शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

KGF म्हणजे कोलार गोल्ड फील्ड्सचा खरा इतिहास, सिनेमापेक्षा वेगळं आहे सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 14:21 IST

केजीएफमधून कधीकाळी देशातील ९५ टक्के सोन्याचं उत्पादन होत होतं. कोलार १९व्या शतकात चर्चेत आलं. कारण तेव्हा इथे सोन्याची खाण सापडली. पण याचा इतिहास १७०० वर्ष जुना आहे.

बंगळुरूच्या पूर्वेला साधारण १०० किलोमीटर अंतरावर एक असा परिसर आहे ज्याला 'लिटिल इंग्लंड' नावाने ओळखलं जातं. कधी हे इंग्रजांनी वसवलेलं शहर होतं. इथे गोल्फ क्लब आणि स्वीमिंग पूल असलेले सोशल क्लबही होते. त्यासोबत जगप्रसिद्ध हॉस्पिटल, शाळा आणि सिनेमागृह होती. २०व्या शतकात सोन्याच्या व्यापाराशिवाय हे शक्यही नव्हतं. ज्या ठिकाणाबाबत आपण बोलतोय ते आहे कोलार गोल्ड फील्ड्स. याला केजीएफ नावानेही ओळखलं जातं. केजीएफची चर्चा याच नावावरून आलेल्या सिनेमामुळे अधिक होऊ लागली आहे. या सिनेमातही गोल्ड माइन्सची पार्श्वभूमी दाखवली आहे. पण कथा काल्पनिक आहे. कथा मोडून तोडून दाखवली आहे. या केजीएफचा म्हणजे कोलार गोल्ड फील्ड्सचा इतिहास वेगळाच आहे. तोच आज जाणून घेऊ.....

केजीएफमधून कधीकाळी देशातील ९५ टक्के सोन्याचं उत्पादन होत होतं. कोलार १९व्या शतकात चर्चेत आलं. कारण तेव्हा इथे सोन्याची खाण सापडली. पण याचा इतिहास १७०० वर्ष जुना आहे. इसपू. ३५०-१००० दरम्यान कर्नाटकावर गंगा वंशाचं शासन होतं आणि तेव्हा कोलार त्यांची राजधानी होती. राजा या ठिकाणाहून गेल्यावर कुवालाला-पुरावेश्वर हे पुस्तक घेऊन गेले. १००४ मध्ये कोलारवर चोल वंशाचं शासन होतं. रेकॉर्डमधून समोर येतं की, कोलार सोन्याच्या खाणीतून काढलेलं सोनं चोल राजवंशाच्या प्रसिद्ध पूमपुहार बेटावर आणलं जात होतं. तेथून ते इतर ठिकाणी पाठवलं जात होतं.

(Image Credit : pinterest.com)

इंग्रज येण्यापूर्वी खाणीतून जेवढं सोनं काढण्यात आलं होतं ते अर्धविकसित होतं. लोकांचे छोटे छोटे समूह लोखंडाच्या औजारांनी आणि तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात जमीन खोदत होते. अशात इंग्रज सेना अधिकारी जॉन वॉरन याची नजर या खाणींवर पडली. त्याला या खाणींचं महत्व समजलं.

१७९९ मध्ये श्रीगंगापट्टनममध्ये इंग्रजांच्या हातून टीपू सुलतान मारला गेल्यावर इंग्रजांनी टीपूचे भाग मौसरला सोपवण्याचा निर्णय झाला.  पण त्यासाठी जमिनीचा सर्व्हे महत्वाचा होता. वॉरन तेव्हा सेनेच्या ३३व्या बटालियनचा कमांडर होता. या कामासाठी त्याला कोलारला बोलवण्यात आलं. १८०२ मध्ये म्हैसूरच्या सीमेचं काम सुरू झालं. त्याने खाणीत सुरू असलेलं काम पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की, ५६ किलो मातीतून फारच थोडं सोनं निघत होतं. त्याने विचार केला की, हे काम प्रोफेशनल लोकांना दिलं तर सोनं जास्त निघू शकतं. 

तेव्हा सहा दशकं अनेक लोकांनी सोनं शोधण्यात आपली नशीब आजमावलं. अनेक शोध केले गेले. पण कुणालाही सोन्याचा मोठा खजिना मिळाला नाही. या स्थितीत १८७१ मध्ये बदल झाला. इंग्रजांच्या सेनेतून रिटायर झालेला आयरलॅंडचा मायकल फिट्जगॅराल्ड लॅवलेने बंगळुरू छावणीला आपलं घर बनवलं. त्याचा खाणींमधील इंटरेस्ट वाढला. जॉन वॉरनचा जुना रिपोर्ट वाचून त्याने खाणीत काम करायला सुरूवात केली.

आपल्या अनुभवाच्या मदतीने लॅवलेने खोदकामासाठी काही जागा निवडल्या. दोन वर्षांपेक्षा जास्त शोध केल्यानंतर १८७३ मध्ये महाराजाच्या सरकारकडून त्याने खोदकामासाठी परवानगी घेतली. त्याला २० वर्षांसाठी एक भाग मिळाला आणि त्याने इथे आधुनिक पद्धतीने खोदकाम सुरू केलं.पण लवकरच लॅवलेकडे असलेले पैसे संपले आणि १८८० मध्ये लंडनच्या मायनिंग फर्म टॅलर अॅन्ड सन्सने कोलार खाण हाती घेतली. त्यांनी इतिहास बदलून टाकला. तो आपल्यासोबत कोलारमध्ये आधुनिक मशीन घेऊन आला आणि खोदकाम सुरू केलं. एकेकाळी कोलारची खाण सर्वात खोल आणि सर्वात जास्त सोनं देणारी खाण होती. कोलार गोल्ड माइन्स हे भारतातील अशा पहिल्या शहरांपैकी होतं जिथे वीज आली होती.

१९०० मध्ये म्हैसूरच्या महाराजांना कावेरी नदीवर पानचक्की लावण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर इथे वीज वीज पोहोचू लागली. या कामासाठी ब्रिटन, अमेरिका आणि जर्मनीहून मशीन्स मागवण्यात आल्या होत्या. या मशीन हत्ती आणि घोडे खेचत होते. त्यावेळी बंगळुरू आणि म्हैसूरमध्येही वीज पोहोचली नव्हती. वीज आल्यामुळे खाणीत लिफ्ट सुरू झाल्या.

(Image Credit : Google)

खोदकाम जोरात सुरू झालं आणि संपत्ती येऊ लागली होती. अशाप्रकारे पडीत जमीन असलेला कोलार शहर १९३० पर्यंत एक समृद्ध शहर बनलं. पण एकीकेड इंग्रज शाही जीवन जगत होते तर खाणीत काम करणारे भारतीय मजूरांची स्थिती फारच बेकार होती. इंग्रज बंगल्यात रहायचे तर भारतीय मजूर मातीच्या खोल्यांमध्ये. इथे उंदरांचा सुळसुळाटही होता. शक्य तेवढं सोनं काढल्याने कोलार गोल्ड माइन्सची नियती बदलली. यूरोपहून आलेले खनन तज्ञ घाना आणि पश्चिम आफ्रिकेत खोदकामासाठी गेले आणि कोलार गोल्ड फील्ड्स २००१ मध्ये बंद पडली. या खाणीत आज पाणी भरलं आहे. आता ही खाण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सkgf 2केजीएफhistoryइतिहासKarnatakकर्नाटक