शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

Coronavirus: आम्ही लग्नाळू! PPE किट्स घालून नवरी थेट हॉस्पिटलमध्ये पोहचली; कोविड वार्डात लग्नसोहळा पार पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 20:03 IST

परदेशात राहणाऱ्या अभिरामला लग्नाच्या तयारी दरम्यान कोरोना संक्रमण झालं. त्यानंतर त्याची आईही कोरोनाबाधित आढळली.

ठळक मुद्देकोरोना संक्रमित झाल्यानंतर दोघांच्या कुटुंबाने २५ एप्रिल रोजी ठरलेलं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.नवरीच्या आग्रहास्तव जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन कोविड वार्डात लग्न सोहळा पार पडला.वार्डातील इतर कोरोना रुग्णही या विवाह सोहळ्यात सहभागी झाले. कोरोना वार्डात नवरी आणि तिच्या नातेवाईकांनी पीपीई किट्स घालून आत प्रवेश केला होता.

तिरुवनंतपुरम – केरळच्या अलप्पुझा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्येच कोरोना काळात एका कपलनं लग्न केलं आहे. यावेळी नवरीनं पीपीई किट्स घातलं होतं. कारण नवऱ्या मुलाला कोरोना झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने हे लग्न लावण्यात परवानगी देण्यात आली.

अलाप्पुझा येथे राहणारे सोम आणि अभिराम या दोघांनी कोविड वार्डात लग्न केले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेकांनी लग्न समारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु केरळमध्ये कपलने कोरोना काळातही चक्क कोविड वार्डात लग्न केल्याचं समोर आलं आहे. या दोघांचे लग्न यापूर्वीच ठरलं होतं. परंतु नवऱ्याला कोरोना झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर नवरीने पीपीई किट्स घालून कोविड वार्डातच युवकासोबत लग्न केले. यावेळी संपूर्ण वार्डात लग्नाचं वातावरण होतं.

परदेशात राहणाऱ्या अभिरामला लग्नाच्या तयारी दरम्यान कोरोना संक्रमण झालं. त्यानंतर त्याची आईही कोरोनाबाधित आढळली. या दोघांना अलाप्पुझा मेडिकल कॉलेजमध्ये कोविड वार्डात उपचारासाठी दाखल केले होते. कोरोना संक्रमित झाल्यानंतर दोघांच्या कुटुंबाने २५ एप्रिल रोजी ठरलेलं लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परंतु नवरीच्या आग्रहास्तव जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन कोविड वार्डात लग्न सोहळा पार पडला. वार्डातील इतर कोरोना रुग्णही या विवाह सोहळ्यात सहभागी झाले. कोरोना वार्डात नवरी आणि तिच्या नातेवाईकांनी पीपीई किट्स घालून आत प्रवेश केला होता.

केरळमध्ये शनिवारी कोविडचे ७३ आरोग्य कर्मचाऱ्यांसह २६ हजार ६८५ कोरोना संक्रमित आढळले. त्याचसोबत राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या वाढून ती १ लाख ९८ हजारापर्यंत पोहचली आहे. केरळ सरकारने सांगितले की, राज्यात आतापर्यंत १३ लाख ७७ हजार १८६ लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. मागील २४ तासांत २५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत राज्यात ५ हजाराहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी लोकांना सतर्कतेचे आवाहन करत कोरोनाचं संक्रमण कमी करण्यासाठी योग्य त्या खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या