शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

पिंपरी चिंचवड ठरतोय सुख-सोयींनी संपन्न शहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 13:06 IST

या सर्व्हेत उद्योन्मुख शहरांची निवड करण्यासाठी काही निकषांचा अभ्यास करण्यात आला.

ठळक मुद्देएका गृहप्रकल्प सल्लागार कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात पिपंरी-चिंचवडला महाराष्ट्रातील सर्वात सुख-सोयीयुक्त शहर असं संबोधण्यात आलंयएका आकडेवारीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये दरडोई १६५ लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो . याव्यतिरिक्त पिपंरी चिचंवड शहराला मोठे पर्यटन क्षेत्र लाभलं आहे. 

सर्व सुख-सोयींनी समृद्ध असलेल्या शहरांमध्ये पिपंरी चिंचवडची गणना केली गेली आहे. एका गृहप्रकल्प सल्लागार कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात पिपंरी-चिंचवडला महाराष्ट्रातील सर्वात सुख-सोयीयुक्त शहर असं संबोधण्यात आलंय. पुण्यापासून अगदी काहीच अंतरावर असलेल्या पिपंरी चिंचवडचा विकास तेथील औद्योगिक विकासामुळे झाला असल्याचं काहीजण सांगतात. तसंच पालिकेने आणि राज्य सरकारने अवलंबिलेल्या काही उपक्रमांमुळेदेखील पिपंरी चिचंवड उद्योन्मुख आणि सुख-सोयींनी संपन्न असं शहर बनलं आहे. चला पाहूया या शहरात अश्या कोणत्या सुख-सोयी आहेत.

या सर्व्हेत उद्योन्मुख शहरांची निवड करण्यासाठी काही निकषांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये शहरांचं नियोजन, दैनंदिन गरजांचे व्यवस्थापन, आरामदायी आणि मनोरजंनाची साधने, तेथील प्रशासन, सुरक्षितता आणि प्रदुषणविरहित पर्यावरण आदी निकष समोर ठेवून महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट शहरांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या तिसऱ्या फेरीत ३० शहरांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये पिपंरी चिंचवडचाही समावेश आहे. सुरुवातीला पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांचा विकास एकत्र करण्यात येणार होता. मात्र दोन्ही शहरं मोठी आहेत आणि दोन्हींच्या पालिकाही वेगळ्या असल्याकारणाने दोघांचाही सर्व्हे वेगवेगळा करण्याचं ठरवण्यात आलं.

स्मार्ट सिटी अंतर्गत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सुविधांचे सक्षमीकरण करणे, पाणीपुरवठा वितरण व्यवस्था, पथदिवे, सिग्नल यंत्रणा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पार्किंग आदी विविध पायाभूत सुविधांचा विकास, नागरिकांना चांगल्या क्षमतेच्या पायाभूत सुविधा या सगळ्यांचा विचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यातील अनेक सुविधा पालिकेने नागरिकांना पुरवल्या आहेत.क्लिन सिटी म्हणूनही या शहराकडे पाहिलं जातं. शहर स्वच्छ असावे यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेने अनेक उपाययोजना आखल्या आहेत. त्याअंतर्गत त्यांनी जनजागृती करून घनकचरा व्यवस्थापनाचे धडे नागरिकांना दिले होते. एवढंच नव्हे तर उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांमध्येही आता घट झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात शौचालय असावे यासाठी पालिकेने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी बरेच प्रयत्न केले आहेत.

एवढंच नव्हे तर या शहरात जवळपास ९० टक्के बांधकामे वैध व कायदेशीर असल्याचे सर्व्हेमध्ये म्हटलं गेलंय. या शहरात अनेक देशी-विदेशी कंपन्या आहेत. तसंच अपारंपारिक ऊर्जेच्या निर्मितीवरही भर देण्यात आला आहे. एका आकडेवारीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये दरडोई १६५ लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो . लहान मुलांच्या मनोरंजनासाठी १६४ विकसित उद्यानं येथे तयार आहेत. तर जवळपास २२ लाखांहून अधिक वृक्षांची नोंद या शहरात करण्यात आली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मेट्रो प्रकल्पाचेही काम या शहरात सुरू असून लवकरच पिंपरी चिंचवडकरांना मेट्रोची सफर करता येणार आहे. याव्यतिरिक्त पिपंरी चिचंवड शहराला मोठे पर्यटन क्षेत्र लाभलं आहे. अशा विविध पैलूंचा अभ्यास करूनच पिंपरी चिंचवडला सुख-सोयींनी संपन्न असे शहर म्हटलं गेलं आहे.