शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

चोर समजून कामगारांना बदडले

By admin | Updated: December 29, 2014 05:16 IST

गोदामात काम करणारे चार कामगार ओवळी गावातून जात असताना गावकऱ्यांनी त्यांना चोर असल्याच्या संशयाने बदडले

भिवंडी : गोदामात काम करणारे चार कामगार ओवळी गावातून जात असताना गावकऱ्यांनी त्यांना चोर असल्याच्या संशयाने बदडले. भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या त्यांच्या सात साथीदारांनादेखील गावातील तरुणांनी बांबू, लाठ्या-काठ्यांनी बदडले. या प्रकरणी २४ ग्रामस्थांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.थंडीच्या दिवसांत ग्रामीण भागात चोर शिरतात, अशा अफवा तालुक्यात पसरल्या आहेत. यासंदर्भात कोणतीही खात्री करून न घेता ओवळी गावात ११ कामगारांना मारल्याची घटना घडली. तालुक्यातील गोदामात काम करून समूहाने वळपाड्यात भाड्याने राहणारे श्रीकांत आहीर, माणिक बागुल, सोरम मंडल, रूपल आहीर हे चौघे पश्चिम बंगालचे कामगार घरी परतत होते. सुटी असल्याने शुक्रवारी सायंकाळी ओवळी गावातून फिरत गेले. त्या वेळी गावातील तरुणांनी त्यांना हटकले असता भाषा न समजल्याने घाबरून ते आपल्या घराच्या दिशेने पळू लागले. त्यामुळे गावकऱ्यांना ते चोर असल्याचा संशय आला. त्यांनी त्यांना मारहाण केली. या चौघांबरोबर वळपाड्यात राहणाऱ्या सात जणांना खोलीबाहेर काढून ठोशा-बुक्क्यांनी व लाठीकाठीने मारहाण केली. हे सर्व कामगार ‘ग्लोबल कम्पाउंड’मधील ‘सहानुभूती एंटरप्रायझेस’मध्ये काम करीत आहेत. पोलिसांनी ओवळी गावातील २४ जणांविरोधात गुन्हा दाखल करीत नऊ जणांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)