शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सासरच्या जाचातून झाली सुटका; वडिलांनी वाजतगाजत वरात काढून मुलीला घरी परत आणलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 12:58 IST

लग्नाच्या काही दिवसानंतर सासरी मुलीचा छळ होऊ लागला. पती मुलीला बाहेर काढायचा.

रांची – शहरात निघालेल्या एका वरातीची बरीच चर्चा सुरू आहे. ही वरात मुलीला सासरी पाठवताना नव्हे तर तिची सासरच्या जाचातून सुटका केल्यासाठी निघाली होती. वडिलांनी सासरकडून होणाऱ्या मुलीचा छळ रोखण्यासाठी तिला परत घरी आणले. एवढेच नाहीतर घरी आणताना बँडबाजा, आतषबाजीसह वरात काढली. १५ ऑक्टोबरच्या या वरातीचा व्हिडिओ सोशल मीडियात त्यांनी पोस्ट केला.

फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं की, मोठ्या आशेने आणि धुमधडाक्यात बाप मुलीचे लग्न लावतो. परंतु पार्टनर आणि कुटुंब चुकीचे ठरले तर आपल्या मुलीला आदर आणि सन्मानाने घरी परत आणायला हवे कारण मुली खूप मौल्यवान असतात असं त्यांनी म्हटलं. मुलीच्या वडिलांचे नाव प्रेम गुप्ता असे आहे. जे रांचीतील कैलाशनगर भागात राहतात. २८ एप्रिल २०२२ रोजी मुलगी साक्षी गुप्ताचे सचिन कुमार या युवकाशी लग्न लावले होते. तो झारखंडच्या वीज वितरण कंपनीत सहायक अभियंता म्हणून कामाला आहे.

लग्नाच्या काही दिवसानंतर सासरी मुलीचा छळ होऊ लागला. पती मुलीला बाहेर काढायचा. लग्नाच्या १ वर्षानंतर साक्षीला कळाले की, ज्याच्यासोबत तिचे लग्न झाले आहे त्याने याआधीच २ लग्न केली आहे. हे साक्षीला समजताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. सर्वकाही जाणूनही मी हिंमत हरली नाही आणि नाते टिकवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु छळ आणि अत्याचाराला कंटाळून या नात्यात राहणे कठीण आहे हे कळल्यानंतर साक्षीने नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

साक्षीच्या वडिलांनी आणि तिच्या घरच्यांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यानंतर सासरहून माहेरी आणताना बँडबाजा, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मुलीची छळातून सुटका झाल्याने वडिलांनी आनंद व्यक्त केला. साक्षीने नवऱ्यासोबत घटस्फोट देण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. नवऱ्याने पोटगी द्यावी अशी तिची मागणी आहे. लवकरच घटस्फोटावर शिक्कामोर्तब होईल असी साक्षीच्या कुटुंबाला आशा आहे.