शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

अविवाहित तरूणींच्या रक्ताने आंघोळ करत होती ही महिला, ६०० पेक्षा अधिक मुलींची केली होती हत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 13:27 IST

तुम्ही अनेक सिरिअल किलर्सबाबत ऐकलं असेल, ज्यांनी विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने हत्या केल्या असतील.

(Image Credit : Medium)

तुम्ही अनेक सिरिअल किलर्सबाबत ऐकलं असेल, ज्यांनी विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने हत्या केल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला ज्या महिलेबाबत सांगणार आहोत, तिची कहाणी वाचून तुमच्या अंगावर शहारा येईल. ही महिला अविवाहित तरूणींची हत्या करून त्यांच्या रक्ताने आंघोळ करत होती. त्याचं कारणही विचित्रच होतं. 

या महिलेचं नाव होतं एलिजाबेथ बाथरी. या महिलेला इतिहासातील सर्वात कुख्यात आणि निर्दशी महिला सिरिअल किलर म्हणून ओळखलं जातं. एलिजाबेथ बाथरीने १५८५ ते १६१० दरम्यान ६०० पेक्षा अधिक तरूणींची हत्या करून त्यांच्या रक्ताने आंघोळ केली होती.एलिझाबेथने या तरूणींची हत्या तिच्या महालातच केली होती. एलिझाबेथ ही हंगरी साम्राज्यातील उच्चभ्रू बाथरी परिवारातील होती. तिचं लग्न फेरेंक नॅडेस्डी नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. ही व्यक्ती तुर्की विरोधात युद्धातील हंगरीचा नॅशनल हिरो होता.

(Image Credit : The Vintage News)

एलिझाबेथ बाथरीचा पती जिवंत होता, तेव्हाही ती तरूणींना तिची शिकार बनवत होती. पण १६०४ मध्ये त्याच्या मृत्युनंतर तिने जणू हत्या करण्याचा सपाटाच लावला होता. एलिझाबेथ स्लोवानियाच्या चास्चिस येथील तिच्या महालात राहत होती. तिथेच ती या तरूणींची हत्या करत होती.

असे सांगितले जाते की, एलिझाबेथ बाथरीला तिच्या या भयानक गुन्ह्यात तिचे तीन नोकर मदत करत होते. ती एका उच्चभ्रू परिवारातील होतील म्हणून ती आजूबाजूच्या गावातील गरीब मुलींना चांगले पैसे देऊन कामाचं आमिष दाखवून महालात बोलवत होती. पण या तरूणी महालात येताच तिच्या शिकार ठरत होत्या. 

असे सांगितले जाते की, एलिझाबेथ आधी तरुणींना शारीरिक त्रास देत होती. त्यांना मारत होती, इतकेच काय तर त्यांचे हात कापत होती किंवा जाळत होती. अनेकदा ती काही तरूणींच्या शरीरावरील मांस दातांनी कापून काढत होती आणि शेवटी तिची हत्या करून तिचं रक्त एका टबमध्ये भरून त्यात आंघोळ करत होती. याचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे.

असेही म्हटले जाते की, जेव्हा आजूबाजूच्या गावातील गरीब मुलींची सख्या कमी झाली तेव्हा तिने श्रीमंत घरातील मुलींना आपली शिकार बनवणे सुरू केलं होतं. हे बाब जेव्हा हंगरीच्या राजाला कळाली तेव्हा त्याने याची चौकशी करण्याचा आदेश दिला. तेव्हाच याचा खुलासा झाला. चौकशी करणाऱ्या पथकाने एलिझाबेथच्या महालातून मुलींचे सांगाडे आणि सोन्या-चांगीचे दागिणे मिळवले होते.

१६१० मध्ये एलिझाबेथ बाथरीला तिच्या या भयंकर कृत्यासाठी अटक करण्यात आली आणि तिला तिच्यात महालातील एका खोलीत कैद करण्यात आलं. तिथे चार वर्षांनी २१ ऑगस्ट १६१४ मध्ये तिचा मृत्यू झाला. असेही म्हणतात की, एलिझाबेथ फार सुंदर होती आणि तिला तिचं हे सौंदर्य कायम ठेवायचं होतं. या कारणानेच तिने ६०० तरूणींची हत्या केली होती. तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी ती रक्ताने आंघोळ करत होती. 

टॅग्स :Murderखूनhistoryइतिहास