शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

पोरानं रागात घेतला नागाचा २-३ वेळा चावा; साप तडफडून मेला, डॉक्टर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 17:23 IST

ही पहिलीच वेळ आहे की, विषारी नाग कोब्रा मुलाला चावला आणि उपचारादरम्यान तो वाचला.

जशपूर जिल्ह्यातील तपकरासह इतर भागात सर्पदंशाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. दरवर्षी येथे १२ हून अधिक आदिवासींचा सर्पदंशाने मृत्यू होतो. मात्र यावेळी आदिवासी भागातील गार्डन तालुक्यात असलेल्या पंडरापथ गावात एक अनोखा प्रकार समोर आला आहे. इकडे घरात खेळत असलेल्या एका मुलाला कोब्रा साप चावला, वेदनेने रडत असताना त्या मुलालाही राग आला आणि त्याने त्याच सापाला पकडून २-३ ठिकाणी दातांनी चावा घेतला. आश्चर्य म्हणजे उपचारानंतर ८ वर्षांचा निष्पाप वाचला, मात्र कोब्रा सापाचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे ज्या मुलाला साप चावला आहे, तो छत्तीसगडमधील लुप्त होत चाललेल्या कोरवा जमातीतील आहे. या जमातीचे लोक राष्ट्रपतींचे दत्तक पुत्रही मानले जातात. ही प्रजाती वाचवण्यासाठी सरकार दरवर्षी करोडो रुपये खर्च करते. सर्पदंशानंतर मृत्यूच्या दाढेतून परत आलेला ८ वर्षीय दीपक म्हणाला, मी माझ्या बहिणीसोबत अंगणात खेळत असताना अचानक मागून एक साप आला आणि माझ्या पाठीवर चढला. जेव्हा मला साप चावला तेव्हा त्याचा खूप राग आला, मी पळून जाणाऱ्या सापाला पकडले आणि दाताने चावा घेतला. 

आई बहिणीनं रुग्णालयात नेले...त्यानंतर लगेचच दीपकने आपल्या बहिणीला त्याला साप चावल्याचं सांगितले, त्यानंतर आई आणि बहिणीने त्याला रुग्णालयात नेले. आपल्या मुलाला साप चावला होता आणि मुलानेही रागाच्या भरात त्याच सापाला चावला असल्याचं आईने सांगितले. दीपकची बहीणही सांगते की, माझा भाऊ माझ्याकडे धावत आला आणि मला साप चावल्याचं सांगितले. मग आई आणि आम्ही मिळून त्याला दवाखान्यात नेले. ही पहिलीच वेळ आहे की, विषारी नाग कोब्रा मुलाला चावला आणि उपचारादरम्यान तो वाचला. मात्र मुलाच्या चाव्यामुळे सापाचा मृत्यू झाला. 

सर्प तज्ज्ञांना काय वाटतं?या आश्चर्यकारक घटनेबाबत जशपूर जिल्ह्यातील सर्प तज्ज्ञ डॉ. केसर हुसेन यांनी सांगितले की, साप चावल्यावर त्याचे विष शरीरात सोडतो, परंतु या प्रकरणात सापाने मुलाला चावल्यानंतर त्याचे विष शक्यतो सोडले नाही अशा वेळी सर्पदंशाचा जीव वाचतो आणि त्यावर उपचाराने जीव वाचला असं काही लोकांचे मत आहे. सत्य हे आहे की साप चावला, पण त्याने विष सोडले नाही असं त्यांनी सांगितले. या घटनेनं जशपूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरली आहे. कोब्रासारख्या विषारी सापाने चावा घेतल्यानंतर मुलाला काहीही झाले नाही, परंतु जेव्हा मुलाने सापाला चावलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला. हा देवाचा चमत्कार मानून आदिवासी भागातील लोक दूरदूरवरून त्या बालकाला पाहायला येत आहेत.

दुखापतीमुळे साप मरण पावलात्याचवेळी जशपूर जिल्ह्यातील डॉ. लक्ष्मीकांत बापट सांगतात की, दीपकला जेव्हा साप चावला, तेव्हा त्याला विषरोधी इंजेक्शन देऊन उपचार करण्यात आले. पण त्याने ज्या सापाला चावलं त्याचा मृत्यू जखमी होऊन झाल्याचं डॉक्टर म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"