हणते की, मुख्यमंत्री हे मंत्री परिषदेचे प्रमुख असल्याने त्यांनी केलेल्या मसलतींचा तपशील उघड न करणे ही कायद्याची व राज्यघटनेची गरज आहे. त्यामुळे अर्जदारांना हवी असलेली माहिती ‘आरटीआय’ अन्वये त्यांना देता येणार नाही, हे त्रयस्थ पक्षांचे म्हणणे रास्त आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)