शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

अजब! दहावीत मुलगा नापास होऊनही वडिलांनी जंगी पार्टी देऊन केलं सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 10:02 IST

मुलगा परीक्षेत नापास झाल्यावर वडिलांनी जंगी पार्टी दिल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का?

भोपाळ- दहावीची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असते. करिअरची पुढील दिशा ठरविण्यासाठी दहावीच्या परीक्षेकडे विद्यार्थी विशेष लक्ष देतात. विद्यार्थ्यांचे आई-वडिलही मुलांच्या परीक्षेकडे लक्ष देतात. मुलाने परीक्षेत योग्य कामगिरी केली नाही तर मुलांप्रमाणे पालकांचीही निराशा होते. पण, मुलगा परीक्षेत नापास झाल्यावर वडिलांनी जंगी पार्टी दिल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? अर्थातच याचं उत्तर नाही असं असेल. पण असं घडलं आहे मध्य प्रदेशमध्ये. मुलगा दहावी बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्यावर वडिलांनी मिठाई वाटत व जंगी पार्टी देऊन सेलिब्रेशन केलं. मिळालेल्या माहितीनुसार, फटाके फोडून, मिठाई वाटून वडिलांनी सेलिब्रेशन केलं. 

सुरेंद्र कुमार व्यास असं या विद्यार्थ्याच्या वडिलांचं नाव असून ते शिवाजी वॉर्ड भागात राहतात. 'मी माझ्या मुलाला अशाप्रकारे प्रोत्साहन देतो. परीक्षेत नापास झाल्यावर मुलं तणावात जातात व त्या तणावातून टोकाचं पाऊलंही उचललं जातं. अगदी आयुष्य संपविण्यापर्यंत टोकाचं पाऊल मुलं उचलतात. बोर्डाची परीक्षा ही काही आयुष्यातील शेवटची परीक्षा नाही, असं मला मुलांना सांगायचं आहे. आयुष्यात खूप गोष्टी येतात, अशी भावना सुरेंद्र कुमार यांनी व्यक्त केली आहे. माझा मुलगा पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षेला बसेल असंही ते म्हणाले. 'वडिलांनी माझ्यासाठी केलेल्या सगळ्याचं मला खूप कौतुक आहे. पुढच्या वर्षी खूप अभ्यास करून मी दहावीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळविण्याचं वचन दिलं आहे, असं परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी आशूने म्हटलं.