शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

पिंपरी चिंचवड ठरतोय सुख-सोयींनी संपन्न शहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 13:06 IST

या सर्व्हेत उद्योन्मुख शहरांची निवड करण्यासाठी काही निकषांचा अभ्यास करण्यात आला.

ठळक मुद्देएका गृहप्रकल्प सल्लागार कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात पिपंरी-चिंचवडला महाराष्ट्रातील सर्वात सुख-सोयीयुक्त शहर असं संबोधण्यात आलंयएका आकडेवारीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये दरडोई १६५ लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो . याव्यतिरिक्त पिपंरी चिचंवड शहराला मोठे पर्यटन क्षेत्र लाभलं आहे. 

सर्व सुख-सोयींनी समृद्ध असलेल्या शहरांमध्ये पिपंरी चिंचवडची गणना केली गेली आहे. एका गृहप्रकल्प सल्लागार कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात पिपंरी-चिंचवडला महाराष्ट्रातील सर्वात सुख-सोयीयुक्त शहर असं संबोधण्यात आलंय. पुण्यापासून अगदी काहीच अंतरावर असलेल्या पिपंरी चिंचवडचा विकास तेथील औद्योगिक विकासामुळे झाला असल्याचं काहीजण सांगतात. तसंच पालिकेने आणि राज्य सरकारने अवलंबिलेल्या काही उपक्रमांमुळेदेखील पिपंरी चिचंवड उद्योन्मुख आणि सुख-सोयींनी संपन्न असं शहर बनलं आहे. चला पाहूया या शहरात अश्या कोणत्या सुख-सोयी आहेत.

या सर्व्हेत उद्योन्मुख शहरांची निवड करण्यासाठी काही निकषांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये शहरांचं नियोजन, दैनंदिन गरजांचे व्यवस्थापन, आरामदायी आणि मनोरजंनाची साधने, तेथील प्रशासन, सुरक्षितता आणि प्रदुषणविरहित पर्यावरण आदी निकष समोर ठेवून महाराष्ट्रातून सर्वोत्कृष्ट शहरांची निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या तिसऱ्या फेरीत ३० शहरांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये पिपंरी चिंचवडचाही समावेश आहे. सुरुवातीला पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांचा विकास एकत्र करण्यात येणार होता. मात्र दोन्ही शहरं मोठी आहेत आणि दोन्हींच्या पालिकाही वेगळ्या असल्याकारणाने दोघांचाही सर्व्हे वेगवेगळा करण्याचं ठरवण्यात आलं.

स्मार्ट सिटी अंतर्गत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सुविधांचे सक्षमीकरण करणे, पाणीपुरवठा वितरण व्यवस्था, पथदिवे, सिग्नल यंत्रणा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पार्किंग आदी विविध पायाभूत सुविधांचा विकास, नागरिकांना चांगल्या क्षमतेच्या पायाभूत सुविधा या सगळ्यांचा विचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यातील अनेक सुविधा पालिकेने नागरिकांना पुरवल्या आहेत.क्लिन सिटी म्हणूनही या शहराकडे पाहिलं जातं. शहर स्वच्छ असावे यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेने अनेक उपाययोजना आखल्या आहेत. त्याअंतर्गत त्यांनी जनजागृती करून घनकचरा व्यवस्थापनाचे धडे नागरिकांना दिले होते. एवढंच नव्हे तर उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांमध्येही आता घट झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरात शौचालय असावे यासाठी पालिकेने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी बरेच प्रयत्न केले आहेत.

एवढंच नव्हे तर या शहरात जवळपास ९० टक्के बांधकामे वैध व कायदेशीर असल्याचे सर्व्हेमध्ये म्हटलं गेलंय. या शहरात अनेक देशी-विदेशी कंपन्या आहेत. तसंच अपारंपारिक ऊर्जेच्या निर्मितीवरही भर देण्यात आला आहे. एका आकडेवारीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये दरडोई १६५ लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो . लहान मुलांच्या मनोरंजनासाठी १६४ विकसित उद्यानं येथे तयार आहेत. तर जवळपास २२ लाखांहून अधिक वृक्षांची नोंद या शहरात करण्यात आली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मेट्रो प्रकल्पाचेही काम या शहरात सुरू असून लवकरच पिंपरी चिंचवडकरांना मेट्रोची सफर करता येणार आहे. याव्यतिरिक्त पिपंरी चिचंवड शहराला मोठे पर्यटन क्षेत्र लाभलं आहे. अशा विविध पैलूंचा अभ्यास करूनच पिंपरी चिंचवडला सुख-सोयींनी संपन्न असे शहर म्हटलं गेलं आहे.