शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

पिंपरी चिंचवड ठरतोय सुख-सोयींनी संपन्न शहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 13:06 IST

या सर्व्हेत उद्योन्मुख शहरांची निवड करण्यासाठी काही निकषांचा अभ्यास करण्यात आला.

ठळक मुद्देएका गृहप्रकल्प सल्लागार कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात पिपंरी-चिंचवडला महाराष्ट्रातील सर्वात सुख-सोयीयुक्त शहर असं संबोधण्यात आलंयएका आकडेवारीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये दरडोई १६५ लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो . याव्यतिरिक्त पिपंरी चिचंवड शहराला मोठे पर्यटन क्षेत्र लाभलं आहे. 

सर्व सुख-सोयींनी समृद्ध असलेल्या शहरांमध्ये पिपंरी चिंचवडची गणना केली गेली आहे. एका गृहप्रकल्प सल्लागार कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात पिपंरी-चिंचवडला महाराष्ट्रातील सर्वात सुख-सोयीयुक्त शहर असं संबोधण्यात आलंय. पुण्यापासून अगदी काहीच अंतरावर असलेल्या पिपंरी चिंचवडचा विकास तेथील औद्योगिक विकासामुळे झाला असल्याचं काहीजण सांगतात. तसंच पालिकेने आणि राज्य सरकारने अवलंबिलेल्या काही उपक्रमांमुळेदेखील पिपंरी चिचंवड उद्योन्मुख आणि सुख-सोयींनी संपन्न असं शहर बनलं आहे. चला पाहूया या शहरात अश्या कोणत्या सुख-सोयी आहेत.

या सर्व्हेत उद्योन्मुख शहरांची निवड करण्यासाठी काही निकषांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये शहरांचं नियोजन, दैनंदिन गरजांचे व्यवस्थापन, आरामदायी आणि मनोरजंनाची साधने, तेथील प्रशासन, सुरक्षितता आणि प्रदुषणविरहित पर्यावरण आदी निकष समोर ठेवून महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट शहरांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या तिसऱ्या फेरीत ३० शहरांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये पिपंरी चिंचवडचाही समावेश आहे. सुरुवातीला पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांचा विकास एकत्र करण्यात येणार होता. मात्र दोन्ही शहरं मोठी आहेत आणि दोन्हींच्या पालिकाही वेगळ्या असल्याकारणाने दोघांचाही सर्व्हे वेगवेगळा करण्याचं ठरवण्यात आलं.

स्मार्ट सिटी अंतर्गत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सुविधांचे सक्षमीकरण करणे, पाणीपुरवठा वितरण व्यवस्था, पथदिवे, सिग्नल यंत्रणा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पार्किंग आदी विविध पायाभूत सुविधांचा विकास, नागरिकांना चांगल्या क्षमतेच्या पायाभूत सुविधा या सगळ्यांचा विचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यातील अनेक सुविधा पालिकेने नागरिकांना पुरवल्या आहेत.क्लिन सिटी म्हणूनही या शहराकडे पाहिलं जातं. शहर स्वच्छ असावे यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेने अनेक उपाययोजना आखल्या आहेत. त्याअंतर्गत त्यांनी जनजागृती करून घनकचरा व्यवस्थापनाचे धडे नागरिकांना दिले होते. एवढंच नव्हे तर उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांमध्येही आता घट झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात शौचालय असावे यासाठी पालिकेने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी बरेच प्रयत्न केले आहेत.

एवढंच नव्हे तर या शहरात जवळपास ९० टक्के बांधकामे वैध व कायदेशीर असल्याचे सर्व्हेमध्ये म्हटलं गेलंय. या शहरात अनेक देशी-विदेशी कंपन्या आहेत. तसंच अपारंपारिक ऊर्जेच्या निर्मितीवरही भर देण्यात आला आहे. एका आकडेवारीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये दरडोई १६५ लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो . लहान मुलांच्या मनोरंजनासाठी १६४ विकसित उद्यानं येथे तयार आहेत. तर जवळपास २२ लाखांहून अधिक वृक्षांची नोंद या शहरात करण्यात आली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मेट्रो प्रकल्पाचेही काम या शहरात सुरू असून लवकरच पिंपरी चिंचवडकरांना मेट्रोची सफर करता येणार आहे. याव्यतिरिक्त पिपंरी चिचंवड शहराला मोठे पर्यटन क्षेत्र लाभलं आहे. अशा विविध पैलूंचा अभ्यास करूनच पिंपरी चिंचवडला सुख-सोयींनी संपन्न असे शहर म्हटलं गेलं आहे.