शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

२५ वर्षांपूर्वी आई बेपत्ता, मृत समजून केले अंत्यसंस्कार, आज अखेर विमानतळावर झाली भेट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 11:17 IST

Missing Lady found after 25 years : २५ वर्षे कुठे होती ती महिला? पुन्हा घरच्यांना कशी भेटली? एखाद्या चित्रपटाच्या कहाणीप्रमाणे ही गोष्ट घडली.

Missing Lady found after 25 years : कर्नाटकातील बेल्लारी येथे राहणारी एक महिला २५ वर्षांपूर्वी पती आणि चार मुलांना सोडून कुठेतरी गेली होती. घरच्यांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र महिलेबाबत काहीही माहिती मिळाली नाही. महिला मानसिकदृष्ट्या आजारी होती. काहीतरी अनुचित प्रकार घडला असावा असे मानून काही वर्षांनी कुटुंबीयांनी तिला मृत मानले आणि तिचे अंत्यसंस्कार केले. पण एक दिवस अचानक तब्बल २५ वर्षांनंतर ती महिला पुन्हा तिच्या कुटुंबाला भेटली. एखाद्या चित्रपटाच्या कहाणीप्रमाणे ही गोष्ट घडली.

२५ वर्षे कुठे होती आई?

सकम्माचा विवाह केंचिना बांदी गावातील नागेशशी झाला होता. त्यांना चार मुलेही होती. त्यातील एकाचा नंतर मृत्यू झाला. एके दिवशी अचानक सकम्मा घरातून निघून ट्रेनमध्ये चढली. मग तिथून ती कशीतरी हिमाचल प्रदेशातील मंडीत पोहोचली. ती येथे गरीब जीवन जगत होती. २०१८ मध्ये, सकम्मा हिमाचलमध्ये अत्यावस्थ अवस्थेत सापडली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने तिला वृद्धाश्रमात ठेवले.

पुढे काय घडले?

सकम्मा हिला भांगरोटू वृद्धाश्रमात ठेवण्यात आले होते. मंडीच्या उपायुक्तांच्या म्हणण्यानुसार, प्रशासकीय अधिकारी अशा सर्व वृद्धाश्रमांना वेळोवेळी भेट देत असतात आणि तेथील सुविधांचा आढावा घेतात. १८ डिसेंबरला मंडीचे सहाय्यक उपायुक्त रोहित राठोड भंगारोटू वृद्धाश्रमात पोहोचले, तेव्हा त्यांना येथे सकम्मा दिसली. ७० वर्षीय महिलेला हिंदी येत नसून ती कर्नाटकातील असल्याचे त्यांना समजले.

पालमपूर SDM ची झाली मदत

मंडीचे ADC रोहित राठोड यांनी पालमपूरच्या SDM एसडीएम नेत्रा मैत्ती यांना सकम्मा यांच्याशी कन्नड भाषेत बोलण्यासाठी संपर्क साधला. नेत्रा या कर्नाटकच्या रहिवासी आहे. त्यांनी सकमाशी कन्नड भाषेत फोनवर बोलून त्यांच्या घराची आणि कुटुंबाची माहिती घेतली. यानंतर नेत्रा मैती यांनी मंडी जिल्ह्यात कार्यरत कर्नाटकातील आयपीएस प्रोबेशनर रवी नंदन यांना भांगरोटू वृद्धाश्रमात पाठवले. त्यांनी सकम्मा यांच्याशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ बनवला आणि तो कर्नाटक सरकारला शेअर केला.

सकम्मावर अंत्यसंस्कार का केले?

मंडीचे उपायुक्त म्हणाले की, हिमाचल प्रदेश सरकार, अधिकारी आणि कर्नाटक सरकारच्या मदतीने सकम्माच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यात आला. कुटुंबीयांनी २५ वर्षांपूर्वीच सकम्मा यांना मृत समजून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. कुटुंबीयांनी सकम्माच्या हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही दिवसांनी कर्नाटकात एका महिलेचा मृतदेह अपघातात सापडला होता. पोलिसांनी सकम्माच्या कुटुंबीयांना ही माहिती दिली होती. त्यामुळे सकम्माला मृत समजून त्यांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

२५ वर्षांपूर्वीच्या गोष्टी लक्षात

सकम्माची मानसिक स्थिती अद्यापही चांगली नाही. तिला २५ वर्षांपूर्वीच्या गोष्टी आठवतात आणि ती कन्नड भाषेत सांगते की तिला लहान मुले आहेत. तिची ती मुले आता मोठी झाली आहेत याची तिला कल्पनाच नाही. कर्नाटक सरकारने सकम्माला मंडीतून परत आणण्यासाठी तीन अधिकाऱ्यांना पाठवले. त्यानंतर सकम्माला परत कर्नाटकात आणण्यात आले. सकम्माची मुले विक्रम, बोधराज आणि लक्ष्मी यांनी सांगितले की, विमानतळावर आईला पाहताच त्यांचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिन्ही मुले आईला मिठी मारून रडू लागली. सकम्मा आता आजीही झाली आहे. नातवांची आजी परत आल्याने त्यांनाही खूप आनंद झाला आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकHimachal Pradeshहिमाचल प्रदेश