शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

KGF म्हणजे कोलार गोल्ड फील्ड्सचा खरा इतिहास, सिनेमापेक्षा वेगळं आहे सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 14:21 IST

केजीएफमधून कधीकाळी देशातील ९५ टक्के सोन्याचं उत्पादन होत होतं. कोलार १९व्या शतकात चर्चेत आलं. कारण तेव्हा इथे सोन्याची खाण सापडली. पण याचा इतिहास १७०० वर्ष जुना आहे.

बंगळुरूच्या पूर्वेला साधारण १०० किलोमीटर अंतरावर एक असा परिसर आहे ज्याला 'लिटिल इंग्लंड' नावाने ओळखलं जातं. कधी हे इंग्रजांनी वसवलेलं शहर होतं. इथे गोल्फ क्लब आणि स्वीमिंग पूल असलेले सोशल क्लबही होते. त्यासोबत जगप्रसिद्ध हॉस्पिटल, शाळा आणि सिनेमागृह होती. २०व्या शतकात सोन्याच्या व्यापाराशिवाय हे शक्यही नव्हतं. ज्या ठिकाणाबाबत आपण बोलतोय ते आहे कोलार गोल्ड फील्ड्स. याला केजीएफ नावानेही ओळखलं जातं. केजीएफची चर्चा याच नावावरून आलेल्या सिनेमामुळे अधिक होऊ लागली आहे. या सिनेमातही गोल्ड माइन्सची पार्श्वभूमी दाखवली आहे. पण कथा काल्पनिक आहे. कथा मोडून तोडून दाखवली आहे. या केजीएफचा म्हणजे कोलार गोल्ड फील्ड्सचा इतिहास वेगळाच आहे. तोच आज जाणून घेऊ.....

केजीएफमधून कधीकाळी देशातील ९५ टक्के सोन्याचं उत्पादन होत होतं. कोलार १९व्या शतकात चर्चेत आलं. कारण तेव्हा इथे सोन्याची खाण सापडली. पण याचा इतिहास १७०० वर्ष जुना आहे. इसपू. ३५०-१००० दरम्यान कर्नाटकावर गंगा वंशाचं शासन होतं आणि तेव्हा कोलार त्यांची राजधानी होती. राजा या ठिकाणाहून गेल्यावर कुवालाला-पुरावेश्वर हे पुस्तक घेऊन गेले. १००४ मध्ये कोलारवर चोल वंशाचं शासन होतं. रेकॉर्डमधून समोर येतं की, कोलार सोन्याच्या खाणीतून काढलेलं सोनं चोल राजवंशाच्या प्रसिद्ध पूमपुहार बेटावर आणलं जात होतं. तेथून ते इतर ठिकाणी पाठवलं जात होतं.

(Image Credit : pinterest.com)

इंग्रज येण्यापूर्वी खाणीतून जेवढं सोनं काढण्यात आलं होतं ते अर्धविकसित होतं. लोकांचे छोटे छोटे समूह लोखंडाच्या औजारांनी आणि तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात जमीन खोदत होते. अशात इंग्रज सेना अधिकारी जॉन वॉरन याची नजर या खाणींवर पडली. त्याला या खाणींचं महत्व समजलं.

१७९९ मध्ये श्रीगंगापट्टनममध्ये इंग्रजांच्या हातून टीपू सुलतान मारला गेल्यावर इंग्रजांनी टीपूचे भाग मौसरला सोपवण्याचा निर्णय झाला.  पण त्यासाठी जमिनीचा सर्व्हे महत्वाचा होता. वॉरन तेव्हा सेनेच्या ३३व्या बटालियनचा कमांडर होता. या कामासाठी त्याला कोलारला बोलवण्यात आलं. १८०२ मध्ये म्हैसूरच्या सीमेचं काम सुरू झालं. त्याने खाणीत सुरू असलेलं काम पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की, ५६ किलो मातीतून फारच थोडं सोनं निघत होतं. त्याने विचार केला की, हे काम प्रोफेशनल लोकांना दिलं तर सोनं जास्त निघू शकतं. 

तेव्हा सहा दशकं अनेक लोकांनी सोनं शोधण्यात आपली नशीब आजमावलं. अनेक शोध केले गेले. पण कुणालाही सोन्याचा मोठा खजिना मिळाला नाही. या स्थितीत १८७१ मध्ये बदल झाला. इंग्रजांच्या सेनेतून रिटायर झालेला आयरलॅंडचा मायकल फिट्जगॅराल्ड लॅवलेने बंगळुरू छावणीला आपलं घर बनवलं. त्याचा खाणींमधील इंटरेस्ट वाढला. जॉन वॉरनचा जुना रिपोर्ट वाचून त्याने खाणीत काम करायला सुरूवात केली.

आपल्या अनुभवाच्या मदतीने लॅवलेने खोदकामासाठी काही जागा निवडल्या. दोन वर्षांपेक्षा जास्त शोध केल्यानंतर १८७३ मध्ये महाराजाच्या सरकारकडून त्याने खोदकामासाठी परवानगी घेतली. त्याला २० वर्षांसाठी एक भाग मिळाला आणि त्याने इथे आधुनिक पद्धतीने खोदकाम सुरू केलं.पण लवकरच लॅवलेकडे असलेले पैसे संपले आणि १८८० मध्ये लंडनच्या मायनिंग फर्म टॅलर अॅन्ड सन्सने कोलार खाण हाती घेतली. त्यांनी इतिहास बदलून टाकला. तो आपल्यासोबत कोलारमध्ये आधुनिक मशीन घेऊन आला आणि खोदकाम सुरू केलं. एकेकाळी कोलारची खाण सर्वात खोल आणि सर्वात जास्त सोनं देणारी खाण होती. कोलार गोल्ड माइन्स हे भारतातील अशा पहिल्या शहरांपैकी होतं जिथे वीज आली होती.

१९०० मध्ये म्हैसूरच्या महाराजांना कावेरी नदीवर पानचक्की लावण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर इथे वीज वीज पोहोचू लागली. या कामासाठी ब्रिटन, अमेरिका आणि जर्मनीहून मशीन्स मागवण्यात आल्या होत्या. या मशीन हत्ती आणि घोडे खेचत होते. त्यावेळी बंगळुरू आणि म्हैसूरमध्येही वीज पोहोचली नव्हती. वीज आल्यामुळे खाणीत लिफ्ट सुरू झाल्या.

(Image Credit : Google)

खोदकाम जोरात सुरू झालं आणि संपत्ती येऊ लागली होती. अशाप्रकारे पडीत जमीन असलेला कोलार शहर १९३० पर्यंत एक समृद्ध शहर बनलं. पण एकीकेड इंग्रज शाही जीवन जगत होते तर खाणीत काम करणारे भारतीय मजूरांची स्थिती फारच बेकार होती. इंग्रज बंगल्यात रहायचे तर भारतीय मजूर मातीच्या खोल्यांमध्ये. इथे उंदरांचा सुळसुळाटही होता. शक्य तेवढं सोनं काढल्याने कोलार गोल्ड माइन्सची नियती बदलली. यूरोपहून आलेले खनन तज्ञ घाना आणि पश्चिम आफ्रिकेत खोदकामासाठी गेले आणि कोलार गोल्ड फील्ड्स २००१ मध्ये बंद पडली. या खाणीत आज पाणी भरलं आहे. आता ही खाण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सkgf 2केजीएफhistoryइतिहासKarnatakकर्नाटक