शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

देशात प्रथमच महिला फासावर चढणार

By admin | Updated: August 15, 2014 00:11 IST

कोल्हापूरच्या दोन क्रूर बहिणींची दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळली असून देशाच्या इतिहासात प्रथमच एखादी महिला फासावर चढणार आहे

नवी दिल्ली : कोल्हापूरच्या दोन क्रूर बहिणींची दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळली असून देशाच्या इतिहासात प्रथमच एखादी महिला फासावर चढणार आहे. १३ कोवळ्या मुलांचे अपहरण करून त्यापैकी नऊ जणांची हत्या करणाऱ्या रेणुका किरण शिंदे आणि सीमा मोहन गावित या निर्दयी बहिणींना २००१ मध्येच फाशी ठोठावण्यात आली होती.राष्ट्रपतींनी गेल्याच महिन्यात त्यांच्या दयायाचिका फेटाळल्यानंतर राष्ट्रपती भवनाकडून सर्व संबंधितांना कळविण्याची औपचारिकता पूर्ण पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला दिलेली मुदत शनिवारी संपत आहे.रेणुका, सीमा या दोन बहिणींसह त्यांची आई क्रूरकर्मा अंजनाबाई ही लहान मुलांना पळवून त्यांना भीक मागायला लावायची. ही मुले कमाईचे साधन असेपर्यंतच त्या त्यांना सोबत ठेवत. पळून आलेल्या १३ पैकी ९ मुलांची त्यांनी क्रूरपणे हत्या करीत विल्हेवाट लावली. अंजनाबाई हिचे खटल्याच्या काळात निधन झाले असून रेणुका आणि सीमा सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात आहेत. या मुलींचा बाप किरण शिंदे हा माफीचा साक्षीदार बनला असून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या दोघींना फासावर चढविण्याबाबत ‘ना हरकत’ अद्याप मिळायची आहे. राष्ट्रपतींनी दयायाचिका फेटाळली असल्याचे आम्ही दोन्ही आरोपी महिलांना, त्यांच्या नातेवाइकांना, सर्वोच्च न्यायालयातील लिगल रिमेडियल सेल तसेच जिल्हा न्यायालयाला कळविले असल्याचे गृहविभागाचे डेस्क आॅफिसर दीपक जाडिये यांनी सांगितले. २००१ मध्ये कोल्हापूरचे न्यायाधीश जी.एल. येडके यांनी दोन बहिणींनी नऊ मुलांची केलेली हत्या ही निर्घृण असल्याचा उल्लेख केला होता. या दोन बहिणींना मुलांना जीवे मारताना अघोरी आनंद मिळत असावा असा शेराही त्यांनी मारला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)