शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

OMG! पुढील शतकात १८० वर्ष जगणार मनुष्य; वैज्ञानिकाने केला हैराण करणारा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 15:13 IST

पुढील शतकात म्हणजे २१०० पासून मनुष्याचं वय १८० वर्ष होऊ शकतं. त्याचसोबत या शतकाच्या अखेरीस मनुष्याचे वय १३० वयापर्यंत राहू शकतं

सध्याच्या युगात माणसांच्या जगण्याचं आयुष्य खूप कमी होतानाचं चित्र दिसत आहे. एक काळ होता ज्यात लोकं १०० पेक्षा जास्त जगत होती. परंतु आता मनुष्याचं वय ६० ते ६५ वर्षापर्यंत मर्यादित झालं आहे. माणसांचं जगण्याचं वय वाढवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वैज्ञानिक जीवापाड मेहनत घेत आहेत. त्याचवेळी एका वैज्ञानिकाने केलेल्या दाव्याने सगळेच हैराण झाले आहेत.

वैज्ञानिकाचा दावा आहे की, पुढील शतकात म्हणजे २१०० पासून मनुष्याचं वय १८० वर्ष होऊ शकतं. त्याचसोबत या शतकाच्या अखेरीस मनुष्याचे वय १३० वयापर्यंत राहू शकतं. म्हणजे मनुष्य १३० वर्ष जगू शकतो. आजच्या काळात मनुष्य ७०-८० वयापर्यंत जगू शकतो. अशावेळी त्यांच्या अनेक इच्छा मनात कायम राहतात. परंतु जर मनुष्याचं वय १८० वर्ष झालं तर त्याच्या अर्धवट राहिलेल्या इच्छाही पूर्ण होऊ शकतील. कॅनाडाचे HEC Montreal चे प्रोफेसर लियो बेल्जिल यांनी दावा केलाय की, सर्वात वृद्ध व्यक्तीच्या जगण्याचा रेकॉर्ड २१०० व्या शतकात मोडला जाईल. सध्या सर्वात जास्त जगणाऱ्या फ्रान्समधील महिलेचा जागतिक रेकॉर्ड आहे. १९९९ मध्ये त्या वयाच्या १२२ व्या वर्षी मृत्यूमुखी पावल्या.

लियो बेल्जिल म्हणाल्या की मानवी जीवनाची सर्वोच्च मर्यादा नसते हे काही डेटानुसार कळतं. परंतु मानवी आयुष्य वाढल्यास मेडिकल सर्विसेजशी जास्तीत जास्त गरज भासेल. त्यामुळे खर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे. अधिक वय असल्याने वृद्धांना अधिक आरोग्य सुविधा लागतील. त्यांना पेन्शन अथवा सरकारी स्कीमवर निर्भर राहावं लागेल. जास्त वय झाल्यास मनुष्य काहीही काम करण्यास सक्षम नसेल जेणेकरुन तो इतरांवर निर्भर राहील. मीडिया रिपोर्टनुसार, मनुष्य अधिक काळ जिवंत राहिल्यास त्याच्या शरीराचे काही भाग काम करणं बंद होईल. अशावेळी निरोगी राहण्यासाठी त्यांना आरोग्य सुविधेची गरज भासेल आणि मेडिकल बिलही वाढेल. लियो बेल्जिल यांनी केलेल्या या दाव्यामुळे सगळेच हैराण आहेत. मनुष्य १८० वर्ष जगला तर त्याला अनेक व्याधींचा सामना करावा लागू शकतो असंही सांगण्यात येत आहे.