शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पाठवणी झाल्यावर तासाभरात नवरीला घेऊन वरात मागे फिरली; कुटुंबियांची धाकधूक वाढली; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 19:10 IST

पाठवणीनंतर वरात मुलीच्या घरातून निघाली; पण तासाभरानं वरात माघारी परतली

शिमला: लग्न सोहळा आटोपल्यावर मुलीकडच्यांकडून मुलीला निरोप दिला जातो. त्यानंतर मुलगी वरातीसह सासरी जाण्यास निघते. पण नवऱ्यासह तासाभरापूर्वी कुटुंबियांचा निरोप घेऊन गेलेली मुलगी संपूर्ण वरातीसह परत आली तर..? हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये असा प्रकार घडला आहे. संपूर्ण वरात माघारी आल्यानं कुटुंबाला धक्का बसला. सगळ्यांची धाकधूक वाढली. पण वरात माघारी फिरण्याचं कारण समजताच सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. सध्या या घटनेची सोशल मीडियात खूप चर्चा आहे.

मंडी जिल्ह्यातल्या रोपा गावात एक विवाह सोहळा संपन्न झाला. साग्रसंगीत लग्न झाल्यावर सगळे रिती रिवाज पूर्ण करून नवदाम्पत्याची पाठवणी करण्यात आली. संध्याकाळ झाली असल्यानं लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी घरातल्या सामानाची आवराआवर सुरू केली. वरात गावातून निघून जवळपास तास उलटला होता. तितक्यात संपूर्ण वरात गावी परत आली. वरात माघारी फिरल्यानं मुलीच्या कुटुंबाला धक्काच बसला. त्यानंतर वरातीतल्या मंडळींनी रस्त्यात घडलेला संपूर्ण प्रकार मुलीकडच्यांना सांगितला आणि त्यांच्या जीवात जीव आला. 

नवरा नवरीला आणि वरातीला घेऊन त्याच्या घरी परतत असताना बल्ह भागात भूस्खलन झालं. त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं रस्ता सुरू करण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे वाहतूककोंडी झाली. त्यामुळे वरातीतल्या मंडळींनी मुलीच्या घरी परतण्याचं ठरवलं. वरात अचानक माघारी आल्यानं मुलीकडच्यांना त्यांची व्यवस्था कशी करायची असा प्रश्न पडला. मात्र ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावले. त्यांना संपूर्ण वऱ्हाडाची उत्तम व्यवस्था केली.