शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

चोर समजून कामगारांना बदडले

By admin | Updated: December 29, 2014 05:16 IST

गोदामात काम करणारे चार कामगार ओवळी गावातून जात असताना गावकऱ्यांनी त्यांना चोर असल्याच्या संशयाने बदडले

भिवंडी : गोदामात काम करणारे चार कामगार ओवळी गावातून जात असताना गावकऱ्यांनी त्यांना चोर असल्याच्या संशयाने बदडले. भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या त्यांच्या सात साथीदारांनादेखील गावातील तरुणांनी बांबू, लाठ्या-काठ्यांनी बदडले. या प्रकरणी २४ ग्रामस्थांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.थंडीच्या दिवसांत ग्रामीण भागात चोर शिरतात, अशा अफवा तालुक्यात पसरल्या आहेत. यासंदर्भात कोणतीही खात्री करून न घेता ओवळी गावात ११ कामगारांना मारल्याची घटना घडली. तालुक्यातील गोदामात काम करून समूहाने वळपाड्यात भाड्याने राहणारे श्रीकांत आहीर, माणिक बागुल, सोरम मंडल, रूपल आहीर हे चौघे पश्चिम बंगालचे कामगार घरी परतत होते. सुटी असल्याने शुक्रवारी सायंकाळी ओवळी गावातून फिरत गेले. त्या वेळी गावातील तरुणांनी त्यांना हटकले असता भाषा न समजल्याने घाबरून ते आपल्या घराच्या दिशेने पळू लागले. त्यामुळे गावकऱ्यांना ते चोर असल्याचा संशय आला. त्यांनी त्यांना मारहाण केली. या चौघांबरोबर वळपाड्यात राहणाऱ्या सात जणांना खोलीबाहेर काढून ठोशा-बुक्क्यांनी व लाठीकाठीने मारहाण केली. हे सर्व कामगार ‘ग्लोबल कम्पाउंड’मधील ‘सहानुभूती एंटरप्रायझेस’मध्ये काम करीत आहेत. पोलिसांनी ओवळी गावातील २४ जणांविरोधात गुन्हा दाखल करीत नऊ जणांना अटक केली आहे. (प्रतिनिधी)