शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

...अन् अवघ्या २३ मिनिटांत रेल्वेनं चिमुकल्यासाठी गायीचं दूध उपलब्ध केलं; काय आहे भानगड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 23:32 IST

ही महिला तिच्या लहान बाळासह प्रवास करत होती. प्रवासात बाळाला भूक लागली होती. मात्र महिलेकडे गायीचं दूध नव्हतं.

कानपूर – भारतीय रेल्वे नेहमी प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असते. तुमच्या सेवेत सदैव तत्पर हे स्लोगन भारतीय रेल्वेने प्रत्यक्षात खरं करुन दाखवलं आहे. एक ट्रेन मुंबईहून सुलतानपूरला जात होती त्यात अंजली नावाची महिला तिच्या चिमुकल्यासह प्रवास करत होती. या महिलेला आलेल्या समस्येबाबत तिने रेल्वेला ट्विट करत माहिती दिली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याची दखल घेतली.

ही महिला तिच्या लहान बाळासह प्रवास करत होती. प्रवासात बाळाला भूक लागली होती. मात्र महिलेकडे गायीचं दूध नव्हतं. अखेर या महिलेने ट्विट करत म्हटलं की, मी प्रत्येक स्टेशनवर गायीचं दूध विचारणा केली परंतु मला ते सापडलं नाही. त्यासाठी मी विनंती करते की कृपया शक्य झाल्यास माझ्या लहान मुलासाठी गायीचं दूध उपलब्ध करुन द्यावे. अशी विनंती करणारं ट्विट महिलेने केले.

या महिलेला प्रवासात येणारी अडचण पाहून रेल्वेनेही तात्काळ जेव्हा ट्रेन कानपूर जंक्शनला पोहचली तेव्हा अधिकाऱ्यांनी महिलेची मागणी पूर्ण केली. या महिलेने रेल्वे मंत्रालयाला टॅग करत ट्विट केले होते. तेव्हा तातडीने हे ट्विट कानपूर सेन्ट्रलचे संचालक हिमांशु शेखर उपाध्याय यांना पाठवून सूचित करण्यात आले. तब्येत ठीक नसल्याने हिमांशु शेखर घरीच होते. परंतु ट्विट मिळताच त्यांनी रेल्वे टीमला सक्रीय केले.

त्यानंतर जेव्हा महिला प्रवास करत असणारी ट्रेन कानपूर स्टेशनला पोहचली तेव्हा अंजलीला गायीचं दूध पाहून सुरुवातीला विश्वास बसला नाही. रेल्वे अधिकारी स्वत: हे दूध घेऊन महिलेच्या प्रतिक्षेत होते. रेल्वे अधिकाऱ्यांनी अवघ्या २३ मिनिटांत महिलेच्या बाळाला गायीचं दूध उपलब्ध करुन दिले. या घटनेने महिला भारावली होती. त्यानंतर जेव्हा ही महिला सुलतानपूरला तिच्या गावात पोहचली. तिने रेल्वे अधिकाऱ्यांना फोन करुन धन्यवाद दिले.

या घटनेवर कानपूर सेंट्रलचे संचालक हिमांशु शेखर उपाध्याय म्हणाले की, ही महिला तिच्या लहान बाळासह एकटी प्रवास करत होती. त्यावेळी तिची मदत करणं गरजेचे होते. आम्हालाही या महिला रेल्वे प्रवाशाची मदत करुन आनंद झाला. रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तयार आहोत असंही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे