शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भावा, तू समुद्र कसा बघतो, तेच मी बघतो; भांडणं टोकाला गेली अन् भावड्यानं 'लय भारी' बिल्डिंग बांधली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 15:53 IST

भावाची जिरवण्यासाठी दुसऱ्यानं भन्नाट डोकं लढवलं; इमारतीची सर्वत्र चर्चा

भावाभावातील भांडणं, एकमेकांना शह देण्यासाठी केले जाणारे उद्योग, अरे तो मला काय शिकवतो म्हणत दिलं जाणारं ज्ञान, उपदेशाचे डोस आपल्याला नवीन नाहीत. भाऊबंदकीच्या एकापेक्षा एक कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. पण लेबनॉनमधल्या दोन भावंडांच्या भांडणातून जे घडलं, त्याची आज जगात चर्चा आहे. मला थोडं कमी मिळालं तरी चालेल, पण त्याला धडा शिकवणारच, असं म्हणत एका भावानं दुसऱ्या भावानं घर बांधलं. तब्बल ६६ वर्षांपूर्वी बांधलेल्या घराची कहाणी आता समोर आली आहे.१९५४ मध्ये बैरुतच्या शेजारी असलेल्या मनारामध्ये एका व्यक्तीनं देशातील सर्वात अरुंद इमारत बांधली. या घराला स्थानिक भाषेत अलबासा असं म्हणतात. अरबी भाषेतल्या या शब्दाचा अर्थ होतो द्वेष, असूया. या घराला अलबासा म्हणण्यामागचं कारणदेखील विशेष आहे. भावाच्या घरातून समुद्र दिसू नये. सी-फेस व्ह्यूच न मिळाल्यानं त्याच्या घराची किंमत कमी व्हावी या हेतूनं दुसऱ्या भावानं त्याच्या अगदी शेजारी अतिशय कमी जागेत एक इमारत बांधली.

भावाला सी-फेस व्ह्यू मिळू नये म्हणून दुसऱ्या भावानं बांधलेल्या इमारतीची रुंदी एका टोकाला केवळ २ फूट इतकी आहे. तर मध्यभागी ती १४ फूट इतकी आहे. वडिलांच्या संपत्तीची वाटणी झाल्यावर एका भावाला प्राईम लोकेशनवर मोठी जागा मिळाली. तर दुसऱ्याला त्याच ठिकाणी अतिशय कमी जागेवर समाधान मानावं लागलं. दोन भावांमध्ये टोकाचा वाद होता. या घटनेमुळे तो आणखी वाढला. कमी जागा मिळालेल्या भावाला कोणत्याही मार्गानं बदला घ्यायचा होता.यानंतर दुसऱ्या भावानं त्याला मिळालेल्या अतिशय कमी जागेत इमारत बांधायचं ठरवलं. खरंतर या भागात केवळ एक भिंत उभी राहून थोडी जागा शिल्लक राहील इतकीच जमीन होती. त्यामुळे इमारत उभी राहिली, तरीही त्यातल्या खोल्या अतिशय लहान असणार होत्या. मात्र भावाला त्याच्या घरातून समुद्राचा नजारा मिळणार नाही, या हेतूनं दुसऱ्यानं इमारत उभी केली. देशातील सर्वात अरुंद इमारत म्हणून तिची नोंद झाली. स्थानिकांना ही इमारत उभारण्यामागचं कारण माहीत होतं. मात्र जगाला त्यामागचं कारण आता समजलं आहे.