शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

प्रेम करून अशी काही अडकली दोन मुलांची आई, ना पती मिळाला ना प्रियकर; जाणून घ्या काय झालं तिचं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 11:21 IST

Bihar : भतोडिया गावात राहणारा नंदकिशोर मंडलचं लग्न 7 वर्षाआधी प्रियंका कुमारीसोबत झालं होतं. लग्नाच्या काही वर्षानंतर प्रियंका शेजारी राहणारा मृत्यूंजय कुमारच्या प्रेमात पडली. दोघेही लपून एकमेकांना भेटू लागले होते.

Bihar : बिहारच्या भागलपूरच्या नाथनगर प्रेम प्रकरणाची एक अजब घटना समोर आली आहे. इथे दोन मुलांची आई असलेली महिला शेजारच्या तरूणाच्या प्रेमात पडली. भतोडिया गावात राहणारा नंदकिशोर मंडलचं लग्न 7 वर्षाआधी प्रियंका कुमारीसोबत झालं होतं. लग्नाच्या काही वर्षानंतर प्रियंका शेजारी राहणारा मृत्यूंजय कुमारच्या प्रेमात पडली. दोघेही लपून एकमेकांना भेटू लागले होते.

प्रियंकाचा पती नंदकिशोर मंडल जेव्हा घरी राहत नव्हता तेव्हा प्रियंका तिचा प्रियकर मृत्यूंजयला घरी बोलवत होती. प्रियंका आणि मृत्यूंजयमध्ये सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाची खरब नंदकिशोरला लागली होती. पतीने खू समजावल्यावरही प्रियंका मृत्यूंजयला भेटत होती. मग एक दिवस पती  नंदकिशोरने पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं.

याची सूचना मृत्यूंजयच्या कुटुंबाला दिली. याबाबत गावात पंचायत बोलवण्यात आली. यावेळी पती, पत्नी आणि प्रियकराला बोलवण्यात आलं. या पंचायतमध्ये पती नंदकिशोरने पत्नीला आपल्यासोबत ठेवण्यास साफ नकार दिला. तर प्रियंकाने प्रियकर मृत्यूंजयसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. पंचायतमध्ये ठरलं की, प्रियंका आता तिच्या प्रियकरासोबत राहील. पण प्रियंकाच्या प्रियकराने यावेळी माघार घेतली. त्याने तिला सोबत ठेवण्यास नकार दिला.

या अजब प्रेमी कहाणीचा निर्णय जेव्हा पंचायतमध्ये होऊ शकला नाही तेव्हा पोलिसांना बोलवण्यात आलं. पंचायतने तिघांनाही पोलिसांच्या हवाली केलं. आता पोलीस यावर काय ते ठरवतील. प्रियंका दोन मुलांची आई आहे आणि तिचा पती नंदकिशोर मंडल शेतकरी आहे.

टॅग्स :BiharबिहारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट