शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

देशात प्रथमच महिला फासावर चढणार

By admin | Updated: August 15, 2014 00:11 IST

कोल्हापूरच्या दोन क्रूर बहिणींची दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळली असून देशाच्या इतिहासात प्रथमच एखादी महिला फासावर चढणार आहे

नवी दिल्ली : कोल्हापूरच्या दोन क्रूर बहिणींची दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळली असून देशाच्या इतिहासात प्रथमच एखादी महिला फासावर चढणार आहे. १३ कोवळ्या मुलांचे अपहरण करून त्यापैकी नऊ जणांची हत्या करणाऱ्या रेणुका किरण शिंदे आणि सीमा मोहन गावित या निर्दयी बहिणींना २००१ मध्येच फाशी ठोठावण्यात आली होती.राष्ट्रपतींनी गेल्याच महिन्यात त्यांच्या दयायाचिका फेटाळल्यानंतर राष्ट्रपती भवनाकडून सर्व संबंधितांना कळविण्याची औपचारिकता पूर्ण पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला दिलेली मुदत शनिवारी संपत आहे.रेणुका, सीमा या दोन बहिणींसह त्यांची आई क्रूरकर्मा अंजनाबाई ही लहान मुलांना पळवून त्यांना भीक मागायला लावायची. ही मुले कमाईचे साधन असेपर्यंतच त्या त्यांना सोबत ठेवत. पळून आलेल्या १३ पैकी ९ मुलांची त्यांनी क्रूरपणे हत्या करीत विल्हेवाट लावली. अंजनाबाई हिचे खटल्याच्या काळात निधन झाले असून रेणुका आणि सीमा सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात आहेत. या मुलींचा बाप किरण शिंदे हा माफीचा साक्षीदार बनला असून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या दोघींना फासावर चढविण्याबाबत ‘ना हरकत’ अद्याप मिळायची आहे. राष्ट्रपतींनी दयायाचिका फेटाळली असल्याचे आम्ही दोन्ही आरोपी महिलांना, त्यांच्या नातेवाइकांना, सर्वोच्च न्यायालयातील लिगल रिमेडियल सेल तसेच जिल्हा न्यायालयाला कळविले असल्याचे गृहविभागाचे डेस्क आॅफिसर दीपक जाडिये यांनी सांगितले. २००१ मध्ये कोल्हापूरचे न्यायाधीश जी.एल. येडके यांनी दोन बहिणींनी नऊ मुलांची केलेली हत्या ही निर्घृण असल्याचा उल्लेख केला होता. या दोन बहिणींना मुलांना जीवे मारताना अघोरी आनंद मिळत असावा असा शेराही त्यांनी मारला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)