शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

भन्नाट! निवडणुकीत हरल्यास २ कोटी अन् एक SUV कार; पराभूत उमेदवाराला बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 15:43 IST

आपल्याकडे सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे सुरू झाले आहे. निवडणुका म्हटले की आपल्याकडे सगळ विसरुन एकमेकांविरोधातच प्रचार करत असतात.

आपल्याकडे सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वारे सुरू झाले आहे. निवडणुका म्हटले की आपल्याकडे सगळ विसरुन एकमेकांविरोधातच प्रचार करत असतात. मग ती निवडणुका ग्रामपंचायतीची असो की विधानसभेसाठी. सध्या आपल्याकडे एक निवडणूक चर्चेत आली आहे. या निवडणुकीत चक्क हरलेल्या उमेदवाराला बक्षीस दिले आहे. 

तुम्हाला जर कोण म्हणाले की निवडणुका हरल्यानंतर तुम्हाला बक्षीस दिले जाईल.आता तुम्हाला वाटेल असं कुठे असते का, निवडणुका हरल्यानंतर कोण बक्षीस स्वरुपात पैसे देते. पण, एका ठिकाणी निवडणुका हरल्यानंतर हरलेल्या उमेदवाराला चक्क २ कोटी रुपये दिले, एवढच नाहीतर सोबत एक करकरीत एसयुव्ही कारही दिली आहे. ही घटना हरियाणामधील आहे.

बघा ही स्टंटबाजी!! पत्नी मागे बसलेली आणि गाडी चालवता चालवता हा माणूस चक्क..... व्हिडिओ व्हायरल 

हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील चिडी या गावातील हे प्रकरण. या गावात पंचायत निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या सरपंच उमेदवाराचा गावकऱ्यांनी सत्कार केला. पराभूत उमेदवाराचा ग्रामस्थांनी पुष्पहार व चलनी नोटा सत्कार केला. एवढेच नाही तर पराभूत उमेदवाराला गावकऱ्यांनी २ कोटी ११ लाख रुपये रोख आणि एक चमचमीत कारही दिली. त्याचबरोबर खाप पंचायतीनेही या उमेदवाराचा सन्मान करण्याचे ठरवून त्यांना महत्त्वाचे पद देण्याची घोषणा केली.

माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांच्या किलोई मतदारसंघातील रोहतक जिल्ह्यातील चिडी गाव हे पहिले गाव आहे. येथे धर्मपाल नावाच्या व्यक्तीने सरपंचपदासाठी निवडणूक लढवली होती. १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या पंचायत निवडणुकीत नवीन दलाल यांच्याकडून ६६ मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र ग्रामस्थांनी पंचायत निवडणुकीत पराभूत होऊनही ढोल वाजवून उमेदवाराचा सत्कार केला. सर्व गावकऱ्यांनी पैसे गोळा करून त्यांना २ कोटी ११ लाख रुपये रोख आणि एक कार भेट म्हणून दिली.    

गावात बंधुभाव कायम राहावा आणि उमेदवाराचे मनोधैर्य खचू नये, यासाठी हा सन्मान केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार धर्मपाल म्हणाले की, गावकऱ्यांचा हा सन्मान पाहून आपण हरलो नसून जिंकलो आहोत. विजयी उमेदवाराबाबतही आपली नाराजी नसल्याचे ते म्हणाले. गावाचा समान विकास व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. गावकऱ्यांचा हा आदर पाहून मला खूप आनंद झाला, असंही ते म्हणाले. 

हरियाणात यावेळी तीन टप्प्यात पंचायत निवडणुका होत आहेत. पंचायत निवडणुका दोन टप्प्यात पार पडल्या असून तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका होणे बाकी आहे. राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये तर उर्वरित ४ जिल्ह्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. 

टॅग्स :ElectionनिवडणूकHaryanaहरयाणा