शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

CoronaVirus: कोरोनाच काय, 'या' गावात पोहोचला नाही कुठलाच साथीचा आजार; कारण वाचून चकीत व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 14:04 IST

बिहारच्या वैशालीमध्ये चक्क वटवाघळांची पूजा करणारं गाव

पाटणा: जगात सर्वत्र सध्या कोरोनाची दहशत पाहायला मिळतेय. आतापर्यंत ७ लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली असून जवळपास ३४ हजार लोकांना जीव गमवावा लागलाय. भारतातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा १ हजारपेक्षा अधिक आहे. चीनच्या वुहानमधून कोरोना जगभरात पसरला. अनेकांनी कोरोनासाठी वटवाघळांना जबाबदार धरलं. मात्र भारतातल्या एका गावात वटवाघळांची पूजा केली जाते. अनेक जण कोरोनाच्या फैलावासाठी वटवाघळांना जबाबदार धरत आहेत. मात्र बिहारच्या वैशाली जिल्ह्यातल्या राजापाकरमधल्या सरसाई गावात वटवाघळांची कित्येक वर्षांपासून पूजा होत आहे. वटवाघळं सरसाई गावची रक्षक असून त्यांच्यामुळे समृद्धी येते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळे वटवाघळं गावात कोणतंही शुभ कार्य सुरू करण्याआधी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचा अविभाज्य भाग असतात. वटवाघळांमध्ये भरभराट होते, संरक्षण होते, अशी ग्रामस्थांची भावना आहे.वटवाघळं संपूर्ण गावाचं रक्षण करतात, अनुचित प्रकार रोखतात, असं ग्रामस्थांना वाटतं. वटवाघळांमुळे आजार, साथीचे रोग गावापासून दूर राहतात, अशी त्यांची श्रद्धा आहे. गावाजवळच्या तलावाच्या शेजारी असलेल्या पिंपळाच्या झाडावर शेकडो वटवाघळं आहेत. 'एखादी अनोळखी व्यक्ती गावात येत असल्यास वटवाघळं जोरजोरात ओरडू लागतात. मात्र गावातली व्यक्ती येत असताना वटवाघळं अतिशय शांत असतात,' अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. खूप वर्षांपूर्वी वैशाली जिल्ह्यात रोगाची साथ पसरली होती. तेव्हा वटवाघळांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केली. ही वटवाघळं सरसाई गावात आली, असं ग्रामस्थांनी सांगितलं. वटवाघळं स्थलांतरित झाल्यानंतर एकही साथीचा रोग गावात आलेला नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या