शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

देशात प्रथमच महिला फासावर चढणार

By admin | Updated: August 15, 2014 00:11 IST

कोल्हापूरच्या दोन क्रूर बहिणींची दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळली असून देशाच्या इतिहासात प्रथमच एखादी महिला फासावर चढणार आहे

नवी दिल्ली : कोल्हापूरच्या दोन क्रूर बहिणींची दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळली असून देशाच्या इतिहासात प्रथमच एखादी महिला फासावर चढणार आहे. १३ कोवळ्या मुलांचे अपहरण करून त्यापैकी नऊ जणांची हत्या करणाऱ्या रेणुका किरण शिंदे आणि सीमा मोहन गावित या निर्दयी बहिणींना २००१ मध्येच फाशी ठोठावण्यात आली होती.राष्ट्रपतींनी गेल्याच महिन्यात त्यांच्या दयायाचिका फेटाळल्यानंतर राष्ट्रपती भवनाकडून सर्व संबंधितांना कळविण्याची औपचारिकता पूर्ण पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला दिलेली मुदत शनिवारी संपत आहे.रेणुका, सीमा या दोन बहिणींसह त्यांची आई क्रूरकर्मा अंजनाबाई ही लहान मुलांना पळवून त्यांना भीक मागायला लावायची. ही मुले कमाईचे साधन असेपर्यंतच त्या त्यांना सोबत ठेवत. पळून आलेल्या १३ पैकी ९ मुलांची त्यांनी क्रूरपणे हत्या करीत विल्हेवाट लावली. अंजनाबाई हिचे खटल्याच्या काळात निधन झाले असून रेणुका आणि सीमा सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात आहेत. या मुलींचा बाप किरण शिंदे हा माफीचा साक्षीदार बनला असून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या दोघींना फासावर चढविण्याबाबत ‘ना हरकत’ अद्याप मिळायची आहे. राष्ट्रपतींनी दयायाचिका फेटाळली असल्याचे आम्ही दोन्ही आरोपी महिलांना, त्यांच्या नातेवाइकांना, सर्वोच्च न्यायालयातील लिगल रिमेडियल सेल तसेच जिल्हा न्यायालयाला कळविले असल्याचे गृहविभागाचे डेस्क आॅफिसर दीपक जाडिये यांनी सांगितले. २००१ मध्ये कोल्हापूरचे न्यायाधीश जी.एल. येडके यांनी दोन बहिणींनी नऊ मुलांची केलेली हत्या ही निर्घृण असल्याचा उल्लेख केला होता. या दोन बहिणींना मुलांना जीवे मारताना अघोरी आनंद मिळत असावा असा शेराही त्यांनी मारला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)