शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

पाठवणी झाल्यावर तासाभरात नवरीला घेऊन वरात मागे फिरली; कुटुंबियांची धाकधूक वाढली; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 19:10 IST

पाठवणीनंतर वरात मुलीच्या घरातून निघाली; पण तासाभरानं वरात माघारी परतली

शिमला: लग्न सोहळा आटोपल्यावर मुलीकडच्यांकडून मुलीला निरोप दिला जातो. त्यानंतर मुलगी वरातीसह सासरी जाण्यास निघते. पण नवऱ्यासह तासाभरापूर्वी कुटुंबियांचा निरोप घेऊन गेलेली मुलगी संपूर्ण वरातीसह परत आली तर..? हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये असा प्रकार घडला आहे. संपूर्ण वरात माघारी आल्यानं कुटुंबाला धक्का बसला. सगळ्यांची धाकधूक वाढली. पण वरात माघारी फिरण्याचं कारण समजताच सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. सध्या या घटनेची सोशल मीडियात खूप चर्चा आहे.

मंडी जिल्ह्यातल्या रोपा गावात एक विवाह सोहळा संपन्न झाला. साग्रसंगीत लग्न झाल्यावर सगळे रिती रिवाज पूर्ण करून नवदाम्पत्याची पाठवणी करण्यात आली. संध्याकाळ झाली असल्यानं लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी घरातल्या सामानाची आवराआवर सुरू केली. वरात गावातून निघून जवळपास तास उलटला होता. तितक्यात संपूर्ण वरात गावी परत आली. वरात माघारी फिरल्यानं मुलीच्या कुटुंबाला धक्काच बसला. त्यानंतर वरातीतल्या मंडळींनी रस्त्यात घडलेला संपूर्ण प्रकार मुलीकडच्यांना सांगितला आणि त्यांच्या जीवात जीव आला. 

नवरा नवरीला आणि वरातीला घेऊन त्याच्या घरी परतत असताना बल्ह भागात भूस्खलन झालं. त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं रस्ता सुरू करण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे वाहतूककोंडी झाली. त्यामुळे वरातीतल्या मंडळींनी मुलीच्या घरी परतण्याचं ठरवलं. वरात अचानक माघारी आल्यानं मुलीकडच्यांना त्यांची व्यवस्था कशी करायची असा प्रश्न पडला. मात्र ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावले. त्यांना संपूर्ण वऱ्हाडाची उत्तम व्यवस्था केली.