शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:56 IST

अनेक संस्थांनी आंध्र प्रदेशातील या भागांना हिऱ्यांसाठी हॉटस्पॉट घोषित केले आहे. अशा परिस्थितीत येथील लोकांनाही याचा फायदा झाला आहे.

एखाद्याला व्यक्तीला खोदकाम करताना असं काही मिळते, ज्याने तो रातोरात श्रीमंत होतो अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. ही कहाणी नाही तर सत्य आहे. आंध्र प्रदेशच्या अनंतपूरच्या वैराकारुर, कुरनूल गावात लोक दूर दूरहून शेतात हिरे शोधायला येतात. बऱ्याचदा त्यांना यश मिळते, लाखोंचे हिरे त्यांच्या हाती लागतात. कधी कधी १-२ लाख तर काहींचं नशीब इतके जोरदार असते की त्यांना ५० लाखांचे हिरेही सापडतात. 

मान्सूनला सुरुवात होताच आंध्र प्रदेशच्या वैराकरूर, जोन्नागिरी, मद्दीकेरामध्ये लोक त्यांचे नशीब आजमावण्यासाठी पोहचतात. कारण मान्सूनच्या पहिल्या पावसात जमिनीच्या वरचा थर वाहू लागतो, त्यानंतर इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीत हिरे चमकू लागतात. तेलंगणा आणि कर्नाटकातूनही या जिल्ह्यात लोक येतात. प्रत्येक जण स्वत:सोबत काही ना काही हत्यार घेऊन कुणी बाईकवरून, कुणी रिक्षाने तिथे पोहचते. सर्वांनाच एकाच गोष्टीची आस असते ती म्हणजे हिऱ्याची...

मागील वर्षी सापडले ५ कोटींचे हिरे

एका रिपोर्टनुसार, दरवर्षी पावसाळ्यात फक्त मद्दीकेरा आणि तुग्गली येथे ५ कोटी रुपयांचे हिरे सापडतात. हे हिरे मुंबई किंवा सुरतला नेले जातात आणि चांगल्या किमतीत विकले जातात. संपूर्ण हंगामात येथील लोक त्यांच्या कुटुंबासह एकाच ठिकाणी राहतात. काही मंदिरांमध्ये थांबतात, तर काही झाडांखाली तंबू ठोकून सतत हिऱ्यांचा शोध घेतात. काहींसाठी या शोधामुळे त्यांचे नशीब बदलते. हिरे खरेदीदार पावसाळ्यात वाट पाहत असतात. या परिसरात हिरे मिळण्याबाबत १-२ नव्हे तर अनेक बातम्या पुढे आल्या आहेत. मागील महिन्यात मद्दीकेरा आणि तुग्गली येथे ४ हिरे सापडले त्यांची किंमत ७० लाखांच्या आसपास होती. जून महिन्यात एका महिलेला हिरा मिळाला होता, त्याची किंमत १० लाख इतकी होती. 

दरम्यान, अनेक संस्थांनी आंध्र प्रदेशातील या भागांना हिऱ्यांसाठी हॉटस्पॉट घोषित केले आहे. अशा परिस्थितीत येथील लोकांनाही याचा फायदा झाला आहे. येथे हिरे शोधण्यासाठी खोदकाम करावे लागत नाही. कारण पाऊस पडल्यानंतर जमिनीचा पहिला थर निघून जातो. आणि लोकांना मातीवर लहान दगडांसारखे हिरे सापडतात. म्हणून बहुतेक लोक हिरे शोधण्यासाठी आणि हिरे बाहेर काढण्यासाठी पीठ चाळणी आणि चमचा वापरतात. इथं हिरे शोधण्याची परंपरा नवीन नाही. ब्रिटिश काळापासून येथे हिरे सापडत आहेत. दरवर्षी अनेक लोक हिऱ्यांच्या शोधात येतात. काहींना हिरे सापडतात तर काहींना सापडत नाहीत.