शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

Coronavirus: आम्ही लग्नाळू! PPE किट्स घालून नवरी थेट हॉस्पिटलमध्ये पोहचली; कोविड वार्डात लग्नसोहळा पार पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 20:03 IST

परदेशात राहणाऱ्या अभिरामला लग्नाच्या तयारी दरम्यान कोरोना संक्रमण झालं. त्यानंतर त्याची आईही कोरोनाबाधित आढळली.

ठळक मुद्देकोरोना संक्रमित झाल्यानंतर दोघांच्या कुटुंबाने २५ एप्रिल रोजी ठरलेलं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.नवरीच्या आग्रहास्तव जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन कोविड वार्डात लग्न सोहळा पार पडला.वार्डातील इतर कोरोना रुग्णही या विवाह सोहळ्यात सहभागी झाले. कोरोना वार्डात नवरी आणि तिच्या नातेवाईकांनी पीपीई किट्स घालून आत प्रवेश केला होता.

तिरुवनंतपुरम – केरळच्या अलप्पुझा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्येच कोरोना काळात एका कपलनं लग्न केलं आहे. यावेळी नवरीनं पीपीई किट्स घातलं होतं. कारण नवऱ्या मुलाला कोरोना झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने हे लग्न लावण्यात परवानगी देण्यात आली.

अलाप्पुझा येथे राहणारे सोम आणि अभिराम या दोघांनी कोविड वार्डात लग्न केले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेकांनी लग्न समारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु केरळमध्ये कपलने कोरोना काळातही चक्क कोविड वार्डात लग्न केल्याचं समोर आलं आहे. या दोघांचे लग्न यापूर्वीच ठरलं होतं. परंतु नवऱ्याला कोरोना झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर नवरीने पीपीई किट्स घालून कोविड वार्डातच युवकासोबत लग्न केले. यावेळी संपूर्ण वार्डात लग्नाचं वातावरण होतं.

परदेशात राहणाऱ्या अभिरामला लग्नाच्या तयारी दरम्यान कोरोना संक्रमण झालं. त्यानंतर त्याची आईही कोरोनाबाधित आढळली. या दोघांना अलाप्पुझा मेडिकल कॉलेजमध्ये कोविड वार्डात उपचारासाठी दाखल केले होते. कोरोना संक्रमित झाल्यानंतर दोघांच्या कुटुंबाने २५ एप्रिल रोजी ठरलेलं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परंतु नवरीच्या आग्रहास्तव जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन कोविड वार्डात लग्न सोहळा पार पडला. वार्डातील इतर कोरोना रुग्णही या विवाह सोहळ्यात सहभागी झाले. कोरोना वार्डात नवरी आणि तिच्या नातेवाईकांनी पीपीई किट्स घालून आत प्रवेश केला होता.

केरळमध्ये शनिवारी कोविडचे ७३ आरोग्य कर्मचाऱ्यांसह २६ हजार ६८५ कोरोना संक्रमित आढळले. त्याचसोबत राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या वाढून ती १ लाख ९८ हजारापर्यंत पोहचली आहे. केरळ सरकारने सांगितले की, राज्यात आतापर्यंत १३ लाख ७७ हजार १८६ लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. मागील २४ तासांत २५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत राज्यात ५ हजाराहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी लोकांना सतर्कतेचे आवाहन करत कोरोनाचं संक्रमण कमी करण्यासाठी योग्य त्या खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या